शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील प्रचारात बळीराम जाधवांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:22 IST

रिक्षा सर्वसामान्यांना परिचयाची; अवघ्या १२ दिवसात पिंजली शेकडो गावे

पालघर : मतदारसंघातील प्रचाराला चांगलाच वेग आला असून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.त्यांचे हजारो कार्यकर्ते उन्हातान्हात प्रचार करत आहेत.त्यांना यंदा शिटटी ऐवजी रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले असून ते त्यांना फायदेशीर ठरत आहे.रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा त्यांना वरदान ठरल्या आहेत.त्यांचे शिट्टी हे चिन्ह गोठवण्याचा आयोगाने घेतलेला निर्णय देखील त्यांच्या पथ्यावर पडला आहे.त्यांचे नेते आ.हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या १२ दिवसात वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर,डहाणू व विक्र मगड या सहा विधानसभा क्षेत्रातील हजारो गावपाडे अक्षरश: पिंजून काढले. मतदारांचा मिळणार्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.नालासोपारा येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत आ.ठाकूर यांच्यावर झालेल्या टीकेमुळे वसईकरानी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्याचे पडसाद मतदानाच्या दिवशी उमटतील असा अंदाज आहे.त्यामुळे सेनेच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण पावणे एकोणीस लाख मतदारांपैकी १० लाख मतदार वसई,नालासोपारा व बोईसर या ३ विधानसभा मतदारसंघात असून या तिन्ही मतदारसंघावर आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. ते मोडून काढणे आजवर कोणालाही शक्य झाले नाही. गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३ दिवस नालासोपार्यात डेरा टाकला होता,परंतु त्यांनाही हात टेकावे लागले होते. यंदाही युतीने तसेच प्रयत्न सुरू ठेवले आहेत.विविध राज्यातील नेत्यांना वसईत पाचारण करण्यात येणार आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज येणार होते,परंतु काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला,व त्यांच्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पाठवण्यात आले.गेल्या खेपेस बविआला एकूण मतदानापैकी ५३ टक्के मते याभागात मिळाली होती,त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.हितेंद्र ठाकूर यांची राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारावर टीकागेल्या काही दिवसात आ.ठाकूर यांनी वसई व नालासोपारा येथे झालेल्या सभेत केंद्र व राज्य सरकारच्या दिशाहीन कारभारावर जोरदार टीका केली.ते आपल्या भाषणात म्हणाले,हे सरकार केवळ मूठभर उद्योगपतींचे हित जपणारे सरकार आहे.नोटबंदीचा फायदा केवळ धनदांडग्यांना झाला,सर्वसामान्य माणूस मात्र सरकारच्या या निर्णयाचा बळी ठरला. १५ लाख तर आले नाहीत,पण जनधन योजनेची खाती ज्यांनी उघडली होती ती आता बंद करण्यात आली असून लोकांचे पैसे बुडीत खात्यात जमा झाले.अशा या सरकारला जनतेचे सरकार म्हणता येईल का ? आज सातीवली,वालीव,जूचंद्र व नालासोपारा पूर्व येथे झालेल्या सभेला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून युतीच्या नेत्याचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर