शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
2
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
3
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
4
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
5
"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
6
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
7
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
8
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
9
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
10
Bigg Boss Marathi 6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
11
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
12
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
13
कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार?
14
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
15
अमरावतीतील गावात सायंकाळी भोंगा वाजला की बंद होतात मोबाइल, टीव्ही; राज्यभर 'या' गावाची का आहे चर्चा ?
16
'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
17
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
18
आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video
19
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
20
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
Daily Top 2Weekly Top 5

Thane Landslide: ठाण्यात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू; दोघांना वाचविण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:46 IST

landslide in Thane: घोलाई नगर परिसरात चर्चच्या बाजूला असलेल्या तीन घरांवर सोमवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अचानक दरड कोसळली.

Kalwa Ghorai LandSlide ठाणे  : मुंबईतील चेंबुर, विक्रोळी भागात घडलेल्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील कळवा, घोलाईनगर भागात डोंगरावरील दरड एका घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी आपत्ती विभागाचे कर्मचारी येण्यापूर्वी दोन जणांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर लागलीच या घटनेची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानुसार बचावकार्य सुरु झाले. मात्र ढिगा:याखाली अडकल्याने एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. यामध्ये पती पत्नी आणि त्यांची लहान मुलांचा समावेश आहे. तर त्यांच्या कुटुंबातील एक पाच वर्षीय मुलगी आणि अचल यादव (१८) हे बचावले आहेत.landslide in Thane's Kalwa Ghorai; 5 death)

या दुर्देवी घटनेत प्रभु सुदाम यादव (४५), त्यांच्या पत्नी विद्यादेवी यादव (४०) यांच्यासह रविकिशन यादव (१२), सिमरन यादव (१०), संध्या यादव (०३) यांचा या दुर्देवी घटनेत मृत्यु झाला आहे. शनिवारी रात्री पासून बरसत असलेल्या पावसाचा फटका अखेर ठाण्यालाही बसल्याचे दिसून आले आहे. सोमवारी दिवसभरात १३३.०७ मीमी पावसाची नोंद झाली असतांनाच दुपारी कळव्यातील घोलाई नगर भागातील दुर्गा चाळ या भागात दुपारी १२.३० च्या सुमारास दरड कोसळली आणि त्यात एकाच कुटुंबातील सात जण ढिगाऱ्याखाली अडकले. परंतु याची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील दोघांना सुखरुप बाहेर काढले. यात ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ, अग्निशमन दलाचे पथक, अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवळ जवळ चार तास बचावकार्य सुरु होते. डोंगराच्या वरील बाजूवरील दरड वेगाने खाली घरावर पडल्याने पावसात हे बचावकार्य सुरु झाले. त्यानंतर पाचही जणांना बाहेर काढण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यु झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

दुर्देवाची बाब म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत पती, पत्नी आणि त्यांची १२ मुलगा, १० आणि तीन वर्षीय मुलगी यांचा दुर्देवी अंत झाला आहे. तर त्यांच्या कुटुंबातील १८ वर्षीय मुलगा आणि त्याची पाच वर्षीय बहीण बचावली आहे.

१५० कुटुंबाना शाळेत हलविलेयेथील डोंगरावर वर पासून खाल र्पयत घरे आहेत, परंतु आता दरड कोसळल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील तब्बल १५० कुटुंबांना घोलाई नगर भागातील महापालिकेच्या शाळेत हलविण्यात आले आहे.

 मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता चेंबूर येथील न्यू भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. त्यामुळे चार ते पाच घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाशांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले आहेत. १४ मृतांची ओळख पटली आहे. 

टॅग्स :landslidesभूस्खलनthaneठाणेRainपाऊस