शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

अवघ्या सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ११ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:38 IST

उष्णतेचा पारा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात मे महिन्यात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या १४ दिवसांत १९ ने वाढली आहे.

ठाणे : उष्णतेचा पारा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात मे महिन्यात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या १४ दिवसांत १९ ने वाढली आहे. तर, २३ एप्रिल ते १४ मे दरम्यान पाच जण दगावल्याची माहिती पुढे आल्याने जानेवारी ते १४ मे या सव्वाचार महिन्यांत ११ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. गतवर्षात या काळात एकाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू सोडा, पण एकही बाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी ते १४ मे २०१९ या कालावधीत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या रु ग्णांचा आकडा १६७ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या एकूण १० वॉर्डांमध्ये याचदरम्यान ४१ हजार १४७ जणांची तपासणी केली. यामध्ये २८ हजार ३७९ नवी मुंबईकरांनी तपासणी करून आघाडी घेतली आहे. मात्र, एकही जण दगावला नसून अवघे १६ रुग्ण बाधित असल्याचे पुढे आले. त्यातील दोन उपचारार्थ दाखल असून १३ जणांना घरी सोडण्यात आले. यापाठोपाठ ठाणे जिल्हा रु ग्णालयात चार हजार ६५० जणांनी तपासणी केली. उल्हासनगर येथे तीन हजार ५४७, ठामपा दोन हजार ४५४, मीरा-भार्इंदर एक हजार ५२०, भिवंडीत ३४५ आणि सर्वात कमी केडीएमसी येथे २४३ जणांनी तपासणी केली आहे.उल्हासनगरसह भिवंडीतएकही रुग्ण नाहीजिल्ह्यातील एकूण ४१ हजार १४७ जणांच्या तपासणीत १७७ संशयित रु ग्ण म्हणून पुढे आल्यावर त्यापैकी १६७ जणांना स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले.यामध्ये ठामपा हद्दीत सर्वाधित ८६, त्यानंतर मीरा-भार्इंदर ३७, कल्याण २६ आणि नवी मुंबई १६ तसेच जिल्हा रु ग्णालयात दोन रु ग्णांचा समावेश आहे. उल्हासनगर तसेच भिवंडी महापालिका हद्दीत अद्याप एकही रु ग्ण आढळून आला नाही.आतापर्यंत १३४ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. यामध्ये ठामपाच्या हद्दीतील ८१, मीरा-भार्इंदर ३३, नवी मुंबई १३, कल्याण सात रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू