शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

कोकण रेल्वेचे होणार दुपदरीकरण

By admin | Updated: October 16, 2015 02:51 IST

कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय झाला असून, ३१ आॅक्टोबरला कामाला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय झाला असून, ३१ आॅक्टोबरला कामाला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. त्याशिवाय कोकण रेल्वेचे विद्युतीकरणदेखील होणार असून, सर्व स्थानकांच्या पुनर्बांधणीचेही काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी वाशी येथे कार्यक्रमात सांगितले.एकच रेल्वेमार्ग असल्याने पावसाळ्यात दरड कोसळल्यास कोकण रेल्वेची दुतर्फा सेवा ठप्प होते. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकण करण्याची गरज असतानाही आजतागायत त्यावर ठोस निर्णय झालेला नव्हता. कोकणवासीयांचा प्रवास सुखद करण्यासाठी दोन्ही बाबींवर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेतल्याचे प्रभू यांनी सांगितले. तसेच अलिबाग व इतर समुद्रकिनारी पर्यटकांची गदी पाहता ही सर्व ठिकाणे रेल्वेने जोडण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगून अलिबागचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तर सावंतवाडी स्थानकाचे काम ४ ते ५ महिन्यांत पूर्ण होणार असून, वृद्धांकरिता सरकते जिनेही बसवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास केंद्रीय मंत्री अनंत गिते, राज्य रेल्वेमंत्री मनोहर सिन्हा, विनायक राऊत, दीपक केसरकर, हुसेन दलवाई, खासदार राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)