शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केडीएमटी, एसटी, वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 05:19 IST

पत्रीपूल पाडण्यासाठी मेगाब्लॉक : रस्तेवाहतुकीचे नियोजन, प्रवाशांची गैरसोय टाळण्यावर भर

कल्याण : ब्रिटिशकालीन १०४ वर्षे जुना व धोकादायक बनलेला पत्रीपूल रविवारी पाडण्यासाठी मध्य रेल्वे सहा तासांचा विशेष ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे कल्याण ते डोंबिवली रेल्वेस्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नसल्याने रस्तेवाहतुकीवर त्याचा ताण येणार आहे. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत राहावी तसेच प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी केडीएमटी, एसटी आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.

मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली तसेच कल्याण ते कसारा-कर्जतदरम्यान रेल्वेची वाहतूक सुरू राहणार आहे. तर, कल्याण-डोंबिवलीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद असेल. ब्लॉकचा कालावधी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा सहा तासांचा असल्याने या वेळेत प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे. पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जोरदार तयारी सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री घटनास्थळी आणली आहे. अन्य यंत्रणाही या मोहिमेसाठी सज्ज आहेत. केडीएमटी, एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस, शहर पोलीस या विभागांनी त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना विशेष सूचना दिल्या आहेत.पत्रीपूल पाडण्यासाठी मोठमोठ्या व अद्ययावत मशीन आणल्या आहेत. त्या महाकाय मशीन बघण्यासाठी शुक्रवारपासूनच जुन्या पत्रीपूल परिसरात गर्दी होऊ लागली आहे. रविवारी प्रत्यक्षात पूल पाडताना बघ्यांची गर्दी अधिकच वाढणार आहे. याचा फटका नवीन पुलावरून सुरू राहणाऱ्या वाहतुकीलाही बसणार आहे. त्यामुळे पत्रीपूल परिसरात गर्दी होणार नाही, याची दक्षता पोलीस यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.रिक्षाचालकांना सूचनामेगाब्लॉकच्या कालावधीचा रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात गैरफायदा उठवतात. अव्वाच्या सव्वा भाडे आकारून ते प्रवाशांची अक्षरश: पिळवणूक करतात. यासंदर्भात रिक्षा-चालक-मालक असोसिएशनचे सहसचिव संतोष नवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात प्रवाशांना चांगली सेवा द्या, त्यांच्याकडून जादा भाडे आकारू नका, त्रास होईल असे वागू नका, असे आवाहन रिक्षाचालकांना केल्याचे सांगितले. याबाबतचे फलक रेल्वेस्थानक परिसरातही लावले जाणार असल्याचे ते म्हणाले.मध्य रेल्वेवरील २४ तासांत १ हजार ७७२ फेºयांपैकी मध्य मार्गावर ८५६ फेºया होतात. मात्र, सुमारे सात तासांच्या ब्लॉकमुळे २०० पेक्षा जास्त लोकल फेºया रद्द होणार आहेत. याचबरोबर, सीएसएमटीकडे येणाºया व जाणाºया एकूण ४३ मेल-एक्स्प्रेसला ब्लॉकचा फटका बसेल. यापैकी १४ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, १४ मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे मुंबईत दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेससह, नागरकोईल, हैदराबाद व अन्य एक्स्प्रेसला रविवारी दिवा स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात येईल.केडीएमटी सोडणार२५ मोठ्या बसब्लॉककाळात प्रवाशांची परवड होऊ नये, यासाठी २५ मोठ्या बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती केडीएमटीचे महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली.नवीन पत्रीपूलमार्गेच या बस चालवल्या जाणार आहेत. परंतु, पूल परिसरात कोंडी झाल्यास विठ्ठलवाडी, चेतना हायस्कूलमार्गे, चक्कीनाका, नेतिवली, टाटा पॉवर कंपनीनाका, बाजीप्रभू चौक, अशा पर्यायी मार्गे बससेवा चालवली जाणार असल्याचे खोडके म्हणाले.प्रतिसादानुसार एसटीच्याही जादा गाड्याप्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण एसटी आगाराकडूनदेखील जादा बस सोडण्यात येणार आहेत. कल्याण-ठाणे, पनवेल, कसारा, पुणे, नाशिक तसेच कल्याण-डोंबिवली मार्गांवरही बस चालवण्यात येणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक प्र.स. भांगरे यांनी दिली. प्रवाशांचा जसा प्रतिसाद मिळेल, तशी गाड्यांमध्ये वाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेPoliceपोलिस