शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कोकण रेल्वे अखेर रुळावर!

By admin | Updated: August 25, 2014 23:25 IST

२६ तासांनी मार्ग वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी : अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक अखेर आज, सोमवारी ‘रुळावर’ आली. तब्बल २६ तासांनंतर हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र, वेळापत्रकात सुसूत्रपणा येण्यासाठी आठ गाड्या रद्द करण्यात आल्या. तरीही आज अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. काल, रविवारी खेड तालुक्यातील वीर ते करंजाडीदरम्यान रेल्वेरूळ तुटल्याने मालवाहतुकीचे आठ डबे रुळांवरून घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मात्र मोठ्या प्रमाणावर कोकणाकडे आलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस.टी.च्या मदतीने अलीकडे-पलीकडे प्रवाशांना सोडून त्या-त्या स्थानकात उभ्या असलेल्या गाड्या परतीच्या मार्गावर वळविण्यात आल्या. तरीही हजारो प्रवाशांचे हाल झाले.रुळाचे काम पूर्ववत पूर्ण झाल्यानंतर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून रेल्वेवाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला. त्यानंतर मत्स्यगंधा एक्स्प्रेस पहिल्यांदा मुंबईकडे रवाना झाली. असे असले तरी, रेल्वे अजूनही दोन ते तीन तास उशिरानेच धावत आहेत. वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)