शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

एलपीजी शवदाहिनी मोजतेय शेवटच्या घटका, पालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:08 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे.

- राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. देखभाल, दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त करुनही तीची दुरवस्था कशी काय झाली, यावर संभ्रम निर्माण झाला आहे.पालिकेने ही शवदाहिनी बसविण्यासाठी ७० लाखांची तरतूद केली. सुरूवातीला ती भार्इंदर पश्चिमेकडील आंबेडकरनगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत बसविण्यात आली. एकूण २४ एलपीजी सिलिंडरची क्षमता आहे. याा सिलिंडरवर किमान १८ तर कमाल २६ मृतांना अग्नी दिला जातो. एलपीजी शवदाहिनीचा वापर वाढल्याने पालिकेने त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी चिरंतर उद्योग या कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यासाठी कंत्राटदाराला दर महिन्याला ३० हजार दिले जातात. त्यामुळे शवदाहिनीची दुरूस्ती वेळेत व व्यवस्थित चालण्यायोग्य व्हावी, अशी अपेक्षा असतानाही त्याकडे कंत्राटदारासह प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्याने आजमितीस या शवदाहिनीची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने कंत्राटदाराला देखभाल, दुरूस्तीसाठी दिलेली रक्कम गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना एकावेळी सर्व सिलिंडर एकावेळी सुरू करावे लागतात. त्यातून गॅसची गळती होऊ लागल्याने तेथील कर्मचाऱ्याने प्रशासनाला अनेकदा तक्रारी केल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात गॅस गळतीमुळे जिवीतहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या स्मशानाच्या बाजूला भोलानगर व डॉ. आंबेडकर झोपडपट्टी आहे. मृतदेह भट्टीत नेण्यासाठी बसविण्यात आलेली ट्रॉली अनेकदा मध्येच थांबत असल्याने कर्मचाºयांना ती लोखंडी रॉडने ढकलावी लागते. भट्टीतील विटांची दुरवस्था झाली असून खालील भागाला गळती लागली आहे. भट्टीत मृतदेह जळताना त्यातील द्रवपदार्थ बाहेर पडत असल्याचे कर्मचाºयांकडून सांगण्यात येते. त्यामुळे दुरवस्था झालेली एलपीजी शवदाहिनीची त्वरित दुरूस्ती, ते शक्य नसल्यास बंद करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.सिलिंडरचे रेग्युलेटर बदलण्यात आले आहेत. उर्वरित नादुरुस्त भागांची दुरूस्तीचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.- दीपक खांबित, कार्यकारी अभियंतापालिकेच्या भ्रष्ट कारभाराकडे सत्ताधाºयांचाही कानाडोळा होत असल्यानेच एलपीजी शवदाहिनीची दुरवस्था झाली आहे. तीची दुरूस्ती त्वरित व्हावी, अशी अपेक्षा असून अन्यथा काँग्रेस जनआंदोलन छेडेल.- अनिल सावंत, काँग्रेस नगरसेवकअंत्यसंस्कारावेळी स्मशानात गेलो असता एलपीजी शवदाहिनीची दुरवस्था निदर्शनास आली. त्याची कल्पना प्रशासनाला दिल्यानंतरही कार्यवाही झाली नाही. अशा पायाभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होऊ लागल्यास नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची.- अनिल नोटियाल, समाजसेवक

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक