शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

भिवंडीच्या तोंडाला नेत्यांनीच पुसली पाने, मेट्रो जाणार शहराबाहेरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 02:01 IST

भिवंडी : ठाण्याहून कल्याणला जाणारी मेट्रो भिवंडी रोड रेल्वे स्थानकापर्यंत न्यावी, ही मागणी फेटाळली गेल्यानंतर किमान ही मेट्रो शहरातून जावी, ही मागणीही मान्य झालेली नाही.

भिवंडी : ठाण्याहून कल्याणला जाणारी मेट्रो भिवंडी रोड रेल्वे स्थानकापर्यंत न्यावी, ही मागणी फेटाळली गेल्यानंतर किमान ही मेट्रो शहरातून जावी, ही मागणीही मान्य झालेली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारापुरते मेट्रोचे गाजर दाखवण्यात आले आणि आता तोंडाला पाने पुसली, अशी भावना नागरिकांची झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने या मेट्रोला मान्यता दिल्यावर तिचा नकाशा आणि मार्ग उघड झाला. त्यातून फसवणूक झाल्याचे चित्रही उभे राहिले. केवळ बिल्डरांच्या भल्यासाठी मेट्रो शहराबाहेरून वळवल्याचा आरोप आता सुरू झाला आहे.राज्यात काँग्रेसची सत्ता असताना मंत्री भाऊसाहेब वर्तक व खासदार भाऊसाहेब धामणकर यांनी ठाणे ते डहाणू रेल्वे भिवंडी शहरातून नेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला गती मिळाली नाही. त्यानंतर शहरातील कापड उद्योगाला गती मिळावी, यासाठी दिवा-वसई रोडदरम्यान भिवंडी रोड रेल्वेस्थानक सुरू झाले. पण तेथे प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीस प्राधान्य देण्यात आले. बºयाच आंदोलनांनंतर, इशाºयानंतर त्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली. पण तेथील फेºयांतही लक्षणीय वाढ झालेली नाही.ठाणे- भिवंडी- कल्याण हा मेट्रोचा पाचवा टप्पा कापुरबावडी- अंजूरफाटा ते गोपाळनगर आणि पुढे कल्याणला जाईल, असे निवडणुकीच्या काळात सांगितले जात होते. आता ही मेट्रो अंजूरफाटा येथून ओसवालवाडी ताडालीमार्गे गणेशनगर- टेमघर अशी शहराबाहेरून कल्याण जाईल. त्यामुळे भिवंडीतील रहिवाशांना तिचा काहीच उपयोग नाही. पूर्वी भिवंडी रोड रेल्वेसाठी अंजूरफाटा गाठावा लागायचा, आता मेट्रोसाठी तेथे जावे लागणार आहे. त्यामुळे भिवंडीतील वाहतुकीची परवड कायम राहणार आहे.>भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत मेट्रोचे श्रेय घेण्यावरून भाजपा-शिवसेनेत जुंपली होती. ही मेट्रो शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कसे सोडवेल, त्यातून भिवंडीत विकासाची गंगा कशी वाहील, सुलभ प्रवासाचे साधन कसे उपलब्ध होईल, ते सांगितले जात होते.

टॅग्स :Metroमेट्रोbhiwandiभिवंडी