शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

परिवहन उपक्रम तोट्यात; प्राधिकरणासाठी अभ्यास करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:20 IST

- मुरलीधर भवार कल्याण : केडीएमटी तोट्यात असल्याने तिचे खाजगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एमएमआर रिजनमधील सर्व परिवहन उपक्रमांचे ...

- मुरलीधर भवारकल्याण : केडीएमटी तोट्यात असल्याने तिचे खाजगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एमएमआर रिजनमधील सर्व परिवहन उपक्रमांचे हेच चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या उपक्रमांना एकत्रित करून त्यांचे परिवहन प्राधिकरण सुरू करण्यासाठी अभ्यास करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सचिवांना सुचवले आहे. आघाडी सरकारच्या काळातही एमएमआर रिजनमध्ये परिवहन प्राधिकरणाची मागणी पुढे आली होती.

एमएमआर रिजनमध्ये मुंबई ही सर्वात मोठी महापालिका आहे. त्यांच्या बेस्ट उपक्रमाला ७२० कोटींचा तोटा होत आहे. बेस्टला प्रतिकिलोमीटरला ७० रुपये, नवी मुंबई परिवहनला ३५ रुपये, ठाणे परिवहन उपक्रमास ६५ रुपये आणि केडीएमटीला ३५ रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार ही तूट भरून काढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी परिवहन उपक्रमांना पैसा पुरवला पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात तरतुदीपेक्षा कमी प्रमाणात पैसा दिला जातो. महापालिका पैसे नसल्याची सबब देतात. जकातवसुली बंद झाल्याने महापालिकांना मोठा फटका बसला. त्यानंतर, सुरू झालेली एलबीटीही बंद करण्यात आली. एलबीटीपोटी सरकारकडून महापालिकांना पुरेसे अनुदान मिळत नाही.

मुंबईत मेट्रो आणि मोनोरेल सुरू झाल्याने बेस्ट तोट्यात आहे. खाजगी टॅक्सीसेवा सुरू झाली आहे. मुंबई उपनगरांतही खाजगी, काळीपिवळी टॅक्सी, रिक्षा जोमात सुरू आहेत. मागेल त्याला रिक्षांचे परमिट दिले जात असल्याने रिक्षांची संख्या वाढली आहे. याशिवाय, विविध महापालिकांच्या परिवहनसेवांना अन्य शहरांमध्ये बस सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या तिकीटदरात सुसूत्रता नाही. त्यामुळे या स्पर्धेमुळे परिवहन उपक्रमांना प्रवासी मिळत नाहीत. त्याचबरोबर विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांवर वाहतूककोंडी होत आहे. वाहने वाढली असताना पार्किंगची सुविधा पुरेशी नाही. या सगळ्याचा फटका परिवहन उपक्रमाला बसत आहे.३५ टक्के प्रवासी भारमान घटले

  • सरासरी ३५ टक्के प्रवासी भारमान घटले आहे. त्यात इंधनाच्या किमती स्थिर नाहीत. त्या वाढल्यावर लगेच भाडेवाढ करता येत नाही. तत्काळ भाडेवाढ केल्यास प्रवासी भरडले जातात.
  • या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने एमएमआर रिजनसाठी परिवहन प्राधिकरणाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर अभ्यास करून अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सचिवांना सूचित केले आहे.
  • प्राधिकरण झाल्यास भाड्यात सुसूत्रता येईल. तोट्यातील परिवहनसेवा बंद पडण्याऐवजी सुरू राहून प्रवाशांना सुविधा मिळेल. परिवहन प्राधिकरण हाच यावर उत्तम पर्याय असू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
टॅग्स :kalyanकल्याण