शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

'साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने वैश्विक होईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:38 IST

मराठी साहित्य जगतातील प्रतिक्रिया; फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षपदी निवडीचे स्वागत

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : उस्मानाबाद येथे होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली आहे. साहित्यिक क्षेत्राने त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. मराठी साहित्य संमेलनात ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या साहित्यिकाची निवड झाल्याने हे संमेलन खºया अर्थाने वैश्विक होईल, अशी प्रतिक्रिया साहित्यिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.दिब्रिटो यांच्या निवडीमुळे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे वैश्विक होत असल्याची ही खूण आहे. दिब्रिटो हे करुणेचे उपासक आहेत. त्यांचे साहित्य हे मराठी साहित्याला साहित्यांचा आयाम विकसित करणारे आहे. त्यामुळे एकंदरच साहित्य संमेलनाची निवड समिती आणि महामंडळ हे सर्व समावेशक होत आहे, याचा मला आनंद झाला. दिब्रिटो यांच्याकडे मी एक साहित्याचा उपासक म्हणून पाहतो. आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून ५० वर्षे त्यांनी मने जोडण्याचे काम केले. म्हणूनच ते कोणत्याही राजकारणात, हवेदाव्यात नाहीत. अजातशत्रू असे ते व्यक्तिमत्त्व आहे, त्यामुळे त्यांचे नाव एकमताने निवडल्यामुळे पुढील पिढीतील साहित्यिक म्हणून व मी त्यांचा एक चाहता या नात्याने आनंद व्यक्त करीत आहे, असे मत प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केला.साहित्यिक वामनराव देशपांडे यांनीही या निवडीबाबत आनंद व्यक्त केला. ही व्यक्ती गुणग्राहक, सज्जन आहे. सामान्य लोकांना त्यांचे नाव फारसे माहीत नव्हते. ना. धों. महानोर यांच्या नावाची घोषणा होईल, असे मला वाटत होते. पण, तसे झाले नाही. साहित्यिक या दृष्टीने दिब्रिटो यांच्याकडे पाहिले पाहिजे. त्यांचा धर्म, जात कोणती आहे, हे पाहू नये. आता हा भेद केला जातोय, तो योग्य नाही. पण माझ्या दृष्टीने त्यांची निवड योग्य आहे. २१ व्या शतकापासून साहित्य लोप पावले आहे. वाचकांची संख्या रोडवली आहे. पु.भा. भावे, व. पु. काळे असे लेखक आता होणे नाही. आता पुस्तके मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. वृत्तपत्रही वाचली जात नाहीत. साहित्यिक वातावरण बदलेले आहे. साहित्यात रात्र झाली आहे पण अरुणोदय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.‘सर्वसमावेशक दृष्टिकोन मांडतील’लेखक व प्रकाशक सुरेश देशपांडे यांनी दिब्रिटो यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. पण त्यांच्या निवडीने समस्त साहित्य क्षेत्राला आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांचे नाव चर्चेत नव्हते. दिब्रिटो हे मुळात धर्मप्रसारक, धर्मरक्षक. पण त्यांची जाणीव पर्यावरणीय पुस्तकांतून दिसली आहे. त्यावरून निसर्ग आणि मानव यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सहृदय आहे.त्यांच्या ख्रिस्ती धर्मांवरील पुस्तकांमुळे ते प्रचारक असावेत, असेही काही लोकांना वाटते. आता अध्यक्षपदावरून भाषण करताना ते सर्वसमावेशक, असा दृष्टिकोन मांडतील असे वाटते. त्यांच्या अध्यक्षपदाचे स्वागत प्रत्येक घरांत व्हावे, अशी अपेक्षा आहे. कारण अध्यक्षपदावर निवडून येणारी माणसे ही नेहमी मोठीच असतात, असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन