शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयांनी परिवर्तन करण्याची गरज - राम नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:16 IST

आजच्या काळात आधुनिक साधनांद्वारे आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. सोशल मीडियाद्वारे एका क्लिकवर माहिती मिळते. यामुळे ज्ञानाचे भांडार असलेली ग्रंथालये कालबाह्यहोतात की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे.

ठाणे : आजच्या काळात आधुनिक साधनांद्वारे आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. सोशल मीडियाद्वारे एका क्लिकवर माहिती मिळते. यामुळे ज्ञानाचे भांडार असलेली ग्रंथालये कालबाह्यहोतात की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. मात्र, ग्रंथालये ही कालबाह्यहोऊ शकत नाहीत. केवळ त्यांनी कालानुरूप परिवर्तन करण्याची गरज आहे. जे परिवर्तन करतील, ते कालौघात टिकतील, असे मत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी विजेच्या लपंडावाने राज्यपालांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणला.मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा शुक्रवारी सायंकाळी गडकरी रंगायतन येथे रंगला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वाचाल तर वाचाल, असे म्हटले जाते. मात्र, पुस्तके किती जण वाचतात आणि वाचनसंस्कृती रुजणार कशी, हा यक्षप्रश्न आहे. मोबाइल, इंटरनेटवर रुळलेल्या तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे, हे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाताना ग्रंथालयांनी ग्रंथव्यवहार आधुनिक पद्धतीचे आणि समृद्ध केले पाहिजे. विशेष म्हणजे मराठी ग्रंथसंग्रहालयाने डिजिटलायझेशनची प्रक्रिया हाती घेऊन आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे, असे नाईक यावेळी म्हणाले. यावेळी नाईक यांनी स्वत: लिहिलेल्या चरैवेति! चरैवेति ! या आपल्या पुस्तकाचा संच संग्रहालयाला भेट दिला.या कार्यक्रमाला खासदार विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, महाराष्टÑ राज्य ग्रंथालयांचे संचालक किरण धारोंडे तसेच संग्रहालयाचे विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, दा.कृ. सोमण, विद्याधर ठाणेकर, मा.य. गोखले उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय अ‍ॅड. वा.अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.वीजपुरवठा खंडितमराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सांगता सोहळ्यात काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. कार्यक्र म सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आणि कार्यक्र म सुरू असताना साधारण दोनतीन मिनिटे वीज गेली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आधीच दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनरेटरवरही लोड आला होता. त्यामुळे ते सुरू होऊन वीजप्रवाह सुरळीत व्हायला काही वेळ लागला, अशी माहिती रंगायतनमधील व्यवस्थापकांनी दिली.

टॅग्स :Ram Naikराम नाईक