शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

अंबरनाथ-बदलापूरच्या नागरिकांचा विश्वास जीवन प्राधिकरणाने गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:54 IST

पाणीपुरवठ्याचे काम करणारी आणि वितरणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरण काम करत असले तरी अंबरनाथमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

- पंकज पाटील, अंबरनाथउल्हास नदीच्या तीरावर वसलेल्या अंबरनाथ तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. केवळ उल्हास नदी नव्हे तर बारवी धरणातूनही पाणी उपलब्ध होईल, अशी यंत्रणा असतानाही अंबरनाथ आणि बदलापूरला पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांच्या तक्रारी कमी करण्याची जबाबदारी ज्या जीवन प्राधिकरणावर आहे, तेच प्राधिकरण आता शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरवासीयांची विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरण हटाव शहर बचाव, अशी मोहीम हाती घेतली आहे.गेल्या काही वर्षांत जीवन प्राधिकरणाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरसाठी सरकारने नगरोत्थान योजनेतूनच सर्वात आधी भरीव निधीची तरतूद केली. या निधीतून शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था सुधारण्याचा प्रस्ताव होता. अर्थात त्या अनुषंगाने कामेही झाली. अनेक ठिकाणी जलकुंभ उभारले तर काही ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र एवढे केल्यावर वितरण व्यवस्था सुधारेल इतकी माफक अपेक्षा केली जात होती. मात्र शहरातील वितरण व्यवस्थेत असलेल्या चुका तशाच ठेवत प्राधिकरणाने नव्या आणि जुन्या वाहिन्या एकत्रित सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाणीगळतीचे प्रमाण किंचितही कमी झालेले नाही. राज्यातील सक्षम यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरणाकडे पाहिले जाते. पाणीपुरवठ्याचे काम करणारी आणि वितरणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरण काम करत असले तरी अंबरनाथमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. बदलापूरमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम करत असताना केलेल्या चुकीचा भुर्दंड आजही या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यानंतर आलेल्या अमृत योजनेच्या निधीचाही योग्य विनियोग अद्याप केलेला नाही. बदलापूरमधील यंत्रणा अपयशी ठरत असतानाच त्याची पुनरावृत्ती अंबरनाथमध्येही झाली. अंबरनाथमध्ये नगरोत्थान योजनेतील काही कामे अपुरी ठेवण्यात आली. जलवाहिन्या टाकण्याचे कामही पूर्ण झालेले नाही.अंबरनाथमध्येही जुन्या वाहिन्या तशाच ठेवत नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. अनेक नागरिकांना दोनदोन ठिकाणी कनेक्शन घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाण्याची गळती रोखण्याऐवजी पाण्याची गळती वाढविण्याचे काम प्राधिकरणाने केले आहे. १० वर्षांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत पाणीगळतीचे प्रमाण हे १७ टक्के होते. आज ही गळती दुप्पट झाली असून ती ३२ ते ३७ टक्क्यांच्या घरात गेली आहे. शहराला आवश्यक असलेला पाणीसाठा उचलण्यात येत असतानाही शहराला पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीगळती रोखण्यात आलेले अपयशच हेच मूळ समस्येचे कारण झाले आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही पाणीगळती रोखता आलेली नाही, तसेच वितरण व्यवस्थेत सुधारणाही करता आलेली नाही. सरकारचे सर्व अनुदान हे पालिकेकडे वर्ग होणार असतानाही पालिकेने पाणीपुरवठ्याचे काम करण्यासाठी प्राधिकरणाला निधी वर्ग केला. मात्र जबाबदार संस्थाच या कामात अपयशी ठरली आहे.ज्या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर आहे, त्या चिखलोली धरणातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. आजूबाजूच्या रासायनिक कंपन्यांमुळे धरणातील पाणी हे दूषित झाले आहे. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ज्या धरणातून १२ महिने पाणीपुरवठा होत होता. आज त्या धरणातील दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही यंत्रणाही प्राधिकरणाकडे असून ती यंत्रणा सक्षमपणे चालविण्यात अपयश आले आहे.नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणारनागरिकांना आवश्यक असलेले पाणी देण्यात प्राधिकरण कमी पडत असेल तर त्या प्राधिकरणाला विरोध करणे गरजेचे आहे, असा सूर उमटू लागला आहे. जीवन प्राधिकरण हटाव, शहर बचाव, ही मोहीम राबविण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. प्राधिकरणाच्या चुकीचा भुर्दंड नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सहन करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा संताप सहन करण्याची वेळ आता प्राधिकरणावर आली आहे.

टॅग्स :Waterपाणी