शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

विरार-अलिबाग महामार्गासाठी होणार भूसंपादन , ७० हेक्टर शेतजमीन ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:18 IST

विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्यातील पाली

- सुरेश लोखंडेठाणे : विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्यातील पाली, ना-हेण आणि कारवली गावातील शेतकºयांच्या सुमारे चार लाख ६४ हजार ६१६.५९ चौरस मीटर म्हणजेच सुमारे ४६.४६१६६ हेक्टर शेतजमिनीच्या भूसंपादनासाठी संमतीपत्रे घेण्याचे काम सुरू झाले आहे.चोहोबाजूने खाडीने वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास लोहमार्गासह आता महामार्गांनीदेखील मगरमिठी मारायला घेतली आहे. समृद्धी महामार्गासह गुजरात बडोदरा-जेएनपीटी महामार्ग आणि आता विरार-अलिबाग सुमारे १२१ किमीचा महामार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.संपादित होणाºया या शेतजमिनीपैकी सुमारे ४६.४६१६६ हेक्टर शेतजमिनीच्या संपादनासाठी पाली, नाºहेण व कारवले येथील शेतकºयांची संमतीपत्रे घेतली जात आहेत. यामध्ये पाली येथील शेतकºयांच्या सुमारे ६.६५८४०१ हेक्टर शेतजमिनीसह नाºहेणच्या शेतकºयांची सुमारे २१.७२६०.३७ हेक्टर आणि कारवले येथील १८.०७७२२२ हेक्टर शेतजमीन जात आहे. सुमारे १२१ किमी लांबीचा हा मिनी महामार्ग बहुउद्देशीय मार्गिका म्हणजेच कॉरिडॉर महामार्गासाठी वापरला जाणार आहे. थेट अलिबाग बंदराला जोडलेला हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे सुमारे साडेचार तासांचा प्रवास अवघ्या एक ते दीड तासाच्या कालावधीत पार करता येणार आहे. जेएनपीटी कॉरिडॉरच्या आधी हा महामार्ग तयार होत आहे. या शेतजमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने एमएमआरडीए संपादन करत आहे. जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायद्याच्या तरतुदीस अनुसरून एमएमआरडीएच्या नावे या जमिनीची खरेदी होत आहे.‘विरार-अलिबाग महामार्ग जमिनीसाठी बाजारबोली’अलिबाग समुद्रातील बंदरास जोडण्यासाठी एमएमआरडीएद्वारे विरार-अलिबाग ही बहुउद्देशीय मार्गिका (महामार्ग) तयार करण्यात येत आहे. याबाबत ‘विरार-अलिबाग महामार्ग जमिनीसाठी बाजारबोली’ या मथळ्याखाली लोकमतने २२ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून संबंधित हालचाली उघड केल्या होत्या. यानुसार, प्रथम अंबरनाथ तालुक्यातील पाली, नाºहेण आणि कारवली या तीन गावांमधील शेतकºयांकडून त्यांच्या शेतजमिनी संपादनासाठी नोटीस देऊन संमतीपत्रे भरून घेण्याचे काम उल्हासनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग