शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोकण पदवीधर निवडणूक : भाजपा-शिवसेना पुन्हा खडाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:47 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला धूळ चारुन त्या पक्षाचे नाक कापण्यात

ठाणे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला धूळ चारुन त्या पक्षाचे नाक कापण्यात अपयश आल्याने चडफड सुरु असलेल्या शिवसेनेनी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर प्रमाणेच कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेनी यापूर्वी लढवलेली नाही.येत्या २५ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये उडी घेतली. मागीलवेळी शिवसेनेनी डावखरे यांना आतून मदत केल्याने भाजपाचा परंपरात मतदारसंघात पराभव झाला होता. आता पालघरच्या पराभवाने डिवचली गेलेली शिवसेना थेट आव्हान देण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे मागीलवेळी डावखरे यांना साथ देणाºया शिवसेनेसोबत त्यांना दोन हात करावे लागणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नसून पुढील आठवड्यात ६ जूनपर्यंत जाहीर केला जाणार आहे. मात्र नगरसेवक नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे कोकण पदवीधरची निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट दिसत आहे. परिणामी या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपामध्ये ‘कांटें की टक्कर’ होणे अपेक्षित आहे.मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळेस डावखरे यांना २७ हजार, केळकर यांना २२ हजार मते पडली होती. डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला असल्याने साहजिकच पुन्हा मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.वसंत डावखरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ््याचे संबंध होते. मात्र बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन वसंत डावखरे यांना पराभूत केले होते. आता त्यांचे पुत्र निरंजन यांच्या विरोधातही शिवसेनेनी षड्डू ठोकला आहे.पालघरच्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असताना आता कोकण पदवीधरमध्ये पुन्हा खडाखडी होणे अपरिहार्य आहे. शिवसेनेची ठाण्यात ताकद आहे.नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर गणेश नाईक नवी मुंबईत त्यांच्या पाठीशी किती बळ उभे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना अलीकडे निवडणुकीत भाजपाची साथ लाभली. नारायण राणे हेही तटकरे यांच्या मदतीला धावले. त्यामुळे तटकरेत्याची परतफेड करणार की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवसेना व भाजपा यांच्यापैकी कोकणातील पदवीधरांचा अधिक पाठिंबा कोण मिळवतो, याचेही कुतूहल आहे.भाजपाने निरंजन यांना उमेदवारी दिल्याने भाजपातील ठाणे व रत्नागिरी येथील काही निष्ठावान मंडळी नाराज असल्याची चर्चा आहे.