शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: सुशिक्षित मतदारांची मतदानाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:22 IST

नागरी प्रश्न न सुटल्याने प्रचंड नाराजी

- अनिकेत घमंडीडोंबिवली : विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेने करूनही डोंबिवली मतदारसंघात जेमतेम ४०.७२ टक्के मतदान झाल्याने सुशिक्षित मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले. २०१४ विधानसभा निवडणुकीत तीन लाख ३८ हजार ३३० मतदारांपैकी एक लाख ५१ हजार ३१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी ४४.७४ टक्के मतदान झाले होते. तेव्हाच्या तुलनेत यंदा १७ हजार ६८८ मतदार वाढले. परंतु, तीन लाख ५६ हजार १० मतदारांपैकी एक लाख ४४ हजार ९८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या तुलनेत यंदा ४.०२ टक्के मतदानात घट नोंदवली गेली आहे.

२०१४ मध्ये युती, आघाडी नव्हती. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि मनसे, बसपा, अपक्ष असे सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्या तुलनेत यावेळेस महायुती आणि महाआघाडी होती. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल, असे सर्व पक्षांना वाटले होते. पण सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या अपेक्षेवर मात्र पाणी फिरवले गेले.

सर्व पक्षांनी शहरातील विदारक स्थितीविरोधात सडकून टीका केली होती. त्यात मनसे आघाडीवर होती. काँग्रेस, राष्ट्रवादीने उघडपणे टीका केलेली नसली तरीही चर्चेतून डोंबिवलीकरांची व्यथा मांडली होती. मनसे, काँग्रेसने चौक सभांमधून शहरातील खड्डे, कचरा, फेरीवाले, अरुंद रस्ते, वाहतूक व पूलकोंडी अशा असंख्य प्रश्नांवर टीका केली होती. दुसरीकडे भाजपच्या चौक सभांमध्ये व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी शहरातील सकारात्मकता मांडली. मात्र काही प्रमाणात विरोधी पक्षांनी नाके मुरडली. तर, काहींनी शेवडे यांना थेट फोन करून नाराजी व्यक्त केली होती.

डोंबिवलीत ब्राह्मण मतदार मोठ्या संख्येने असल्याने ब्राह्मण कार्ड चालवण्याचा प्रयत्न मनसेने केला. निवडणुकीपूर्वी भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी शहरातील ब्राह्मण महासंघ संचलित वेदपाठ शाळेचे उद्घाटन केले होते. त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. त्यामुळेही या निवडणुकीला वेगळे वळण आले होते. त्यावरून झालेल्या टीका, टिपण्णीमुळे ब्राह्मण मतदारांनी काही भागात मतदानाला जाणेच टाळल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. ब्राह्मण कार्डची चर्चा झाल्यानंतर अन्य समाजांनीही बैठका घेत काही निर्णय घेतले.

सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा रंगली होती. शहरातील खराब रस्ते, खड्डे तसेच शहरात विकासकामे न झाल्याने नागरिक नाराज होते. बंद झालेल्या कोपर उड्डाणपुलामुळे होऊ लागलेल्या वाहतूककोंडी नागरिक नाराज होते. अशा सगळ्या स्थितीमुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कल्याण ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील डीएनसी शाळेच्या प्रांगणात झाली होती. त्यावेळी त्यांनीही मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसने येथे एकही मोठा नेता प्रचाराला आणला नव्हता. भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पट्यातील ३९ विधानसभांच्या प्रचाराची जबाबदारी दिली होती.

याद्यांच्या घोळांमुळेही मतदार संतप्त

सुशिक्षितांचे शहर, अशी डोंबिवलीची ख्याती असली तरीही अनेक ठिकाणी याद्यांचे घोळ लोकसभा निवडणुकीप्रमाणेच सुरू होते. यादीत नाव नसणे, नाव गहाळ होणे, केंद्रांची अदलाबदल होणे, अशा प्रकारांमुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. डोंबिवलीतून अन्यत्र स्थलांतरित झालेल्यांची नावे नेहमीप्रमाणे यादीत होती. अशा नागरिकांनी आपली नावे रद्द न केल्याने याद्यांमध्ये फुगवटा आल्याचे निदर्शनास आले. निवडणूक आयोगाने या सगळ्या बाबी लक्षात घेऊन अद्ययावत याद्या तयार करणे अत्यावश्यक आहे. राजकीय पक्षाने त्याकडे लक्ष दिले नसल्याची खंत नागरिकांमध्ये होती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान