शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

विरार-अलिबाग महामार्गासाठी होणार भूसंपादन , ७० हेक्टर शेतजमीन ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:18 IST

विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्यातील पाली

- सुरेश लोखंडेठाणे : विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्यातील पाली, ना-हेण आणि कारवली गावातील शेतकºयांच्या सुमारे चार लाख ६४ हजार ६१६.५९ चौरस मीटर म्हणजेच सुमारे ४६.४६१६६ हेक्टर शेतजमिनीच्या भूसंपादनासाठी संमतीपत्रे घेण्याचे काम सुरू झाले आहे.चोहोबाजूने खाडीने वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास लोहमार्गासह आता महामार्गांनीदेखील मगरमिठी मारायला घेतली आहे. समृद्धी महामार्गासह गुजरात बडोदरा-जेएनपीटी महामार्ग आणि आता विरार-अलिबाग सुमारे १२१ किमीचा महामार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.संपादित होणाºया या शेतजमिनीपैकी सुमारे ४६.४६१६६ हेक्टर शेतजमिनीच्या संपादनासाठी पाली, नाºहेण व कारवले येथील शेतकºयांची संमतीपत्रे घेतली जात आहेत. यामध्ये पाली येथील शेतकºयांच्या सुमारे ६.६५८४०१ हेक्टर शेतजमिनीसह नाºहेणच्या शेतकºयांची सुमारे २१.७२६०.३७ हेक्टर आणि कारवले येथील १८.०७७२२२ हेक्टर शेतजमीन जात आहे. सुमारे १२१ किमी लांबीचा हा मिनी महामार्ग बहुउद्देशीय मार्गिका म्हणजेच कॉरिडॉर महामार्गासाठी वापरला जाणार आहे. थेट अलिबाग बंदराला जोडलेला हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे सुमारे साडेचार तासांचा प्रवास अवघ्या एक ते दीड तासाच्या कालावधीत पार करता येणार आहे. जेएनपीटी कॉरिडॉरच्या आधी हा महामार्ग तयार होत आहे. या शेतजमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने एमएमआरडीए संपादन करत आहे. जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायद्याच्या तरतुदीस अनुसरून एमएमआरडीएच्या नावे या जमिनीची खरेदी होत आहे.‘विरार-अलिबाग महामार्ग जमिनीसाठी बाजारबोली’अलिबाग समुद्रातील बंदरास जोडण्यासाठी एमएमआरडीएद्वारे विरार-अलिबाग ही बहुउद्देशीय मार्गिका (महामार्ग) तयार करण्यात येत आहे. याबाबत ‘विरार-अलिबाग महामार्ग जमिनीसाठी बाजारबोली’ या मथळ्याखाली लोकमतने २२ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून संबंधित हालचाली उघड केल्या होत्या. यानुसार, प्रथम अंबरनाथ तालुक्यातील पाली, नाºहेण आणि कारवली या तीन गावांमधील शेतकºयांकडून त्यांच्या शेतजमिनी संपादनासाठी नोटीस देऊन संमतीपत्रे भरून घेण्याचे काम उल्हासनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग