शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांचा ठाण्याला ‘जय महाराष्ट्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 05:55 IST

आता मी माझे पद सोडत आहे, असे त्यांनी जाहीर केले. हे सांगताना भावुक झालेल्या आयुक्तांनी आता आपण ध्यानसाधनेसाठी जात असल्याचे सांगून ठाण्याला जय महाराष्ट्र केला.

ठाणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पूर्णविराम दिला. पाच वर्षे दोन महिने ठाण्यासाठी खूप केले. स्वप्नातही ठाण्याचा विकासच पाहिला. ठाणेकरांच्या प्रेमापोटीच मी हे करू शकलो. या कार्यकाळात काही कामे अपूर्ण राहिली असतील. काही चुका झाल्या असतील, त्या मी मान्य करतो. परंतु, आता मी माझे पद सोडत आहे, असे त्यांनी जाहीर केले. हे सांगताना भावुक झालेल्या आयुक्तांनी आता आपण ध्यानसाधनेसाठी जात असल्याचे सांगून ठाण्याला जय महाराष्ट्र केला.काही दिवसांपूर्वी आयुक्त आणि अधिकाऱ्यांत व्हॉट्सअ‍ॅपवर वाद रंगल्याने व्यथित झाले होते. त्यामुळे ते ठाणे सोडणार असल्याची चर्चा सुरूझाली होती. दुसरीकडे, त्यांना ६ महिने वाढीव मुदत मिळणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. अखेर, आयुक्तांनी स्वत:च हे पद सोडत असून मन:शांतीसाठी धर्मशाळा, हृषीकेशला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. ठाण्याच्या विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले. काही पूर्ण झाले, तर काही अपूर्ण आहेत. काही प्रकल्पांवरून एकमत झाले, तर काहींवरून मतभेदही झालेले आहेत. मात्र, ते वैयक्तिक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका