शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वर्तकनगर, नौपाड्यात घरांत चिखल, नालेसफाईत नियोजनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:18 IST

पहिल्याच पावसात १३ ठिकाणी तुंबले पाणी : नालेसफाईत नियोजनाचा अभाव

ठाणे : सोमवारी रात्री एक तासाच्या पावसाने ठाणेकरांची पुरती दैना उडाली. दुसरीकडे पालिकेने केलेल्या कामांची पोलखोलही यावेळी झाली. पहिल्या पावसाताच वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीमध्ये नाल्याचे घाण पाणी आणि गाळ घरात घुसल्याने नागरिकांना रात्रभर हा गाळ उपसावा लागला. मंगळवारी सकाळी म्हाडा वसाहतीच्या बाहेर रस्त्यावर तो तसाच पडून होता. चिखलवाडी परिसरातही

नालेसफाईमध्ये बाहेर काढलेला गाळ घरात शिरला. शहरात तब्बल १३ ठिकाणी एका तासाच्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचले होते.वर्तकनगर येथील जुन्या आणि नव्या म्हाडा वसाहतीमध्ये अक्षरश: नाल्याचे घाण पाणी शिरले होते. ऐन रात्रीमध्ये हा सर्व प्रकार घडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. संपूर्ण रस्त्यावर अक्षरश: गाळाचे आणि घाण पाणी साचले होते. नागरिकांच्या तक्र ारी नंतर रात्री उशिरा पालिका कर्मचाऱ्यांनी गाळ काढण्याचे काम सुरू केले. स्वत: सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. येथील नाल्याची सफाई अजूनही झाली नसून कचरा अजूनही नाल्यात पडून आहे. तर नाल्याच्या एका बाजूला नाल्यातच गाळ साठवून ठेवल्याने पाण्याचा प्रवाह अडून पाणीघरात शिरले, असा आरोप नागरिकांनी केला. या परिसरातील संतोष निकम यांच्या म्हणण्यानुसार नाल्यात तीन ठिकाणी एकाच वेळी कल्व्हर्ट काम सुरू केले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार झाला. याशिवाय नाल्यातील गाळदेखील काढला नसल्याने हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात शिरले. वर्तकनगरच्या विकासासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली जाते. मात्र, नालेसफाईमध्येच सर्व कारभाराचा बोजवारा उडाला आहे. पंडित यांनी सर्व यंत्रणांना स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. नाल्यात जेसीबी घुसवण्यासाठी मातीचा रॅम्प तयार केला होता. तो गाळ नव्हता. त्यामुळेदेखील पाणी अडून ते पाणी रस्त्यावर आले असल्याचे त्यांनी सांगितले.चिखलवाडीत ५0 घरांत पाणीदुसरीकडे नौपाडा भागातील चिखलवाडी परिसरातही नाल्याचे घाण पाणी सुमारे ५० हून अधिक नागरिकांच्या घरात शिरले.त्यामुळे या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे नागरिकांच्या सामानाचेदेखील नुकसान झाले. प्रत्येक पावसात या ठिकाणी पाणी साचते. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात पाणी रस्त्यावर आणि घरात शिरले.झोपपडट्टीचा भाग असल्याने पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना प्रादुर्भाव होण्याची चिन्हे आहेत.अधिकाऱ्यांची कार्यालयात दांडीपावसात प्रत्येक अधिकाºयाने प्रभाग समितीमध्ये राहण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मान्सूनपूर्व बैठकीमध्ये दिले होते. मात्र, आयुक्तांची पाठ फिरताच फारच कमी अधिकारी सोमवारी रात्री प्रभाग समिती कार्यालयात उपस्थित होते. केवळ अधिकाºयांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहितीची देवाणघेवाण सुरू होती. आयुक्त स्वत: व्हॉट्सअपवर परिस्थितीचा आढावा घेत होते. जे अधिकारी प्रत्यक्ष प्रभाग समितीमध्ये उपस्थित नव्हते त्यांची नावे आयुक्तांना कळवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयानेस्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका