शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

केडीएमसीची नाट्यगृहेही ‘सही रे सही’!, वातानुकूलित यंत्रणेत बिघाड , भरत जाधव यांची तीव्र नाराजी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 6:38 AM

कल्याण : केडीएमसीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात शनिवारी झालेल्या ‘सही रे सही’ नाट्यप्रयोगाच्या वेळी रंगमंचावरील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने कलाकार उकाड्याने हैराण झाले. अभिनेता भरत जाधव यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नाट्यनिर्माते व कलावंतांनी याआधीही वारंवार नाराजी व्यक्त करून काहीही फरक न पडल्याचे यातून दिसून आले.१४ एप्रिल ...

कल्याण : केडीएमसीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात शनिवारी झालेल्या ‘सही रे सही’ नाट्यप्रयोगाच्या वेळी रंगमंचावरील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने कलाकार उकाड्याने हैराण झाले. अभिनेता भरत जाधव यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नाट्यनिर्माते व कलावंतांनी याआधीही वारंवार नाराजी व्यक्त करून काहीही फरक न पडल्याचे यातून दिसून आले.१४ एप्रिल २०१६ ला ‘ती फुलराणी’ या नाट्यप्रयोगादरम्यान कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने हैराण झालेल्या प्रेक्षकांनी नाट्यगृहात गोंधळ घालत पैसे परत देण्याची मागणी केली. तासाभराच्या गोंधळानंतर नाटकाचा दुसरा अंक झाला. पण नाट्यगृह व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे अत्रे रंगमंदिराच्या देखभालीचे काम करत एप्रिलपासून ते नाट्यगृह बंद आहे.आता हा प्रयोग डोंबिवलीतील फुले कलामंदिरातही सुरू झाला आहे. गेल्या महिन्यातही ‘के दिल अभी भरा नही’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी ही यंत्रणा बंद पडली होती. तेव्हा लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी नाराजी व्यक्त केली होती. रंगमंचावरील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने क ला सादर करताना त्रास झाला. आमच्या अभिनयात कुठे कमतरता राहिली असेल, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत कलाकारांनी रसिकप्रेक्षकांची माफी मागितली होती. पुन्हा शनिवारी ‘सही रे सही’ या नाट्यप्रयोगावेळी एसी बंद पडले. त्याचा त्रास कलाकारांना विशेषत: भरत जाधव यांना झाल्याने त्यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहिले आहे. दीड वर्षापासून येथील या यंत्रणेचा बिघाड सुरू आहे. फुले कलामंदिरात १२ वातानुकूलन यंत्रे आहेत. त्यातील आठ यंत्रांचे कॉम्प्रेसर निकामी आहेत. त्यामुळे कधी प्रेक्षक गॅलरी, तर कधी रंगमंचावरचे एसी सुरू असतात. जाधव यांनी या दुरवस्थेबाबत शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याशीही चर्चा केली.फेब्रुवारीत झालेल्या साहित्य संमेलनापूर्वीही फुले कलामंदिराची दुरवस्था चव्हाट्यावर आली होती. कलावंत सुमित राघवन यांनीही नाट्यगृहातील व्हीआयपी रूमच्या दुरवस्थेचा व्हिडीओ टाकला होता.अनुचित प्रकार घडला, तर जबाबदार कोण?भरत जाधव यांनी व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात रंगमंचावरची वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यात कला सादर करताना कलाकारांना त्रास झाल्याचे म्हटले आहे. अशा अवस्थेत काही अनुचित प्रकार घडला, तर याला जबाबदार कोण, असाही सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच या दुरवस्थेवर ठोस कार्यवाही करावी, अशी विनंती जाधव यांनी केली आहे.यंत्रणेच्या बिघाडाबाबत पाठपुरावा सुरूवातानुकूलित यंत्रणा बिघडली आहे, हे वास्तव आहे. याबाबत, वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांनी दिली, तर विद्युत विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुºहेकर यांनीही पर्यायी व्यवस्था केली असून निविदा प्रक्रियाही सुरू आहे. चांगली सेवा देता येईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Bharat Jadhavभरत जाधव