शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

किस्सा कुर्सी का - ‘हाफ चड्डी’ने फिरवला बोळा

By मुरलीधर भवार | Updated: April 11, 2024 06:55 IST

या मतदारसंघातून ब्राह्मण चेहरा देण्याची राजकीय खेळी शरद पवार यांनी खेळली.

मुरलीधर भवार

ठाणे लोकसभा मतदारसंघ जनसंघाच्या काळापासून आणि नंतर भाजपला अनुकूल होता. शिवसेना जोमात आली, तेव्हा आनंद दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हातून खेचून घेतला. ठाणे मतदारसंघातून प्रकाश परांजपे चारवेळा निवडून आले. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव आनंद परांजपे निवडून आले. लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाले, तेव्हा कल्याण लोकसभेतून थेट निवडणुकीत आनंद परांजपे निवडून आले. शिवसेनेच्या राजकारणात आनंद यांची घुसमट होऊ लागल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. ही खेळी शरद पवारांची होती. 

डोंबिवलीत ब्राह्मण मतदारांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. या मतदारसंघातून ब्राह्मण चेहरा देण्याची राजकीय खेळी शरद पवार यांनी खेळली. २०१४ साली आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. परांजपे यांच्या प्रचारासाठी कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात १६ एप्रिल २०१४ रोजी शरद पवार यांच्या प्रचार सभेचे आयाेजन केले होते. पवार यांनी भाषणात रा. स्व. संघावर टीका करण्याच्या ओघात ‘हा देश हाफ चड्डीवाल्याच्या हाती देणार का?’ असा सवाल केला. ब्राह्मण कार्ड खेळून परांजपे यांना संघाची मते मिळतील या स्वत:च्या राजकीय खेळीवरच पवार यांनी बोळा फिरवला. पवार यांचे ते भाषण परांजपे यांच्या विजयासाठी बाधक ठरले. त्यानंतर आजतागायत परांजपे यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीची संधी मिळालेली नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे