शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केडीएमटीला १४ वर्षांनंतरही भरपाई मिळेना; २६ जुलैच्या महापुरात एक कोटी ८५ लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:38 IST

राज्य सरकारकडून मागण्या बेदखल

कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम डबघाईला आला असताना दुसरीकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सरकारदरबारी त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सेवा भरती नियमावली असो अथवा २६ जुलै २००५ च्या महापुरात उपक्रमाच्या झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा असो, याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने केडीएमटीची स्थिती दिवसागणिक अधिकच बिकट बनली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा २३ मे १९९९ ला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात परिवहनच्या ताफ्यात ४० बस होत्या. त्यात टप्याटप्प्याने वाढ होऊन आजमितीला २१८ बस उपक्रमाच्या ताफ्यात आहेत. यात २०१५ पूर्वीच्या १०० बस आणि केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत दाखल झालेल्या ११८ बसचा समावेश आहे. दरम्यान जुलै २००५ च्या महापुरात उपक्रमाच्या ताफ्यातील ८८ बसचे नुकसान झाले. तेव्हापासून उपक्रमाला जी घरघर लागली ती आजतागायत कायम आहे.

एकीकडे वाहक आणि चालकांची कमतरता, खर्च आणि उत्पन्नातील वाढती तफावर ही केडीएमटीच्या आर्थिक डबघाईची कारणे असलीतरी दुसरीकडे सरकारदरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत न झालेली कार्यवाही देखील या उपक्रमाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली आहे. २६ व २७ जुलै २००५ ला आलेल्या महापुरात केडीएमटीचा गणेशघाट आगार पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यात आगारातील बसगाड्यांसह तेथील मालमत्तेचे एक कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले होते. याबाबत राज्य सरकारकडे सविस्तर प्रस्ताव पाठवून पूरपरिस्थितीने नुकसान झालेल्या उपक्रमास आर्थिक सहाय्य मिळण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. आज या महापुराच्या घटनेला १४ वर्षे उलटूनही भरपाई उपक्रमाला मिळालेली नाही. यंदाच्या पूरपरिस्थितीत आगारातील ३५ बसचे नुकसान झाले आहे. परंतु, आताही विम्यावरच उपक्रमाची मदार राहणार आहे.

केडीएमटीच्या बसमधून कर्तव्यार्थ विनामूल्य प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चापोटी पोलीस अनुदानापोटीची थकीत रक्कम मिळालेली नाही. याबाबतही सरकारक डे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० वर्षातील ७० ते ८० लाखांचे अनुदान उपक्रमाला मिळणे बाकी आहे. जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत १८५ बस केडीएमटीला मंजूर झाल्या होत्या. परंतु, आर्थिक परिस्थितीचा आढावा घेता उपक्रमाने यातील ११८ बस खरेदीची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे ताफ्यात बस दाखल झाल्या.

परंतु, सरकारचा शेवटचा हिस्सा तीन कोटी ६२ लाख रुपये आणि केडीएमसीचा द्यावयाचा हिस्सा पाहता एकूण सात कोटी ३५ लाख रुपये केडीएमटीला मिळणे बाकी आहे. परंतु, ते अद्याप मिळालेले नाही. परिणामी बस पुरविणाºया कंत्राट कंपनीचे थकीत वेतन दिले गेलेले नाही. या संदर्भातही केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला गेला आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद उपक्रमाला मिळालेला नाही.कंत्राटी चालक, वाहकांच्या प्रस्तावरही कार्यवाही नाही

उपक्रमातील कंत्राटी चालक आणि वाहकांच्या मागणीनुसार त्यांना स्थायी व अस्थायी पदावर सामावून घेण्याबाबत सरकारकडे पद मंजुरीबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, त्याबाबतही अद्याप कार्यवाही झालेली नाही. प्रवासी कर आणि बालपोषण अधिकरात सूट व सवलत मिळण्याबाबत सरकारी स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची बाब उपक्रमाने सविस्तर माहिती अहवालामार्फत शुक्रवारी होणाºया परिवहन समितीच्या सभेच्या पटलावर मांडली आहे. याबाबत सर्वपक्षीय सदस्यांकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली