शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

वर्तकनगर, नौपाड्यात घरांत चिखल, नालेसफाईत नियोजनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:18 IST

पहिल्याच पावसात १३ ठिकाणी तुंबले पाणी : नालेसफाईत नियोजनाचा अभाव

ठाणे : सोमवारी रात्री एक तासाच्या पावसाने ठाणेकरांची पुरती दैना उडाली. दुसरीकडे पालिकेने केलेल्या कामांची पोलखोलही यावेळी झाली. पहिल्या पावसाताच वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीमध्ये नाल्याचे घाण पाणी आणि गाळ घरात घुसल्याने नागरिकांना रात्रभर हा गाळ उपसावा लागला. मंगळवारी सकाळी म्हाडा वसाहतीच्या बाहेर रस्त्यावर तो तसाच पडून होता. चिखलवाडी परिसरातही

नालेसफाईमध्ये बाहेर काढलेला गाळ घरात शिरला. शहरात तब्बल १३ ठिकाणी एका तासाच्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचले होते.वर्तकनगर येथील जुन्या आणि नव्या म्हाडा वसाहतीमध्ये अक्षरश: नाल्याचे घाण पाणी शिरले होते. ऐन रात्रीमध्ये हा सर्व प्रकार घडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. संपूर्ण रस्त्यावर अक्षरश: गाळाचे आणि घाण पाणी साचले होते. नागरिकांच्या तक्र ारी नंतर रात्री उशिरा पालिका कर्मचाऱ्यांनी गाळ काढण्याचे काम सुरू केले. स्वत: सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. येथील नाल्याची सफाई अजूनही झाली नसून कचरा अजूनही नाल्यात पडून आहे. तर नाल्याच्या एका बाजूला नाल्यातच गाळ साठवून ठेवल्याने पाण्याचा प्रवाह अडून पाणीघरात शिरले, असा आरोप नागरिकांनी केला. या परिसरातील संतोष निकम यांच्या म्हणण्यानुसार नाल्यात तीन ठिकाणी एकाच वेळी कल्व्हर्ट काम सुरू केले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार झाला. याशिवाय नाल्यातील गाळदेखील काढला नसल्याने हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात शिरले. वर्तकनगरच्या विकासासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली जाते. मात्र, नालेसफाईमध्येच सर्व कारभाराचा बोजवारा उडाला आहे. पंडित यांनी सर्व यंत्रणांना स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. नाल्यात जेसीबी घुसवण्यासाठी मातीचा रॅम्प तयार केला होता. तो गाळ नव्हता. त्यामुळेदेखील पाणी अडून ते पाणी रस्त्यावर आले असल्याचे त्यांनी सांगितले.चिखलवाडीत ५0 घरांत पाणीदुसरीकडे नौपाडा भागातील चिखलवाडी परिसरातही नाल्याचे घाण पाणी सुमारे ५० हून अधिक नागरिकांच्या घरात शिरले.त्यामुळे या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे नागरिकांच्या सामानाचेदेखील नुकसान झाले. प्रत्येक पावसात या ठिकाणी पाणी साचते. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात पाणी रस्त्यावर आणि घरात शिरले.झोपपडट्टीचा भाग असल्याने पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना प्रादुर्भाव होण्याची चिन्हे आहेत.अधिकाऱ्यांची कार्यालयात दांडीपावसात प्रत्येक अधिकाºयाने प्रभाग समितीमध्ये राहण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मान्सूनपूर्व बैठकीमध्ये दिले होते. मात्र, आयुक्तांची पाठ फिरताच फारच कमी अधिकारी सोमवारी रात्री प्रभाग समिती कार्यालयात उपस्थित होते. केवळ अधिकाºयांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहितीची देवाणघेवाण सुरू होती. आयुक्त स्वत: व्हॉट्सअपवर परिस्थितीचा आढावा घेत होते. जे अधिकारी प्रत्यक्ष प्रभाग समितीमध्ये उपस्थित नव्हते त्यांची नावे आयुक्तांना कळवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयानेस्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका