शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

केडीएमसीची करवाढ टळली

By admin | Updated: February 15, 2017 04:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत अग्निशमन करात दीड टक्का आणि पाणीपुरवठा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत अग्निशमन करात दीड टक्का आणि पाणीपुरवठा दरात वाढ करण्याचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. मात्र, कोणतीही कर वाढ करणार नाही, असे स्पष्टीकरण स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी मंगळवारी दिले. केडीएमसीमध्ये मालमत्ता कर सर्वाधिक असताना पुन्हा नव्याने करवाढ करून करदात्यांच्या माथी भुर्दंड मारणार नाही, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली आहे. असे असले तरी या मागे ठाणे, उल्हासनगर व मुंबई महापालिका निवडणुकांचे सावट असल्याची चर्चा आहे.सध्या केडीएमसीच्या योजनेमार्फत सरासरी ३१० दशलक्ष लीटर तर २७ गावांसाठी एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा प्रतिदिन केला जातो. केडीएमसीला प्रतिदिन उल्हास नदीतून २३४ दशलक्ष लीटर पाणी कोटा मंजूर आहे. बारावे आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्राव्यतिरिक्त जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत मोहिली येथे १०० दशलक्ष लीटर व नेतिवली येथे १५० दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्र बांधून कार्यान्वित करण्यात आली आहेत. सध्या ४०० दशलक्ष लीटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता महापालिकेकडे आहे. परंतु, आस्थापना खर्च, विद्युत देयके, देखभाल-दुरुस्तीचा खर्च, रसायनांचा खर्च, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चात दरवर्षी होणारी वाढ, त्यात महापालिकेने जेएनएनयुआरएम योजनेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.महापालिकेने यापूर्वी एप्रिल २०१६ मध्ये दरवाढ केली होती. ही वाढ फक्त वाणिज्य वापरासाठीच केली होती. मात्र, पाण्याची नागरिकांची वाढती गरज व यासाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करता पाणीपुरवठा तोट्यात चालवणे आर्थिकदृष्ट्या धोक्याचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ करणे आवश्यक आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. २७ गावांचा विस्तार लक्षात घेता तेथे मुख्य जलवाहिन्या टाकणे, वितरण वाहिन्या टाकणे, यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे, असेही प्रस्तावात म्हटले आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ नसल्याचे सांगितले जात असताना अग्निशमन दल सक्षमीकरणाचे कारण पुढे करीत दीड टक्क्यांनी करात वाढ करण्याचा प्रस्ताव बुधवारच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, ही करवाढ न करण्याचा निर्णय स्थायी समिती घेणार आहे.पाणी गळती, पाणी चोरी रोखण्यास प्रशासन अपयशी ठरले असताना करदरवाढ नागरिकांच्या माथी कशाला मारता? असा सूरही स्थायी समितीचा आहे. नवनिर्वाचित सभापती रमेश म्हात्रे यांची बुधवारची पहिलीच सभा आहे. त्यामुळे ते यासंदर्भात काय निर्णय घेतात? याकडे कल्याण-डोंबिवलीचे लक्ष लागले होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांनी कोणतीही कर दरवाढ करणार नाही, असे सांगून तूर्तास करदात्यांना दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)