शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

सुटीचा निरोप देण्यात ‘लेटमार्क’, विद्यार्थी-पालकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:47 IST

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना मंगळवारी सकाळी उशिराने सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आल्या, मात्र खासगी शाळापर्यंत निरोप न पोहचल्याने त्यांच्या सुटीचा घोळ झाला.

ठाणे - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना मंगळवारी सकाळी उशिराने सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आल्या, मात्र खासगी शाळापर्यंत निरोप न पोहचल्याने त्यांच्या सुटीचा घोळ झाला. यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिप शाळांना निरोप गेला असला तरी शाळेत पोहचलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहचवण्याची जबाबदारी कुणीच घेतली नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. यामुळे यास जबाबदार कोण असा प्रश्न आता करण्यात येत आहे.जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टीचा अंदाज नव्हता का, हवामान खात्याने १५ जुलैपर्यंत मुंबईसह ठाणे-रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दिलेला इशारा जिल्हा प्रशासनाला माहीत नव्हता का, सुटी जाहिर केल्यानंतर तिचा निरोप खासगी शाळांपर्यंत न पोहचल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. अनेक शाळांचा सकाळचे सोडाच दुपारचे सत्र सुरू झाले तरी सुटीचा निरोप न पोहचल्याने त्यांचा सुटी घोळ झाला.दरम्यान, जिल्ह्यात संततधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये याबाबत मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी पालक शिक्षक संघ स्थानिक शाळा समितीच्या मदतीने उपाययोजना कराव्या, तसेच कोणीही मुख्यालय सोडू नये अशी तंबी शिक्षण विभागाने दिली. आपत्कालीन बाबींसाठी तालुका वा शहराच्या आपत्कालीन कक्षाच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले. अफवांवर विश्र्वास ठेवू नये असे ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे मंगळवारी सकाळी उशिरा आदेश जारी केले. सुटीचा संदेश विद्यार्थ्यांना तत्काळ पोहचविण्यासाठी शाळांनी ग्रामस्थ, पालकांशी लगेचच संपर्क करावा. सर्व शिक्षक वेळेत शाळेत जातील व शाळेत कुणी विद्यार्थी आलेले नाहीत वा विद्यार्थी आले तर त्यांना सुखरूप घरी पोहचवून तशी खात्री करतील, आजचा शालेय कामकाजाचा दिवस पुढील काळात भरण्यात यावा, मंगळवारी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल केंद्रप्रमुखांकडे देण्याच्या सूचना आहेत.केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांचा आढावा घेऊन शिक्षण विभागाकडे रिपोर्ट करावा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी मुख्यालय सोडू नये आदी सूचना शिक्षण विभागाने तडकाफडकी जाहीर करून सुटी जाहीर केली.

टॅग्स :SchoolशाळाRainपाऊस