शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:49 IST

नगरपालिकेची एक नंबरची शाळा अत्याधुनिक सुसज्ज झाली असताना, दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते.

अंबरनाथ :  अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने नुकतीच पश्चिम भागात सर्व सुविधायुक्त प्रशस्त नगरपालिकेची शाळा उभारली, मात्र त्याचवेळी अंबरनाथ पूर्वेतील शाळेची दुरवस्था हा चर्चेचा विषय ठरली आहे. गळकी छते, ओल्या भिंती अशी परिस्थिती विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर सारत आहे.

नगरपालिकेची एक नंबरची शाळा अत्याधुनिक सुसज्ज झाली असताना, दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. छतातून पावसाच्या पाण्याने भिंतींना आलेली ओल, अशा परिस्थितीत विद्यार्थी शिकतात. ही शाळा शिवगंगानगर परिसरात तयार करण्यात येणाऱ्या नवीन शाळेत स्थलांतरित करण्यात येणार होती. मात्र, या शाळेचे काम पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या शाळेतच शिकावे लागत आहे.

नव्या शाळेचे काम पूर्ण करा

अंबरनाथ नगरपालिकेने पूर्व भागात दहा कोटी रुपये मंजूर करून नवीन शाळा प्रस्तावित केली आहे. त्या शाळेचे काम सुरूही आहे. मात्र, या शैक्षणिक वर्षात शाळेचे काम पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या इमारतीमध्येच अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे नव्या शाळेच्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण

शिवमंदिर परिसरात नगरपालिकेची नऊ नंबरची शाळा सुरू आहे. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय असून, पटसंख्या १७५ आहे. तसेच, बालवर्गात २८ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

शाळेसमोर मातीचे ढिगारे

शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या मातीचे ढिगारे शाळेच्या समोर पसरले असून, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्या तून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जावे लागते.

गेल्या महिन्यांत झाली चोरी

शाळेमध्ये मागील महिन्यात चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी लोखंडी खुर्च्या, सीसी कॅमेरा, संगणकाच्या आवश्यक वस्तू, याशिवाय अंगणवाडीतील मुलांना बसण्यासाठी आणलेल्या चटयाही पळवून नेल्या आहेत.

कल्याण - मलंग परिसरातील नेवाळी नाका परिसरातील संत सावळाराम महाराज म्हात्रे या खासगी मराठी शाळेत बुधवारी (दि. २) पावसाचे पाणी शिरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही शाळा रस्त्याच्या जवळ आहे. या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. त्यामुळे रस्ता उंच, तर शाळेचा परिसर सखल भागात आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही.

पाऊस पडल्यावर पावसाचे पाणी शाळेत शिरते. पावसाचे सांडपाणी शाळेच्या वर्गात शिरल्याने वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शाळेत सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सांडपाणी साचत असून, त्याचा निचरा होत नाही. या प्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल सरकारी यंत्रणांकडून घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.