शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Thane News: दिव्यातील पाणी समस्या; पाण्यासाठी भाजपचा महापालिकेवर हंडा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:35 IST

Thane News: दिव्याला मंजुर असलेल्या पाण्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत आहे. मागील कित्येक वर्षापासून सुरु असलेले रिमॉडेलींगचे कामही अपूर्ण आहे.

ठाणे  - दिव्याला मंजुर असलेल्या पाण्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत आहे. मागील कित्येक वर्षापासून सुरु असलेले रिमॉडेलींगचे कामही अपूर्ण आहे. तसेच सत्ताधा-यांच्या मर्जीनुसार येथे पाण्याचे वॉल खुले केले जातात, अशा वॉलमनची बदली करण्यात यावी आदींसह पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी या मागणीसाठी बुधवारी दिव्यातील रहिवाशांसह भाजपने ठाणो महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी एका महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे. मात्र तरीसुध्दा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र पालिका अधिका-यांना खुर्चीत बसू दिले जाणार नसल्याचा गंभीर इशारा माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी यावेळी दिली.

 नितीन कंपनी ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिका मुख्यालयासमोर आल्यानंतर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच यावेळी हातात आणलेले मडकी फोडून दिवा वासियांनी प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर भाजपच्या शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी पाण्याची समस्या केव्हा सुटणार, रिमॉडेलींगचे काम का थांबले, ते केव्हा पूर्ण होणार, कोणत्या कारणासाठी हे काम थांबले आहे, किती टक्के काम पूर्ण झाले असा अनेक सवाल यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर एमआयडीसीकडून दिव्याला वाढीव पाणी मिळणार आहे, सध्या या भागासाठी 35 दशलक्ष लीटर पाणी मंजुर असून 29 दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. जलवाहीनी टाकण्याचे काम सध्या अपूर्ण आहे, त्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल असा दावा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी विकास ढोले यांनी केला. परंतु हे काम केव्हा पूर्ण होणार, एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळेल असे सांगितले जात असले तरी जे मंजुर आहे, तेवढे पाणी तर द्या अशी मागणीही यावेळी या शिष्ठमंडळाने केली. तर ठेकेदाराचे ६५ कोटींचे बील देणो शिल्लक असल्याने हे काम मार्गी लागू शकले नसल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. परंतु हे बील कधी अदा केले जाणार असा सवालही यावेळी चव्हाण यांनी केला. त्यानुसार लवकरच हे बील अदा केले जाणार असून शिल्लक कामही येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. त्यानुसार शिष्ठमंडळाने हे आश्वासन मान्य करीत आंदोलन मागे घेतले.

नवीन कनेक्शनसाठी १ लाख, टॅंकर माफीयांचा सुळसुळाटदिव्यात नवीन कनेक्शन हवे असल्याने त्यासाठी माजी नगरसेवकांची माणसे एक लाख रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप यावेळी दिवा मंडल अध्यक्ष रोहीदास मुंढे यांनी केला. तसेच टॅंकर माफीया देखील पाणी चोरुन विकत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अन्यथा अधिका-यांना खुर्चीवर बसू देणार नाही दिव्याची पाणी समस्या एका महिन्यात मार्गी लागली नाही तर महापालिका अधिका:यांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही. असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपाdivaदिवा