शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

केडीएमटीची भाडेवाढीस मंजुरी; किमान अंतरासाठी एक रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:56 IST

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने चार टक्के भाडेवाढ करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे. महासभेने त्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही भाडेवाढ अमलात येणार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने चार टक्के भाडेवाढ करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे. महासभेने त्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही भाडेवाढ अमलात येणार आहे.परिवहनचे प्रवासी भाडे किमान दोन किलोमीटरच्या अंतरासाठी पाच रुपये होते. त्यात एक रुपया वाढ प्रस्तावित असल्याने आता सहा रुपये मोजावे लागणार आहेत. परिवहन उपक्रमाने व समितीने भाडेवाढ प्रस्तावित करताना नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि मीरा-भार्इंदर महापालिकेतील परिवहन उपक्रमातील प्रवासीभाडे किती आहे, याचा विचार केला. बसनंतर प्रवासी सगळ्यात जास्त रिक्षाने प्रवास करतात. केडीएमसी हद्दीत मोठ्या प्रमाणावर शेअर रिक्षा धावत असल्याने त्यांचेही भाडे विचारात घेण्यात आले. शेअर रिक्षाचालक एका किलोमीटरच्या पेक्षा कमी अंतराला किमान १० रुपये घेतात. परिवहनची चार टक्के भाडेवाढ मान्य झाली तरी दोन किलोमीटरसाठी प्रवाशाला सहा रुपये मोजावा लागणार आहे. रिक्षाच्या तुलनेत परिवहनचा प्रवास स्वस्तच राहणार आहे.कमी अंतरासाठी एक रुपया भाडेवाढ प्रस्तावित असली, तरी भिवंडी व वाशी या लांबपल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी भाड्यात पाच रुपयांनी वाढणार आहे. १६ किलोमीटरसाठी २० रुपये घेतले जात होते. आता भाडेवाढीमुळे प्रवाशाला २५ रुपये मोजावा लागणार आहेत. १० किलोमीटरच्या प्रवासी भाड्यासाठी सार्वजनिक उपक्रम जो दर आकारतात, त्याचा विचार करून ही भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे.परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात तूट आहे; परंतु केडीएमसी अर्थसंकल्पात तरतूद केलेली पूर्ण रक्कम परिवहन उपक्रमाला देत नाही. महसुली खर्चासाठी महापालिकेकडून कमी निधी दिला जातो. परिवहन उपक्रम आधीच आर्थिक संकटात आहे. उपक्रमाला त्यातून बाहेर काढण्यासाठी चार टक्के भाडेवाढ फायदेशीर ठरणार नाही.५५ टक्के खर्च केवळ डिझेलवरडिझेलची दरवाढ झाल्याने परिवहनने ३० टक्के भाडेवाढ करणे अपेक्षित होते. मात्र, ही भाडेवाढ प्रवाशांवर बोजा टाकणारी ठरली असती.इंधन दरवाढीच्या तुलनेत भाडेवाढ न करता, केवळ चार टक्के भाडेवाढ केली आहे. परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नापैकी ५५ टक्के खर्च हा केवळ डिझेलवर होतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण