शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

एलपीजी शवदाहिनी मोजतेय शेवटच्या घटका, पालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:08 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे.

- राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. देखभाल, दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त करुनही तीची दुरवस्था कशी काय झाली, यावर संभ्रम निर्माण झाला आहे.पालिकेने ही शवदाहिनी बसविण्यासाठी ७० लाखांची तरतूद केली. सुरूवातीला ती भार्इंदर पश्चिमेकडील आंबेडकरनगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत बसविण्यात आली. एकूण २४ एलपीजी सिलिंडरची क्षमता आहे. याा सिलिंडरवर किमान १८ तर कमाल २६ मृतांना अग्नी दिला जातो. एलपीजी शवदाहिनीचा वापर वाढल्याने पालिकेने त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी चिरंतर उद्योग या कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यासाठी कंत्राटदाराला दर महिन्याला ३० हजार दिले जातात. त्यामुळे शवदाहिनीची दुरूस्ती वेळेत व व्यवस्थित चालण्यायोग्य व्हावी, अशी अपेक्षा असतानाही त्याकडे कंत्राटदारासह प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्याने आजमितीस या शवदाहिनीची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने कंत्राटदाराला देखभाल, दुरूस्तीसाठी दिलेली रक्कम गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना एकावेळी सर्व सिलिंडर एकावेळी सुरू करावे लागतात. त्यातून गॅसची गळती होऊ लागल्याने तेथील कर्मचाऱ्याने प्रशासनाला अनेकदा तक्रारी केल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात गॅस गळतीमुळे जिवीतहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या स्मशानाच्या बाजूला भोलानगर व डॉ. आंबेडकर झोपडपट्टी आहे. मृतदेह भट्टीत नेण्यासाठी बसविण्यात आलेली ट्रॉली अनेकदा मध्येच थांबत असल्याने कर्मचाºयांना ती लोखंडी रॉडने ढकलावी लागते. भट्टीतील विटांची दुरवस्था झाली असून खालील भागाला गळती लागली आहे. भट्टीत मृतदेह जळताना त्यातील द्रवपदार्थ बाहेर पडत असल्याचे कर्मचाºयांकडून सांगण्यात येते. त्यामुळे दुरवस्था झालेली एलपीजी शवदाहिनीची त्वरित दुरूस्ती, ते शक्य नसल्यास बंद करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.सिलिंडरचे रेग्युलेटर बदलण्यात आले आहेत. उर्वरित नादुरुस्त भागांची दुरूस्तीचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.- दीपक खांबित, कार्यकारी अभियंतापालिकेच्या भ्रष्ट कारभाराकडे सत्ताधाºयांचाही कानाडोळा होत असल्यानेच एलपीजी शवदाहिनीची दुरवस्था झाली आहे. तीची दुरूस्ती त्वरित व्हावी, अशी अपेक्षा असून अन्यथा काँग्रेस जनआंदोलन छेडेल.- अनिल सावंत, काँग्रेस नगरसेवकअंत्यसंस्कारावेळी स्मशानात गेलो असता एलपीजी शवदाहिनीची दुरवस्था निदर्शनास आली. त्याची कल्पना प्रशासनाला दिल्यानंतरही कार्यवाही झाली नाही. अशा पायाभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होऊ लागल्यास नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची.- अनिल नोटियाल, समाजसेवक

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक