शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयांनी परिवर्तन करण्याची गरज - राम नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:16 IST

आजच्या काळात आधुनिक साधनांद्वारे आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. सोशल मीडियाद्वारे एका क्लिकवर माहिती मिळते. यामुळे ज्ञानाचे भांडार असलेली ग्रंथालये कालबाह्यहोतात की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे.

ठाणे : आजच्या काळात आधुनिक साधनांद्वारे आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. सोशल मीडियाद्वारे एका क्लिकवर माहिती मिळते. यामुळे ज्ञानाचे भांडार असलेली ग्रंथालये कालबाह्यहोतात की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. मात्र, ग्रंथालये ही कालबाह्यहोऊ शकत नाहीत. केवळ त्यांनी कालानुरूप परिवर्तन करण्याची गरज आहे. जे परिवर्तन करतील, ते कालौघात टिकतील, असे मत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी विजेच्या लपंडावाने राज्यपालांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणला.मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा शुक्रवारी सायंकाळी गडकरी रंगायतन येथे रंगला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वाचाल तर वाचाल, असे म्हटले जाते. मात्र, पुस्तके किती जण वाचतात आणि वाचनसंस्कृती रुजणार कशी, हा यक्षप्रश्न आहे. मोबाइल, इंटरनेटवर रुळलेल्या तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे, हे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाताना ग्रंथालयांनी ग्रंथव्यवहार आधुनिक पद्धतीचे आणि समृद्ध केले पाहिजे. विशेष म्हणजे मराठी ग्रंथसंग्रहालयाने डिजिटलायझेशनची प्रक्रिया हाती घेऊन आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे, असे नाईक यावेळी म्हणाले. यावेळी नाईक यांनी स्वत: लिहिलेल्या चरैवेति! चरैवेति ! या आपल्या पुस्तकाचा संच संग्रहालयाला भेट दिला.या कार्यक्रमाला खासदार विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, महाराष्टÑ राज्य ग्रंथालयांचे संचालक किरण धारोंडे तसेच संग्रहालयाचे विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, दा.कृ. सोमण, विद्याधर ठाणेकर, मा.य. गोखले उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय अ‍ॅड. वा.अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.वीजपुरवठा खंडितमराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सांगता सोहळ्यात काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. कार्यक्र म सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आणि कार्यक्र म सुरू असताना साधारण दोनतीन मिनिटे वीज गेली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आधीच दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनरेटरवरही लोड आला होता. त्यामुळे ते सुरू होऊन वीजप्रवाह सुरळीत व्हायला काही वेळ लागला, अशी माहिती रंगायतनमधील व्यवस्थापकांनी दिली.

टॅग्स :Ram Naikराम नाईक