शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आईचा मोबाइल नंबर न दिल्याने रिक्षाचालकाने केले दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:49 IST

आईचा मोबाइल नंबर न दिल्याने एका रिक्षाचालकाने दोन लहान मुलींचे अपहरण केले. तसेच त्यातील एकीचा विनयभंग केल्याचा प्रकार...

कल्याण : आईचा मोबाइल नंबर न दिल्याने एका रिक्षाचालकाने दोन लहान मुलींचे अपहरण केले. तसेच त्यातील एकीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथील पूर्वेकडील काटेमानिवली परिसरात घडला. दरम्यान, या मुलींनी धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली.अल्पवयीन मुली उल्हासनगर येथे राहत आहेत. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील एका हॉटेलमध्ये त्यांची आई कामाला आहे. काही कामानिमित्त सायंकाळी त्या आईच्या हॉटेलवर आल्या होत्या. तेथून घरी परतण्यासाठी तिसगावनाका येथे दोघींनी रिक्षा पकडली. रिक्षा श्रीराम चौकाकडे जात असताना रिक्षाचालकाने दोघींकडे त्यांच्या आईचा मोबाइल नंबर मागितला. त्यास त्यांनी नकार दिला असता दोघींना ठार मारण्याची धमकी दिली. अखेर, घाबरून दोघींपैकी एकीने धावत्या रिक्षातून उडी मारली व रिक्षाचा पाठलाग करत आरडाओरडा केला. अखेर, या रिक्षाचा पेट्रोलपंपाजवळ वेग कमी झाल्याने दुसºया मुलीनेही रिक्षातून उडी मारून घरी पलायन केले. याप्रकरणी अनोळखी रिक्षाचालकाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसthaneठाणे