शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

महापौरांच्या प्रभागातील नागरिकांची जीवघेणी कसरत; मीरा रोड-भाईंदर महापालिकेचं दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 21:15 IST

महापालिकेने येथील नाल्यावर लोखंडी जाळीचा ये जा करण्यासाठी मार्ग बनवला होता. परंतु पावसाआधी कॉंक्रिटचा मोठा नाला बांधण्याचे काम पालिकेने सुरू केले होते

मीरारोड - महापौर जोशना हसनाळे यांच्या प्रभागातील मीनाक्षी नगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ये जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने त्यांना नाल्यावरील चिंचोळ्या स्लॅब वरून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. काशिमिरा भागातील माशाचा पाडा मार्गावर मीनाक्षी नगर ही पक्क्या चाळींची वस्ती आहे. सदर वस्तीतील नागरिकांना ये जा करण्यासाठी स्थानिक खासगी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीतून रस्ता दिला आहे. परंतु गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने हा रस्ता खराब होऊन तेथे चिखल व पाणी साचले आहे. 

महापालिकेने येथील नाल्यावर लोखंडी जाळीचा ये जा करण्यासाठी मार्ग बनवला होता. परंतु पावसाआधी कॉंक्रिटचा मोठा नाला बांधण्याचे काम पालिकेने सुरू केले होते जेणेकरून लोखंडी जाळीचा ये जा करण्यासाठी बनवलेला पूल काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांपासून महिला, पुरुष व  वृद्धांना नाल्यावर बांधलेल्या चिंचोळ्या काँक्रिटच्या स्लॅब वरून ये-जा करावी लागत आहे. नवीन नाला हा खोल व मोठा असल्याने चिंचोळ्या स्लॅब वरून ये जा करणे धोक्याचे ठरले आहे. रहिवासी जीव मुठीत ठेवून कशीबशी ये जा करतात.

सदर नाल्यामधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणाऱ्या पाण्याचा लोंढा वाहात असतो. मुसळधार पाऊस असला की नाला पाण्याने तुडुंब भरून आजुबाजुचा परिसर सुद्धा जलमय होतो. परिसरात कमरे एवढे पाणी साचते. अशा परिस्थितीत नाल्यावरून ये जा करणे अशक्य होते. ह्या प्रभागात महापौरांसह अन्य तीन भाजपा नगरसेवक असून देखील कोणीही आमच्या समस्या सोडवण्यासाठी येत नसल्याने अनेक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील महापौरांसह अन्य तीन नगरसेवकांवर आमचा विश्वास नसून त्यांच्याकडून रस्त्याची समस्या सोडविण्याची अपेक्षा राहिलेली नाही असे सांगितले. आम्ही महापालिका आयुक्तांना विनंती केली असून नाल्यावर ये जा करण्यासाठी लहानसा पूल तसेच कायमस्वरूपी पर्यायी रस्ता बांधून द्यावा. जेणेकरून नाल्यात पडून एखाद्या रहिवाशांचा मृत्यू वा अपघाता सारखी दुर्दैवी घटना टाळता येईल असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महापौर काय म्हणाल्या?

विरोधक हे राजकीय द्वेषाने कामात खो घालतात. पुलाचे काम ज्यांच्यामुळे रखडले तेच पूल नाही म्हणून कांगावा करतात. रहिवाशांना असलेल्या पर्यायी रस्त्याच्या डागडुजीसाठी पालिकेला निर्देश दिले आहेत. तसेच नाल्यावर पादचाऱ्यांना ये जा करण्यासाठी पावसामुळे थांबलेले काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे असं महापौर ज्योत्स्ना हसनाळे म्हणाल्या आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक