शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोनगाव-कचोरे पूल ‘हरवला’, केडीएमसीत कुणी बोलेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:25 IST

कोनगाव ते कचोरेदरम्यान बांधल्या जाणाºया खाडी पुलाला राज्य सरकारने मंजुरी दिली. भूसंपादन करण्यात आले. निविदा काढण्यात आली. कंत्राटदाराने ती भरलीही, पण तो पूल नियोजनातून ‘हरवला’. त्याबाबत पालिका, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी माहिती देण्यासही तयार नाहीत.

मुरलीधर भवार कल्याण : कोनगाव ते कचोरेदरम्यान बांधल्या जाणाºया खाडी पुलाला राज्य सरकारने मंजुरी दिली. भूसंपादन करण्यात आले. निविदा काढण्यात आली. कंत्राटदाराने ती भरलीही, पण तो पूल नियोजनातून ‘हरवला’. त्याबाबत पालिका, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी माहिती देण्यासही तयार नाहीत. हा पूल अचानकपणे का रद्द झाला, कुणासाठी, याची उत्तरेही मिळेनाशी झाल्याने पूल प्रकरणाचे गूढ वाढले आहे.हा पूल भिवंडी-कल्याण-शीळ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचाच भाग होता. आघाडी सरकारच्या काळात बीकेएस कंपनीला त्याचे काम दिले होते. पहिल्या टप्प्यात चौपदरी-करणासाठी २२८ कोटी ३३ लाखांचा खर्च करण्यात आला. नंतर कंपनीला कोन व काटई येथे टोलवसुलीचे कंत्राट दिले. कंपनीकडून १५ वर्षे नऊ महिन्यासाठी टोलवसुली होणार आहे. या रस्त्याचा दुसरा टप्पा २६८ कोटींचा होता. त्यासाठी भूसंपादन केले. त्यात कोनगाव ते कचोरेदरम्यान खाडीवर पूल बांधला जाणार होता. त्याची निविदा काढली. कंत्राटदाराने ती भरली. पण या कामाचे पुढे काय झाले याचा थांग लागत नाही. सारे अधिकारी मिठाची गुळणी धरून आहेत.या पुलामुळे कल्याण शहराला वगळून वाहतूक बाहेरून गेली असती. शिवाजी चौक, पत्रीपूल, सहजानंद चौक, दुर्गाडी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला असता. सध्या या रस्त्यावर दुर्गाडी उड्डाणपुलाला समांतर नवा पूल बांधला जात आहे. हा पूल सहा पदरी असून त्यासाठी ७६ कोटी खर्च केला जाणार आहे. त्याचे काम गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये सुरू झाले. पण ते संथगतीने सुरु आहे. त्याची तक्रार राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. कोनगाव ते कचोरे खाडी पूल तयार केला असता, तर दुर्गाडी खाडी पुलाची आवश्यकताच भासली नसती. दुर्गाडी पुलामुळे कल्याणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही, असा मुद्दा माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी उपस्थित केला.एमएमआरडीए, महापालिका आणि राज्य रस्ते विकास महामंडळात समन्वय नसल्याने अशी कामे सुचवली गेली. पत्रीपूल-गोविंदवाडी बायपासचे काम एमएमआरडीएने १५ कोटी खर्च करुन खाजगी कंपनीमार्फत करुन घेतले. ते नियमानुसार झाले नसल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केलेल्या आहेत.टोलवसुली बंदीवर ६ सप्टेंबरला सुनावणीभिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावर २२८ कोटी ३३ लाखांचा खर्च झाला. २००९ पासून खुला करताच कंपनीने टोलवसुली सुरू केली. आतापर्यंत १२४ कोटींची टोलवसुली झाली आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि सध्या पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी २०१२ मध्ये हा टोल बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज ठाकरे व नितीन सरदेसाई यांनीही याचिका दाखल केल्या होत्या. स्थानिक कार्यकर्ते संदीप पाटील याचीही टोलबंदीसाठी याचिका आहे. मुंबईतील एन्ट्री पॉईंट, एक्स्प्रेस हायवे, ठाणे-खारेगाव, ठाणे-घोडबंदर आणि भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी त्यांनी केली होती. भिवंडी-कल्याण-शीळ मार्गाचा दुसरा टप्पा प्रत्यक्षात आलेला नाही. आजवर फक्त खारेगाव टोलनाका बंद झाला. टोलच्या सर्व याचिकांवर ६ सप्टेंबरला एकत्रित सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे आता सार्वजनिक बांधकाममंत्री असल्याने २०१२ च्या टोल याचिकेतून त्यांना वगळण्याचा मागणी अर्ज सहयोगी याचिकाकर्ते घाणेकर न्यायालयात करणार आहेत.उड्डाण रस्त्यामुळे दुसरा टप्पा रद्द?शीळ रस्त्यावर टोलबंदीसाठी २००९ मध्ये भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषण केले. कारावास भोगला. गोविंदवाडी बायपास पूर्ण होईपर्यंत टोलवसुलीला त्यांचा विरोध होता. बायपासचे काम झाल्यावर त्यांची मागणी मागे पडली. आता मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोन ते शीळ फाटादरम्यान उड्डाण रस्त्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळेच भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचा दुसरा टप्पा मागे पडल्याची चर्चा सुरू आहे.