शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

Thane News: दिव्यातील पाणी समस्या; पाण्यासाठी भाजपचा महापालिकेवर हंडा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:35 IST

Thane News: दिव्याला मंजुर असलेल्या पाण्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत आहे. मागील कित्येक वर्षापासून सुरु असलेले रिमॉडेलींगचे कामही अपूर्ण आहे.

ठाणे  - दिव्याला मंजुर असलेल्या पाण्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत आहे. मागील कित्येक वर्षापासून सुरु असलेले रिमॉडेलींगचे कामही अपूर्ण आहे. तसेच सत्ताधा-यांच्या मर्जीनुसार येथे पाण्याचे वॉल खुले केले जातात, अशा वॉलमनची बदली करण्यात यावी आदींसह पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी या मागणीसाठी बुधवारी दिव्यातील रहिवाशांसह भाजपने ठाणो महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी एका महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे. मात्र तरीसुध्दा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र पालिका अधिका-यांना खुर्चीत बसू दिले जाणार नसल्याचा गंभीर इशारा माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी यावेळी दिली.

 नितीन कंपनी ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिका मुख्यालयासमोर आल्यानंतर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच यावेळी हातात आणलेले मडकी फोडून दिवा वासियांनी प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर भाजपच्या शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी पाण्याची समस्या केव्हा सुटणार, रिमॉडेलींगचे काम का थांबले, ते केव्हा पूर्ण होणार, कोणत्या कारणासाठी हे काम थांबले आहे, किती टक्के काम पूर्ण झाले असा अनेक सवाल यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर एमआयडीसीकडून दिव्याला वाढीव पाणी मिळणार आहे, सध्या या भागासाठी 35 दशलक्ष लीटर पाणी मंजुर असून 29 दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. जलवाहीनी टाकण्याचे काम सध्या अपूर्ण आहे, त्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल असा दावा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी विकास ढोले यांनी केला. परंतु हे काम केव्हा पूर्ण होणार, एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळेल असे सांगितले जात असले तरी जे मंजुर आहे, तेवढे पाणी तर द्या अशी मागणीही यावेळी या शिष्ठमंडळाने केली. तर ठेकेदाराचे ६५ कोटींचे बील देणो शिल्लक असल्याने हे काम मार्गी लागू शकले नसल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. परंतु हे बील कधी अदा केले जाणार असा सवालही यावेळी चव्हाण यांनी केला. त्यानुसार लवकरच हे बील अदा केले जाणार असून शिल्लक कामही येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. त्यानुसार शिष्ठमंडळाने हे आश्वासन मान्य करीत आंदोलन मागे घेतले.

नवीन कनेक्शनसाठी १ लाख, टॅंकर माफीयांचा सुळसुळाटदिव्यात नवीन कनेक्शन हवे असल्याने त्यासाठी माजी नगरसेवकांची माणसे एक लाख रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप यावेळी दिवा मंडल अध्यक्ष रोहीदास मुंढे यांनी केला. तसेच टॅंकर माफीया देखील पाणी चोरुन विकत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अन्यथा अधिका-यांना खुर्चीवर बसू देणार नाही दिव्याची पाणी समस्या एका महिन्यात मार्गी लागली नाही तर महापालिका अधिका:यांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही. असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपाdivaदिवा