शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कोनगाव-कचोरे पूल ‘हरवला’, केडीएमसीत कुणी बोलेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:25 IST

कोनगाव ते कचोरेदरम्यान बांधल्या जाणाºया खाडी पुलाला राज्य सरकारने मंजुरी दिली. भूसंपादन करण्यात आले. निविदा काढण्यात आली. कंत्राटदाराने ती भरलीही, पण तो पूल नियोजनातून ‘हरवला’. त्याबाबत पालिका, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी माहिती देण्यासही तयार नाहीत.

मुरलीधर भवार कल्याण : कोनगाव ते कचोरेदरम्यान बांधल्या जाणाºया खाडी पुलाला राज्य सरकारने मंजुरी दिली. भूसंपादन करण्यात आले. निविदा काढण्यात आली. कंत्राटदाराने ती भरलीही, पण तो पूल नियोजनातून ‘हरवला’. त्याबाबत पालिका, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी माहिती देण्यासही तयार नाहीत. हा पूल अचानकपणे का रद्द झाला, कुणासाठी, याची उत्तरेही मिळेनाशी झाल्याने पूल प्रकरणाचे गूढ वाढले आहे.हा पूल भिवंडी-कल्याण-शीळ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचाच भाग होता. आघाडी सरकारच्या काळात बीकेएस कंपनीला त्याचे काम दिले होते. पहिल्या टप्प्यात चौपदरी-करणासाठी २२८ कोटी ३३ लाखांचा खर्च करण्यात आला. नंतर कंपनीला कोन व काटई येथे टोलवसुलीचे कंत्राट दिले. कंपनीकडून १५ वर्षे नऊ महिन्यासाठी टोलवसुली होणार आहे. या रस्त्याचा दुसरा टप्पा २६८ कोटींचा होता. त्यासाठी भूसंपादन केले. त्यात कोनगाव ते कचोरेदरम्यान खाडीवर पूल बांधला जाणार होता. त्याची निविदा काढली. कंत्राटदाराने ती भरली. पण या कामाचे पुढे काय झाले याचा थांग लागत नाही. सारे अधिकारी मिठाची गुळणी धरून आहेत.या पुलामुळे कल्याण शहराला वगळून वाहतूक बाहेरून गेली असती. शिवाजी चौक, पत्रीपूल, सहजानंद चौक, दुर्गाडी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला असता. सध्या या रस्त्यावर दुर्गाडी उड्डाणपुलाला समांतर नवा पूल बांधला जात आहे. हा पूल सहा पदरी असून त्यासाठी ७६ कोटी खर्च केला जाणार आहे. त्याचे काम गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये सुरू झाले. पण ते संथगतीने सुरु आहे. त्याची तक्रार राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. कोनगाव ते कचोरे खाडी पूल तयार केला असता, तर दुर्गाडी खाडी पुलाची आवश्यकताच भासली नसती. दुर्गाडी पुलामुळे कल्याणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही, असा मुद्दा माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी उपस्थित केला.एमएमआरडीए, महापालिका आणि राज्य रस्ते विकास महामंडळात समन्वय नसल्याने अशी कामे सुचवली गेली. पत्रीपूल-गोविंदवाडी बायपासचे काम एमएमआरडीएने १५ कोटी खर्च करुन खाजगी कंपनीमार्फत करुन घेतले. ते नियमानुसार झाले नसल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केलेल्या आहेत.टोलवसुली बंदीवर ६ सप्टेंबरला सुनावणीभिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावर २२८ कोटी ३३ लाखांचा खर्च झाला. २००९ पासून खुला करताच कंपनीने टोलवसुली सुरू केली. आतापर्यंत १२४ कोटींची टोलवसुली झाली आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि सध्या पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी २०१२ मध्ये हा टोल बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज ठाकरे व नितीन सरदेसाई यांनीही याचिका दाखल केल्या होत्या. स्थानिक कार्यकर्ते संदीप पाटील याचीही टोलबंदीसाठी याचिका आहे. मुंबईतील एन्ट्री पॉईंट, एक्स्प्रेस हायवे, ठाणे-खारेगाव, ठाणे-घोडबंदर आणि भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी त्यांनी केली होती. भिवंडी-कल्याण-शीळ मार्गाचा दुसरा टप्पा प्रत्यक्षात आलेला नाही. आजवर फक्त खारेगाव टोलनाका बंद झाला. टोलच्या सर्व याचिकांवर ६ सप्टेंबरला एकत्रित सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे आता सार्वजनिक बांधकाममंत्री असल्याने २०१२ च्या टोल याचिकेतून त्यांना वगळण्याचा मागणी अर्ज सहयोगी याचिकाकर्ते घाणेकर न्यायालयात करणार आहेत.उड्डाण रस्त्यामुळे दुसरा टप्पा रद्द?शीळ रस्त्यावर टोलबंदीसाठी २००९ मध्ये भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषण केले. कारावास भोगला. गोविंदवाडी बायपास पूर्ण होईपर्यंत टोलवसुलीला त्यांचा विरोध होता. बायपासचे काम झाल्यावर त्यांची मागणी मागे पडली. आता मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोन ते शीळ फाटादरम्यान उड्डाण रस्त्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळेच भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचा दुसरा टप्पा मागे पडल्याची चर्चा सुरू आहे.