शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोपरीकरांना टोलमुक्तीच्या आश्वासनाचा पालकमंत्र्यांना पडला विसर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 13:36 IST

स्थानिकांनी केले टोलमुक्तीसाठी आंदोलन 

ठाणे : ठाण्यातील कोपरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आनंद नगर येथील टोल नाक्यावर आंदोलन केले, स्थानिकांना टोलमधून मुक्ती मिळावी यासाठी सोमवारी सकाळी नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल देखील करण्यात आला आहे. सत्तेत येण्यापूर्वी कोपरीकरांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे असा आग्रह धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे एमएसआरडीसी खाते स्वतःकडे असताना देखील याविषयी आता मूग गिळून का गप्प बसले आहेत असा संतप्त सवाल करत कोपरीकर नागरिक आनंदनगर टोलनाक्यावर सोमवारी सकाळी धडकले. आपल्या उदरनिर्वाहासाठी दिवसातून अनेकदा हा टोलनाका ओलांडावा लागल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असून या प्रश्नी लवकरच तोडगा काढला नाही तर मोठे जन आंदोलन छेडू असा कडक इशारा स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलकांनी सरकारला दिला आहे. 

 ठाणे शहरात येण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोलनाके ओलांडावेच लागतात. त्यात देखील कोपरी आनंदनगर येथील टोलनाका म्हणजे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. टोल पासून 10 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असताना सुद्धा स्थानिक नागरिकांकडून जबरदस्ती टोल वसूल केला जातो. कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी कोपरीकरांना टोलमुक्ती देऊ अशी घोषणा केली होती. कोपरीकरानी त्यांच्या या आश्वासनाला भुलून त्यांना घोस मतांनी निवडून दिले. निवडून येताच ठाण्यातील सर्व आमदारांनी तोल न भरता मुंबई शपथविधीसाठी प्रयाण करत याच टोलनाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. परंतु सत्तेत येताच एमएसआरडीसी खाते ताब्यात येऊन देखील कोपरीकरांचे टोलमुक्तीचे स्वप्न स्वप्नच राहिले.

गेल्या साडेचार वर्षांच्या काळात लोकांच्या पदरी निराशे व्यतिरिक्त काहीच पडले नाही. त्यामुळे जन आक्रोश वाढत गेला व संतप्त कोपरीकरांनी  स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगर चेकनाक्यावर धडक दिली. "सरकारमध्ये नसताना टोल बंद करू अश्या घोषणा देणारे आता गप्प का" तसेच "टोल लूटमार बंद करा " अशा घोषणा देत कोपरीकर आक्रमक झाले होते. शासनाचा अधिसूचना धुडकावून लोकांची लूट करणाऱ्या या टोलवाल्यानी कोपरीकरांना लवकरच टोलमुक्ती द्यावी अन्यथा याहून मोठे आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी यावेळी दिला.