शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ब्रेनडेड झालेल्या तरुणाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; तर दोघांना नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 20:56 IST

मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील बिलिंग विभागात काम करीत असलेल्या रूपा उचील यांचा २० वर्षीय मुलगा प्रतीक याचा शुक्रवारी दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी काशिमीरा येथे अपघात झाला.

 - राजू काळेभाईंदर, दि. २३ - मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील बिलिंग विभागात काम करीत असलेल्या रूपा उचील यांचा २० वर्षीय मुलगा प्रतीक याचा शुक्रवारी दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी काशिमीरा येथे अपघात झाला. त्यात त्याला जबर मर लागल्याने तो कोमात गेला. त्याच्यावर वोक्हार्ट अत्याधुनिक उपचार करूनही त्याची प्रकृती सुधारली नाही. अखेर त्याच्या पालकांनी त्यांचे दुःख पचवून आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या पाचजणांना ऐन दिवाळीत जीवनदान मिळाले.मीरारोड येथील भारती पार्क परिसरात राहणारा प्रतीक शुक्रवारी काशिमीरा पुलावरून मुंबईकडे आपल्या मित्रासोबत मोटार सायकलवरून जात होता. त्यावेळी प्रतीक मोटरसायकल चालविणाऱ्याच्या मागे होता. मोटरसायकल वेगात असताना त्यावरील नियंत्रण सुटून ती एका खांबाला जोरात आदळली व मागे बसलेला प्रतीक रस्त्यावर फेकला गेला. यावेळी त्याने हेल्मेट घातले नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्याच्यावर लगतच्या ऑर्बिट रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवार ते शनिवारी संपूर्ण दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु, त्याने त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. ऐन दिवाळीत आपल्या कुटुंबावर झालेल्या या आघातामुळे प्रामुख्याने त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. तो आघात पचवून त्याच्या पालकांनी आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. तास निर्णय त्यांनी डॉक्टरांना कळविल्यानंतर अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना प्रतीकचे यकृत, २ किडन्या व कॉर्णीया (डोळे ) काढून त्यातील यकृत व एका किडनीचे प्रत्यारोपण याच रुग्णालयात करण्यात आले. तर दुसरी किडनी रुग्णालयाने मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात पाठविण्यात आली, तसेच बोरीवली येथील रोटरी क्लबतर्फे प्रतिकच्या कोर्णीयाचे इतरत्र प्रत्यारोपण करण्यात आले. हे सर्व रुग्ण यकृत व किडनीच्या दुर्धर रोगांशी लढत होते. त्यांना ऐन दिवाळीत अवयव मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. तर भर दिवाळीत आपल्या घरी अंधार झाला असला तरीही दुसऱ्यांच्या घरात पणती पेटविण्याचे प्रतीकच्या पालकांनी केले असून अवयवदानांच्या चळवळीला एक नवीन भरारी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवानी म्हणाले कि, मेंदूचे कार्य थांबल्याचे (ब्रेनडेड) डॉक्‍टरांनी सांगताच त्याच्या आई आपला धीर एकवटून आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तिघांना जगण्याचे बळ व दोघांना दृष्टी मिळाली आहे. याबाबत समाजात मोठ्याप्रमाणात जनजागृती होणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMira Bhayanderमीरा-भाईंदर