शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुंब्य्रासह दिव्यालाही मिळणार मुबलक पाणी, पालिकेची १९६ कोटींची रिमॉडेलिंगची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:10 IST

मुंब्रा आणि दिव्याची तहान भागविण्यासाठी ठाणे महापालिकेने नव्याने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. त्यानुसार यासाठी १९६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१० नव्या जलकुंभाची केली जाणार उभारणीमहापालिका आणि एमआयडीसीकडून वाढणार पाणी पुरवठा

ठाणे - ठाणे महापालिकेने घोडबंदरच्या रिमॉडेलिंगचा प्रस्ताव पुढे आणल्यानंतर आता मुंब्य्राचीही तहान याच बेसवर भागविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार येत्या महासभेत या मुंब्य्राच्या रिमॉडेलिंगचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. यामुळे येत्या काळात मुंब्य्राची तहान भागली जाणार आहे. आता हे काम महापालिका स्वत: करणार असून यासाठी लागणाऱ्या खर्चात मात्र ६९ कोटींनी वाढ झाली आहे. या योजनेत आता दिव्याचाही समावेश करण्यात आल्याने ही वाढ झाल्याचे पालिकेचे म्हणने आहे.                  ठाणे महापालिकेच्या वतीने मुंब्य्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार २०१०-११ मध्ये यासाठी ९७.४१ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यानुसार केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत हे काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु या योजनेसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तसेच ही योजना देखील बंद झाली. त्यामुळे ही योजना कशी राबवयाची असा पेच पालिकेपुढे पडला होता. त्यानंतर केंद्राच्या अमृत योजनेतून पालिकेने हे काम करण्याचा पालिकेने विचार केला होता. परंतु अमृत योजनेतून देखील या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. अखेर पालिकेने आता या योजनेसाठी स्वत: खर्च करण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या मुंब्य्राची लोकसंख्या ही वाढली असून येथे असलेले जलकुंभ हे २०११ पर्यंत पाणी पुरवठा होईल एवढेच होते. परंतु आता त्यात वाढ करणे अपेक्षित असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. त्यानुसार आता एकूणच येथील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून यासाठी १२६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु आता या योजनेत दिव्याचाही पालिकेने समावेश केला आहे. त्यामुळे हा खर्च आता १९६ कोटींच्या घरात गेला आहे. त्यानुसार मुंब्रा व दिवा भागासाठी आता ही रिमॉडेलींगची योजना राबविली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.                         मुंब्रा व दिवा विभागासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन हे पायाभूत वर्ष २०१८ धरुन पुढील ३० वर्षांसाठी वहन व्यवस्था व वितरण व्यवस्था गृहीत धरण्यात येणार आहे. जलकुंभ संप व पंप हाऊस १५ वर्ष कालावधीसाठी संकल्पीत करण्यात येतील, या योजनेसाठी महापालिकेची स्वत:ची योजना व एमआयडीसीकडून पाणी उपलब्ध करुन देणार आहे, मुंब्रा दिवा विभागासाठी मुख्य जल संतुलन टाकी बांधण्याचा समावेश करण्यात येणार आहे, नव्याने २०० मी.मी. ते १ हजार मी. मी. व्यासाच्या सुमारे १८ किमी लांबीच्या जलवाहीनी टाकण्यात येणार आहेत. तसेच या कामासाठी सल्लागाराचीही नेमणुक केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत नव्याने १० जलकुंभ बांधले जाणार असून आदी कामांसह इतर कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार २०१८-१९ या वर्षात ३० कोटी, २०१९-२० मध्ये ९० कोटी आणि २०२०-२१ या कालावधीत ७६ कोटींचा खर्च केला जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी