शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोपरीकरांना टोलमुक्तीच्या आश्वासनाचा पालकमंत्र्यांना पडला विसर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 13:36 IST

स्थानिकांनी केले टोलमुक्तीसाठी आंदोलन 

ठाणे : ठाण्यातील कोपरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आनंद नगर येथील टोल नाक्यावर आंदोलन केले, स्थानिकांना टोलमधून मुक्ती मिळावी यासाठी सोमवारी सकाळी नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल देखील करण्यात आला आहे. सत्तेत येण्यापूर्वी कोपरीकरांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे असा आग्रह धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे एमएसआरडीसी खाते स्वतःकडे असताना देखील याविषयी आता मूग गिळून का गप्प बसले आहेत असा संतप्त सवाल करत कोपरीकर नागरिक आनंदनगर टोलनाक्यावर सोमवारी सकाळी धडकले. आपल्या उदरनिर्वाहासाठी दिवसातून अनेकदा हा टोलनाका ओलांडावा लागल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असून या प्रश्नी लवकरच तोडगा काढला नाही तर मोठे जन आंदोलन छेडू असा कडक इशारा स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलकांनी सरकारला दिला आहे. 

 ठाणे शहरात येण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोलनाके ओलांडावेच लागतात. त्यात देखील कोपरी आनंदनगर येथील टोलनाका म्हणजे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. टोल पासून 10 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असताना सुद्धा स्थानिक नागरिकांकडून जबरदस्ती टोल वसूल केला जातो. कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी कोपरीकरांना टोलमुक्ती देऊ अशी घोषणा केली होती. कोपरीकरानी त्यांच्या या आश्वासनाला भुलून त्यांना घोस मतांनी निवडून दिले. निवडून येताच ठाण्यातील सर्व आमदारांनी तोल न भरता मुंबई शपथविधीसाठी प्रयाण करत याच टोलनाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. परंतु सत्तेत येताच एमएसआरडीसी खाते ताब्यात येऊन देखील कोपरीकरांचे टोलमुक्तीचे स्वप्न स्वप्नच राहिले.

गेल्या साडेचार वर्षांच्या काळात लोकांच्या पदरी निराशे व्यतिरिक्त काहीच पडले नाही. त्यामुळे जन आक्रोश वाढत गेला व संतप्त कोपरीकरांनी  स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगर चेकनाक्यावर धडक दिली. "सरकारमध्ये नसताना टोल बंद करू अश्या घोषणा देणारे आता गप्प का" तसेच "टोल लूटमार बंद करा " अशा घोषणा देत कोपरीकर आक्रमक झाले होते. शासनाचा अधिसूचना धुडकावून लोकांची लूट करणाऱ्या या टोलवाल्यानी कोपरीकरांना लवकरच टोलमुक्ती द्यावी अन्यथा याहून मोठे आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी यावेळी दिला.