शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

वेतनश्रेणी, निवृत्तीवेतनासाठी बालवाडी शिक्षिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:38 IST

पोलिसांची मध्यस्थी; बेमुदत उपोषण तूर्तास स्थगित, सोमवारी आयुक्तांसमवेत होणार बैठक

कल्याण : वेतनश्रेणी व निवृत्तीवेतन लागू करावे, या मागण्यांसाठी केडीएमसीच्या बालवाडी शिक्षिकांनी गुरुवारी महाराष्ट्र हुतात्मा दिनाचे औचित्य साधत पश्चिमेतील शिवाजी चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. वरिष्ठ नागरिक परिसंघ, ठाणे जिल्हा संलग्न भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र, आंदोलनापूर्वी आयुक्त गोविंद बोडके यांनी सोमवारी चर्चेसाठी यावे, असे पत्र संघटनेला दिले होते. परंतु, आयुक्तांकडून आमची केवळ फसवणूकच सुरू आहे, असा आरोप करीत शिक्षिकांनी उपोषण सुरूच ठेवले होते. अखेर, बाजारपेठ पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. आता सोमवारी आयुक्तांकडे होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.केडीएमसीत सध्या ६८ बालवाडी शिक्षिका असून, त्यांना आठ हजार रुपये मानधन मिळते. तर, ४८ शिक्षिका निवृत्त झाल्या असून, त्यांना कोणत्याही प्रकारे निवृत्तीवेतन मिळत नाही. २५ सप्टेंबर १९९६ ला ९५० ते १७५० रुपये, असा वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर झाला असतानाही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या प्रमुख मागणीसह निवृत्तीवेतन लागू करावे, अशी मागणी बालवाडी शिक्षिकांची आहे.शिक्षिकांनी याआधी ८ मार्चला उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता. परंतु, प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषणाचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यावेळी बालवाडी शिक्षिकांना बोडके यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, त्यांना मंत्रालयात बैठकीला जावे लागल्याने शिक्षिकांच्या मागण्या प्रलंबितच राहिल्या. कोणतीच कार्यवाही होत नसल्याने शिक्षिकांच्या वतीने १७ सप्टेंबर २०१९ ला भरपावसात आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याची दखल महापालिकेने घेतलेली नव्हती. त्यामुळे मागण्यांसाठी गुरुवारी पुन्हा हुतात्मा दिनाचे औचित्य साधत बेमुदत उपोषणाला त्यांनी प्रारंभ केला. तत्पूर्वी, आयुक्तांकडून सोमवारी चर्चा करू, असे पत्र आंदोलनकर्त्यांना पाठविण्यात आले होते. परंतु, हे पत्र धुडकावून लावत शिक्षिकांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला. यातील बहुतांश शिक्षिका या ६० वर्षे व ६५ वयोगटांतील असल्याने त्यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडण्याची शक्यता लक्षात घेता बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी महापालिकेचे उपायुक्त मिलिंद धाट यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु, आम्ही त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत. त्यांना चर्चेसाठीही बोलावले आहे. मात्र, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवल्याचे धाट यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर पोलीस अधिकाºयांनी आयुक्त बोडके यांचीही भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली.आयुक्तांनीही शिक्षिकांना सोमवारी चर्चेसाठी बोलावल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास नकार दिला. अखेर, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सायंकाळी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. सोमवारच्या चर्चेचे पत्र आंदोलनकर्त्या शिक्षिकांकडून स्वीकारण्यात आले....तर दालनातच ठिय्या मांडूदरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बेमुदत उपोषण तूर्तास मागे घेऊन सोमवारी आयुक्तांबरोबर चर्चा करण्याचा निर्णय शिक्षिकांनी घेतला आहे. जर सोमवारी चर्चा नाही झाली आणि न्याय नाही मिळाला, तर आयुक्तांच्या दालनातच ठिय्या मांडणार, असा पवित्रा शिक्षिकांनी घेतला आहे.