शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

पालघरमधील प्रचारात बळीराम जाधवांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:22 IST

रिक्षा सर्वसामान्यांना परिचयाची; अवघ्या १२ दिवसात पिंजली शेकडो गावे

पालघर : मतदारसंघातील प्रचाराला चांगलाच वेग आला असून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.त्यांचे हजारो कार्यकर्ते उन्हातान्हात प्रचार करत आहेत.त्यांना यंदा शिटटी ऐवजी रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले असून ते त्यांना फायदेशीर ठरत आहे.रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा त्यांना वरदान ठरल्या आहेत.त्यांचे शिट्टी हे चिन्ह गोठवण्याचा आयोगाने घेतलेला निर्णय देखील त्यांच्या पथ्यावर पडला आहे.त्यांचे नेते आ.हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या १२ दिवसात वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर,डहाणू व विक्र मगड या सहा विधानसभा क्षेत्रातील हजारो गावपाडे अक्षरश: पिंजून काढले. मतदारांचा मिळणार्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.नालासोपारा येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत आ.ठाकूर यांच्यावर झालेल्या टीकेमुळे वसईकरानी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्याचे पडसाद मतदानाच्या दिवशी उमटतील असा अंदाज आहे.त्यामुळे सेनेच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण पावणे एकोणीस लाख मतदारांपैकी १० लाख मतदार वसई,नालासोपारा व बोईसर या ३ विधानसभा मतदारसंघात असून या तिन्ही मतदारसंघावर आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. ते मोडून काढणे आजवर कोणालाही शक्य झाले नाही. गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३ दिवस नालासोपार्यात डेरा टाकला होता,परंतु त्यांनाही हात टेकावे लागले होते. यंदाही युतीने तसेच प्रयत्न सुरू ठेवले आहेत.विविध राज्यातील नेत्यांना वसईत पाचारण करण्यात येणार आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज येणार होते,परंतु काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला,व त्यांच्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पाठवण्यात आले.गेल्या खेपेस बविआला एकूण मतदानापैकी ५३ टक्के मते याभागात मिळाली होती,त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.हितेंद्र ठाकूर यांची राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारावर टीकागेल्या काही दिवसात आ.ठाकूर यांनी वसई व नालासोपारा येथे झालेल्या सभेत केंद्र व राज्य सरकारच्या दिशाहीन कारभारावर जोरदार टीका केली.ते आपल्या भाषणात म्हणाले,हे सरकार केवळ मूठभर उद्योगपतींचे हित जपणारे सरकार आहे.नोटबंदीचा फायदा केवळ धनदांडग्यांना झाला,सर्वसामान्य माणूस मात्र सरकारच्या या निर्णयाचा बळी ठरला. १५ लाख तर आले नाहीत,पण जनधन योजनेची खाती ज्यांनी उघडली होती ती आता बंद करण्यात आली असून लोकांचे पैसे बुडीत खात्यात जमा झाले.अशा या सरकारला जनतेचे सरकार म्हणता येईल का ? आज सातीवली,वालीव,जूचंद्र व नालासोपारा पूर्व येथे झालेल्या सभेला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून युतीच्या नेत्याचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर