शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

गेल्या ४ वर्षात भ्रष्टाचाराच्या चौकशीची ७० पैकी ६४ प्रकरणे धूळ खात पडून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 13:31 IST

धीरज परब -  मीरा रोड - एकीकडे भ्रष्टाचार रोखण्याच्या वल्गना राजकीय व प्रशासकीय यंत्रणांकडून केल्या जात असल्या तरी त्या ...

धीरज परब

मीरा रोड - एकीकडे भ्रष्टाचार रोखण्याच्या वल्गना राजकीय व प्रशासकीय यंत्रणांकडून केल्या जात असल्या तरी त्या निव्वळ धूळफेक ठरल्या आहेत. ठाणे, पालघर, रायगड,  रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या ४ वर्षात भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित विभागांना परवानगीसाठी पाठवलेल्या ७० पैकी केवळ ६ प्रकरणांत चौकशीची परवानगी मिळाल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. 

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम १७ मध्ये २०१८ साली केंद्र सरकारने संशोधन करून १७ अ हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या कलमामुळे कोणत्याही अधिकारी - कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करायची असल्यास त्याच्या संबंधित विभागाची परवानगी बंधनकारक केली आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या सबळ पुराव्यासह असंख्य तक्रारी होऊनही अशा प्रकरणांची चौकशीच संबंधित विभागाने परवानगी न दिल्याने केली जात नाही.

 सहाजिकच आहे की ज्या विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आहे तो विभाग चौकशीसाठी परवानगी देईलच कसा? असा सवाल केला जात आहे. कारण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीची परवानगी ७० प्रकरणात संबंधित विभागांकडे पोलिसांनी मागितली होती. 

या ठाणे परिक्षेत्रात ठाणे, पालघर , रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, नवी मुंबई, अलिबाग - रायगड ही विभागीय कार्यालये आहेत.  ठाणे परिक्षेत्रकडे गेल्या ४ वर्षांत भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीं पैकी किती प्रकरणे चौकशीसाठी मंजुरी मिळावी म्हणून पाठवण्यात आली व किती प्रकरणात संबंधित विभागांनी परवानगी दिली याची माहितीही माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी मागितली होती. 

ठाणे परिक्षेत्राकडून त्यांना याबाबत उत्तर मिळाले की , भ्रष्टाचाराच्या ७० तक्रारीं प्रकरणी संबंधित विभागांकडे चौकशीसाठी परवानगी मागितली होती . परंतु ७० पैकी केवळ ६ प्रकरणातच संबंधित विभागांकडून परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल ६४ प्रकरणे ही संबंधित विभागांनी परवानगी दिली नाही म्हणून चौकशी अभावी धूळ खात पडून आहेत असे स्पष्ट झाले आहे. 

कृष्णा गुप्ता ( माहिती अधिकार कार्यकर्ता ) - लोकांसमोर भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराची चौकशीच होऊ नये यासाठी कायद्यात चुकीची दुरुस्ती केंद्र सरकारने केली आहे. भ्रष्टाचाराच्या तक्रारी तर असंख्य आहेत. पण लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या ठाणे परिक्षेत्रातील पोलिसांना गेल्या ५ वर्षात त्यातील ७० प्रकरणांची चौकशी करावीशी वाटली. पण संबंधित विभाग परवानगी देत नाही म्हणून चौकशीच करता येत नसणे भ्रष्टाचारास संरक्षण देण्यासारखे आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताRight to Information actमाहिती अधिकार