शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ-बदलापूरच्या नागरिकांचा विश्वास जीवन प्राधिकरणाने गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:54 IST

पाणीपुरवठ्याचे काम करणारी आणि वितरणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरण काम करत असले तरी अंबरनाथमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

- पंकज पाटील, अंबरनाथउल्हास नदीच्या तीरावर वसलेल्या अंबरनाथ तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. केवळ उल्हास नदी नव्हे तर बारवी धरणातूनही पाणी उपलब्ध होईल, अशी यंत्रणा असतानाही अंबरनाथ आणि बदलापूरला पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांच्या तक्रारी कमी करण्याची जबाबदारी ज्या जीवन प्राधिकरणावर आहे, तेच प्राधिकरण आता शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरवासीयांची विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरण हटाव शहर बचाव, अशी मोहीम हाती घेतली आहे.गेल्या काही वर्षांत जीवन प्राधिकरणाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरसाठी सरकारने नगरोत्थान योजनेतूनच सर्वात आधी भरीव निधीची तरतूद केली. या निधीतून शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था सुधारण्याचा प्रस्ताव होता. अर्थात त्या अनुषंगाने कामेही झाली. अनेक ठिकाणी जलकुंभ उभारले तर काही ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र एवढे केल्यावर वितरण व्यवस्था सुधारेल इतकी माफक अपेक्षा केली जात होती. मात्र शहरातील वितरण व्यवस्थेत असलेल्या चुका तशाच ठेवत प्राधिकरणाने नव्या आणि जुन्या वाहिन्या एकत्रित सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाणीगळतीचे प्रमाण किंचितही कमी झालेले नाही. राज्यातील सक्षम यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरणाकडे पाहिले जाते. पाणीपुरवठ्याचे काम करणारी आणि वितरणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरण काम करत असले तरी अंबरनाथमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. बदलापूरमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम करत असताना केलेल्या चुकीचा भुर्दंड आजही या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यानंतर आलेल्या अमृत योजनेच्या निधीचाही योग्य विनियोग अद्याप केलेला नाही. बदलापूरमधील यंत्रणा अपयशी ठरत असतानाच त्याची पुनरावृत्ती अंबरनाथमध्येही झाली. अंबरनाथमध्ये नगरोत्थान योजनेतील काही कामे अपुरी ठेवण्यात आली. जलवाहिन्या टाकण्याचे कामही पूर्ण झालेले नाही.अंबरनाथमध्येही जुन्या वाहिन्या तशाच ठेवत नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. अनेक नागरिकांना दोनदोन ठिकाणी कनेक्शन घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाण्याची गळती रोखण्याऐवजी पाण्याची गळती वाढविण्याचे काम प्राधिकरणाने केले आहे. १० वर्षांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत पाणीगळतीचे प्रमाण हे १७ टक्के होते. आज ही गळती दुप्पट झाली असून ती ३२ ते ३७ टक्क्यांच्या घरात गेली आहे. शहराला आवश्यक असलेला पाणीसाठा उचलण्यात येत असतानाही शहराला पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीगळती रोखण्यात आलेले अपयशच हेच मूळ समस्येचे कारण झाले आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही पाणीगळती रोखता आलेली नाही, तसेच वितरण व्यवस्थेत सुधारणाही करता आलेली नाही. सरकारचे सर्व अनुदान हे पालिकेकडे वर्ग होणार असतानाही पालिकेने पाणीपुरवठ्याचे काम करण्यासाठी प्राधिकरणाला निधी वर्ग केला. मात्र जबाबदार संस्थाच या कामात अपयशी ठरली आहे.ज्या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर आहे, त्या चिखलोली धरणातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. आजूबाजूच्या रासायनिक कंपन्यांमुळे धरणातील पाणी हे दूषित झाले आहे. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ज्या धरणातून १२ महिने पाणीपुरवठा होत होता. आज त्या धरणातील दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही यंत्रणाही प्राधिकरणाकडे असून ती यंत्रणा सक्षमपणे चालविण्यात अपयश आले आहे.नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणारनागरिकांना आवश्यक असलेले पाणी देण्यात प्राधिकरण कमी पडत असेल तर त्या प्राधिकरणाला विरोध करणे गरजेचे आहे, असा सूर उमटू लागला आहे. जीवन प्राधिकरण हटाव, शहर बचाव, ही मोहीम राबविण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. प्राधिकरणाच्या चुकीचा भुर्दंड नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सहन करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा संताप सहन करण्याची वेळ आता प्राधिकरणावर आली आहे.

टॅग्स :Waterपाणी