शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कुठलीही बंदुकीची गोळी विचार संपवू शकत नाही; दामोदर मावजो यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 09:51 IST

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हिटलिस्टवर माझे नाव होते, मला संरक्षण देण्यात आले; पण...; ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो स्पष्टच बोलले...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हिटलिस्टवर माझे नाव असल्याचे गुप्तचर यंत्रणेकडून कळले व मला संरक्षण देण्यात आले; पण लेखक म्हणून मला संरक्षण नकोय. कारण, त्यामुळे माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते. चार वर्षे झाली माझ्यावर अजून गोळी झाडली गेलेली नाही. मात्र, कुठलीही बंदुकीची गोळी माझा विचार संपवू शकत नाही, असे परखड वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो यांनी शनिवारी केले.

मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे या ग्रंथदालनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनास शनिवारपासून सुरुवात झाली. त्याचे पहिले पुष्प मावजो यांनी गुंफले. निर्माते जयप्रद देसाई यांनी त्यांना बोलते केले. मुलाखतीत त्यांनी वरील मत व्यक्त केले. मावजो म्हणाले की, साहित्यिकांनी राजकारण करू नये हा भूमिकेला माझा विरोध आहे. साहित्यिकांनी जरूर राजकारण करावे; पण पक्षाचे राजकारण करू नये. मी निर्भिडपणे, पण जबाबदारीने बोलतो म्हणून काही लोकांना मी आवडत नाही. आम्ही प्रामाणिकपणे बोलतो आणि म्हणूनच बोलण्याला नकळत धार येते. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर माझे नाव हिटलिस्टवर आले. खरं तर गोव्यात माझा एकही शत्रू नाही. माझ्या मतांना विरोध करणारे आहेत; पण मला वैयक्तिक विरोध करणारे नाहीत. गुप्तचर यंत्रणेने मला सांगितले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकात जाऊ नका, तिथे तुमच्या जिवाला जास्त भीती आहे; पण मी सगळीकडे फिरणार असे सांगितले. त्यानंतर मी कर्नाटकात गेलो. आज महाराष्ट्रात आलो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे