शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भिवंडीच्या तोंडाला नेत्यांनीच पुसली पाने, मेट्रो जाणार शहराबाहेरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 02:01 IST

भिवंडी : ठाण्याहून कल्याणला जाणारी मेट्रो भिवंडी रोड रेल्वे स्थानकापर्यंत न्यावी, ही मागणी फेटाळली गेल्यानंतर किमान ही मेट्रो शहरातून जावी, ही मागणीही मान्य झालेली नाही.

भिवंडी : ठाण्याहून कल्याणला जाणारी मेट्रो भिवंडी रोड रेल्वे स्थानकापर्यंत न्यावी, ही मागणी फेटाळली गेल्यानंतर किमान ही मेट्रो शहरातून जावी, ही मागणीही मान्य झालेली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारापुरते मेट्रोचे गाजर दाखवण्यात आले आणि आता तोंडाला पाने पुसली, अशी भावना नागरिकांची झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने या मेट्रोला मान्यता दिल्यावर तिचा नकाशा आणि मार्ग उघड झाला. त्यातून फसवणूक झाल्याचे चित्रही उभे राहिले. केवळ बिल्डरांच्या भल्यासाठी मेट्रो शहराबाहेरून वळवल्याचा आरोप आता सुरू झाला आहे.राज्यात काँग्रेसची सत्ता असताना मंत्री भाऊसाहेब वर्तक व खासदार भाऊसाहेब धामणकर यांनी ठाणे ते डहाणू रेल्वे भिवंडी शहरातून नेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला गती मिळाली नाही. त्यानंतर शहरातील कापड उद्योगाला गती मिळावी, यासाठी दिवा-वसई रोडदरम्यान भिवंडी रोड रेल्वेस्थानक सुरू झाले. पण तेथे प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीस प्राधान्य देण्यात आले. बºयाच आंदोलनांनंतर, इशाºयानंतर त्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली. पण तेथील फेºयांतही लक्षणीय वाढ झालेली नाही.ठाणे- भिवंडी- कल्याण हा मेट्रोचा पाचवा टप्पा कापुरबावडी- अंजूरफाटा ते गोपाळनगर आणि पुढे कल्याणला जाईल, असे निवडणुकीच्या काळात सांगितले जात होते. आता ही मेट्रो अंजूरफाटा येथून ओसवालवाडी ताडालीमार्गे गणेशनगर- टेमघर अशी शहराबाहेरून कल्याण जाईल. त्यामुळे भिवंडीतील रहिवाशांना तिचा काहीच उपयोग नाही. पूर्वी भिवंडी रोड रेल्वेसाठी अंजूरफाटा गाठावा लागायचा, आता मेट्रोसाठी तेथे जावे लागणार आहे. त्यामुळे भिवंडीतील वाहतुकीची परवड कायम राहणार आहे.>भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत मेट्रोचे श्रेय घेण्यावरून भाजपा-शिवसेनेत जुंपली होती. ही मेट्रो शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कसे सोडवेल, त्यातून भिवंडीत विकासाची गंगा कशी वाहील, सुलभ प्रवासाचे साधन कसे उपलब्ध होईल, ते सांगितले जात होते.

टॅग्स :Metroमेट्रोbhiwandiभिवंडी