शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

केडीएमसीचे ई-गव्हर्नन्स कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:29 IST

केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा -हास होतो.

कल्याण - केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा ºहास होतो. आता अत्याधुनिक साधने आल्याने पेपरलेस होणे गरजेचे आहे. त्यासाठी विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्त प्रत्येक सदस्याला ई-मेलद्वारे पाठवल्यास महापालिकेचा कारभार खऱ्या अर्थाने पेपरलेस होऊ शकतो, याकडे स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.केडीएमसीच्या बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत हा विषय उपस्थित करण्यात आला. विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्त यांचे कागद नंबरनुसार जुळवण्यात अनेक शिपाई गुंतून राहतात. तसेच विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्तांचे बाड तयार होते. महापालिकेने झेरॉक्स मशीन घेण्याचा विषय या सभेत उपस्थित केला. त्यावेळी याविषयाकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. गोषवारा व इतिवृत्त हे सविस्तर असते. ते ई-मेलद्वारे पाठवावेत. त्याची सुरुवात माझ्यापासून करा, अशी मागणी म्हात्रे यांनी सभापती राहुल दामले यांच्याकडे केली.वर्षाला झेरॉक्सद्वारे छायांकित प्रती काढण्यासाठी सात लाख ५० हजार पेपरचा वापर केला जात असेल, तर आपण किती तरी वृक्षांची कत्तल करतो. एकीकडे वृक्षतोडीस आपण परवानगी देत नाही. एक झाड तोडण्याच्या बदल्यात पाच झाडे लावण्याची हमी घेतो. महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात हजारोंच्या संख्येत झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे किमान महापालिकेने ई-मेलचा वापर केल्यास सात लाख ५० हजार पेपरचा वापर टळू शकतो. त्यातून पर्यावरण संतुलनास मदत होऊ शकते, असे म्हात्रे म्हणाले.यावेळी सदस्य रमेश म्हात्रे म्हणाले, केडीएमसी ही देशातील पहिली ई-गव्हर्नन्स महापालिका आहे. या प्रणालीचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जात आहे. असे असताना महापालिका पेपरलेस झालेली नाही.विषय पत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्ताच्या प्रतिसाठी साडेसात लाख कागदांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त महापालिकेचे विविध विभाग, १० प्रभाग क्षेत्र कार्यालये आहेत. डोंबिवली विभागीय कार्यालय आणि महापालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालयातही पेपरचा वापर केला जातो. तेथे वापरल्या जाणाºया पेपरविषयी सभेत कोणतीही वाच्यता केली नाही. तसेच त्याचा तपशील सचिवांनी दिला नाही. यासाठी लागणारा कागदही वर्षभराच्या आकडेवारीत जास्त असण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामकाजही पेपरलेस झालेले नाहीत. त्यामुळे महापालिकेत पेनलेस कारभार नाही. काही पर्यावरणप्रेमी सदस्यांनी पेपरलेस कारभार व्हावा, असा विचार व्यक्त केला असला तरी अन्य सदस्यांनी त्याचे अनुकरण करणे आवश्यक आहे.सूचनेची अंमलबजावणी आवश्यकदोन्ही सदस्यांच्या मुद्यांचा विचार करून येत्या चार सभांची विषयपत्रिका सोडून गोषवारा, इतिवृत्त ई-मेलद्वारे पाठवल्यास कोणत्या सदस्यांना ते सोयीचे ठरणार आहे, तसे त्यांनी सचिव संजय जाधव यांना कळवावे. इतिवृत्त व गोषवाºयाच्या झेरॉक्स प्रती त्यांना दिल्या जाणार नाही. सगळ्या सदस्यांना ई-मेलची सवय लागणे एका झटक्यात शक्य नाही.त्यामुळे हळूहळू या सूचनेची अंमलबजावणी करावी. सगळ्यांनाच टॅब अथवा मोबाइलवर इतिवृत्त व गोषवारा वाचणे शक्य नाही. सगळेच काही टॅक्नोसॅव्ही नसतात. पण, सूचना चांगली आहे. पर्यावरणपूरक आणि पर्यायावर संतुलनासाठी सूचनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मत दामले यांनी मांडले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाnewsबातम्या