शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

मीरारोड वासियांचा रेल्वे प्रवास जीवघेणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 22:36 IST

मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या दहा वर्षांत लोकल मधून पडून ५१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ५४ जणं जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे . 

मीरा रोड - मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या दहा वर्षांत लोकल मधून पडून ५१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ५४ जणं जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे . गर्दीच्यावेळात चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल आधीच विरार - भाईंदर वरून खच्चून भरलेल्या असल्याने मीरारोडवासीयांना लोकल पकडताना अक्षरशः लोंबकळत प्रवास करावा लागतो . मीरारोडवासीयांचा प्रवास जीवघेणा बनला आहे . 

 मीरारोड शहराची लोकवस्ती सध्या पूर्व भागातच झपाट्याने वाढत आहे . याच लोकवस्तीतल्या सध्याच्या प्रवाशांचा ताण लोकल सेवेला  झेपेनासा झाला आहे . पूर्व भागात अजूनही काही लाखांनी लोकवस्ती वाढणार असून पश्चिमेला लोकवस्ती झाली तर प्रवाश्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे . 

मीरारोडवासीयांना  नोकरी , शिक्षण , उद्योग वा अन्य कारणांनी मुंबई शिवाय पर्याय नाही. मुळात मुंबईत घर परवडत नसल्याने लोकं मुंबईला खेटून असणाऱ्या मीरारोड वा भाईंदरचा पर्याय निवडतात . त्यातही रस्त्याने जायचे म्हटले तर जागोजागी प्रचंड वाहतूक कोंडी मुळे वेळ व पैसे वाचवण्यासाठी लोकल शिवाय दुसरा आधार राहिलेला नाही . 

 

त्यामुळे  मीरारोड रेल्वे स्थानकातून रोजच्या प्रवाश्यांची संख्या सुमारे १ लाख १४ हजारच्या घरात आहे . मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या सकाळी तर प्रचंड आहेच पण दुपारी व सायंकाळी देखील गर्दी असते . 

सकाळ ते दुपार दरम्यान डहाणू , विरार , भाईंदर येथून येणाऱ्या लोकल आधीच गर्दीने तुडुंब भरलेल्या असतात . त्यामुळे मीरारोड स्थानकातून लोकल मध्ये पाय ठेवणे म्हणजे दिव्यच असते . आत मध्ये तर मुंगीला शिरायला देखील वाव नसतो . 

त्यातच दरवाजे अडवून बसणाऱ्या प्रवाश्यांच्या दादागिरी मुळे सुद्धा चढण्यासाठी त्रास व वाद होत असतो . दरवाजा अडवून असणारे तर आत मध्ये जाऊ सुद्धा देत नाहीत . शेवटी लोकल पकडायची म्हणजे लटकून जाण्या शिवाय दुसरा पर्यायच हाती नसतो .  विरारला राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे हे मीरारोड मध्ये कामा निमित्त येत असतात . त्यांनी मीरारोडवासियांची लोकल पकडण्यासाठी चाललेली जीवघेणी कसरत पाहून वसई रेल्वे पोलिसां कडे माहिती अधिकार टाकून गेल्या दहा वर्षात मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानक दरम्यान लोकल मधुनच पडून वा लोकल अपघातात मरण पावलेले व जखमी झालेले यांची आकडेवारी मागितली होती . 

रेल्वे पोलिसांनी २००८ साला पासून २०१७ पर्यंतची आकडेवारी दिली असून गेल्या १० वर्षात ५१ प्रवाश्याना आपले जीव गमवावे लागले . तर ५४ प्रवाशी जखमी झाले आहेत अशी माहिती दिली आहे . ५४ प्रवाश्यां पैकी बहुतांशी ना कायमचे अपंगत्व आले आहे .  मीरारोड साठी गर्दीच्या वेळात स्वतंत्र लोकल सोडावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षां पासून प्रवाशी करत आहेत . परंतु रेल्वे प्रशासना कडून मात्र या कडे सातत्याने तांत्रिक कारणं पुढे करून प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ चालवल्याचा आरोप चोरघे यांनी केला आहे . रेल्वे प्रशासनाने तातडीने मीरारोड च्या प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे .

टॅग्स :mira roadमीरा रोडMumbai Localमुंबई लोकल