शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

कामगार महिलांसाठी ‘शाळा आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:57 IST

सिग्नल शाळेची संकल्पना यशस्वी झाल्यानंतर रोज विविध भागांतून शहरात कामासाठी येणाºया नाका कामगार महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम ठामपा हाती घेणार आहे.

ठाणे : सिग्नल शाळेची संकल्पना यशस्वी झाल्यानंतर रोज विविध भागांतून शहरात कामासाठी येणाºया नाका कामगार महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम ठामपा हाती घेणार आहे. त्यानुसार, या महिलांना त्यांच्या आवडीच्या कामाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोन महिन्यांत या महिलांना कापूरबावडी जंक्शन येथील उड्डाणपुलाखाली त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण आणि प्रौढ शिक्षण पालिका देणार आहे.महापालिका क्षेत्रातील कापूरबावडीनाका येथे रस्त्यावर तासन्तास मजुरीसाठी ताटकळत उभ्या राहणाºया कष्टकरी महिलांसाठी महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने बहुउद्देशीय सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेमार्फत भौतिक सुविधा व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व प्रशासकीय सेवा, प्रशासन खर्च समर्थ भारत व्यासपीठ यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या नाकाशाळेत मूलभूत प्रशिक्षण व प्रशिक्षणार्थ्यांसाठी विद्यावेतनाचा भार महापालिका उचलणार आहे. त्यानुसार, येथे प्रशिक्षणासाठी येणाºया महिलांना रोजंदारीचा २०० रुपयांचा भत्ता पालिका देणार आहे. दरम्यान, शहरात अशा किती महिला आहेत, याचा सर्व्हे समर्थ भारत व्यासपीठाने केला होता. त्यानुसार, शहरात आजघडीला ५५० महिला असून त्यांच्याकडे चर्चा केली असता यातील बहुतेक महिला या कर्नाटकमधून आल्याचे समजले. तसेच त्यांना कडिया, पेंटर आणि टाइल्स लावण्याच्या कामात रस असल्याचेही या सर्व्हेत पुढे आले आहे. त्यानुसार, याचेच प्रशिक्षण पालिका आता त्यांना देणार आहे. यासाठी त्यांना रुस्तुमजी सहकार्य करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. या माध्यमातून प्रौढ शिक्षण, इंटरनेट हाताळण्याचे शिक्षण आणि स्मार्ट फोनही उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे त्या महिला इंटरनेट सखी म्हणूनही भविष्यात ओळखल्या जाऊ शकणार आहेत. या कष्टकरी महिला नाका कामगारांच्या मुलांसाठीदेखील शाळा तसेच विश्रामगृहाबरोबर डे-केअर, पाळणाघराची निर्मिती केली जाणार आहे.