शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मागील पाच वर्षे उद्योजकांसाठी पूरक तर शेतकऱ्यांसाठी ठरली मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 05:00 IST

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग

उद्योजकांना सवलती, कृषी योजनांना कात्रीमोदी सरकारने आपल्या कार्यकाळात उद्योजकांवर सवलतीचा पाऊस पाडला, मात्र कृषी क्षेत्रात आणि शेतकरी यांना वाºयावर सोडले आहे. उद्योजकांना कोट्यावधींचे कर्ज माफ केले जात आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परत फेडीसाठी बँका, विविध सहकारी सोसायटी तगादा लाऊन मानसिक त्रास देतात. त्यामुळे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारने कृषी व शेतकºयांना न्याय दिला पाहिजे. शेतकºयाला आर्थिक संकटातून बाहेर काढले पाहिजे.- बाळू चौधरी, कोशिंबे, भिवंडीकृषी विभागाच्या योजनांचा लाभसरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना मिळाला आहे. मुद्रा योजना, विमा कृषी, रोजगार निर्मिती, रोजगार हमी योजना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, सिंचन योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला आहे. शिक्षणाकरिता अधिक तुकड्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य माणसेही समाधानी आहेत. शेतकºयांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ काही प्रमाणात मिळाला आहे. त्या मोठ्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे- राजू चौधरी, मराडेपाडा, भिवंडी.योजना सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचेकेंद्र व राज्य सरकारने अनेक योजना आणल्या. मी माझ्या शेतावर सरकारी योजनेमधून विहीर खोदून कृषीपंप बसवला आहे. भातपिकासह भाजीपाला पिकवतो. गावातील नागरिकांना पाणी पुरवले जाते. वीटभट्टी व्यवसायही त्यावर सुरू आहे. भेंडी, गवार, ढोबळी मिरची या भाजीपाला पिकांसह झेंडू, मोगरा यांची लागवड केल्याने त्याचा फायदा मला झाला. सरकारच्या असलेल्या योजना सर्व शेतकºयांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्या पोहचल्या तरच शेतकरी खºया अर्थाने समाधानी होईल.- महादू घोडविंदे, सूर्यानगर, भिवंडीयोजना राबविण्यातमोदी सरकार अपयशीदेशातील जास्तीतजास्त नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. मोदी सरकारने शेती व्यवसायासाठी पूरक योजना आणल्या नाहीत. ग्रामीण भागातील शेतकºयांचा फायदा होईल अशी कोणतीच योजना या सरकारने आणली नाही. शेतीमालाला हमीभाव देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीची योजना राबवली पण त्या योजनेची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. मोठ्या योजनांमध्ये एका विशिष्ट वर्गाने भ्रष्टाचारी मार्गाने खूप पैसा कमवलाआहे. एकंदरीत पाच वर्षे मोठ्या उद्योजकांसाठी पूरक ठरली आहेत व शेतकºयांसाठी मारक. - सुरेश देसले, अवलोटे, भिवंडीहमीभाव न मिळाल्याने शेतकरी नाराजशेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने तो नाराज आहे. शेतकºयांना लागणारी अवजारे, त्यासाठी असणाºया योजना या शेतकºयांपर्यंत पोहचायला हव्यात. मात्र अशा कोणत्याही योजना गरीब शेतकºयांपर्यंत पोहचतच नाहीत. भिवंडी तालुका कृषी कार्यालय व भिवंडी पंचायत समिती कृषी विभागाच्या योजना अधिकारी, पर्यवेक्षक धनदांडग्या शेतकºयांना लाभ देत असल्याने गरीब शेतकºयांना फायदा होत नाही. त्यामुळे आम्हा शेतकºयांना ही सवलत मिळत नाहीत. .- महेंद्र भोईर, शेडगाव, भिवंडी 

टॅग्स :FarmerशेतकरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक