शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

केडीएमसीचे ई-गव्हर्नन्स कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:29 IST

केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा -हास होतो.

कल्याण - केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा ºहास होतो. आता अत्याधुनिक साधने आल्याने पेपरलेस होणे गरजेचे आहे. त्यासाठी विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्त प्रत्येक सदस्याला ई-मेलद्वारे पाठवल्यास महापालिकेचा कारभार खऱ्या अर्थाने पेपरलेस होऊ शकतो, याकडे स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.केडीएमसीच्या बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत हा विषय उपस्थित करण्यात आला. विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्त यांचे कागद नंबरनुसार जुळवण्यात अनेक शिपाई गुंतून राहतात. तसेच विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्तांचे बाड तयार होते. महापालिकेने झेरॉक्स मशीन घेण्याचा विषय या सभेत उपस्थित केला. त्यावेळी याविषयाकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. गोषवारा व इतिवृत्त हे सविस्तर असते. ते ई-मेलद्वारे पाठवावेत. त्याची सुरुवात माझ्यापासून करा, अशी मागणी म्हात्रे यांनी सभापती राहुल दामले यांच्याकडे केली.वर्षाला झेरॉक्सद्वारे छायांकित प्रती काढण्यासाठी सात लाख ५० हजार पेपरचा वापर केला जात असेल, तर आपण किती तरी वृक्षांची कत्तल करतो. एकीकडे वृक्षतोडीस आपण परवानगी देत नाही. एक झाड तोडण्याच्या बदल्यात पाच झाडे लावण्याची हमी घेतो. महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात हजारोंच्या संख्येत झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे किमान महापालिकेने ई-मेलचा वापर केल्यास सात लाख ५० हजार पेपरचा वापर टळू शकतो. त्यातून पर्यावरण संतुलनास मदत होऊ शकते, असे म्हात्रे म्हणाले.यावेळी सदस्य रमेश म्हात्रे म्हणाले, केडीएमसी ही देशातील पहिली ई-गव्हर्नन्स महापालिका आहे. या प्रणालीचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जात आहे. असे असताना महापालिका पेपरलेस झालेली नाही.विषय पत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्ताच्या प्रतिसाठी साडेसात लाख कागदांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त महापालिकेचे विविध विभाग, १० प्रभाग क्षेत्र कार्यालये आहेत. डोंबिवली विभागीय कार्यालय आणि महापालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालयातही पेपरचा वापर केला जातो. तेथे वापरल्या जाणाºया पेपरविषयी सभेत कोणतीही वाच्यता केली नाही. तसेच त्याचा तपशील सचिवांनी दिला नाही. यासाठी लागणारा कागदही वर्षभराच्या आकडेवारीत जास्त असण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामकाजही पेपरलेस झालेले नाहीत. त्यामुळे महापालिकेत पेनलेस कारभार नाही. काही पर्यावरणप्रेमी सदस्यांनी पेपरलेस कारभार व्हावा, असा विचार व्यक्त केला असला तरी अन्य सदस्यांनी त्याचे अनुकरण करणे आवश्यक आहे.सूचनेची अंमलबजावणी आवश्यकदोन्ही सदस्यांच्या मुद्यांचा विचार करून येत्या चार सभांची विषयपत्रिका सोडून गोषवारा, इतिवृत्त ई-मेलद्वारे पाठवल्यास कोणत्या सदस्यांना ते सोयीचे ठरणार आहे, तसे त्यांनी सचिव संजय जाधव यांना कळवावे. इतिवृत्त व गोषवाºयाच्या झेरॉक्स प्रती त्यांना दिल्या जाणार नाही. सगळ्या सदस्यांना ई-मेलची सवय लागणे एका झटक्यात शक्य नाही.त्यामुळे हळूहळू या सूचनेची अंमलबजावणी करावी. सगळ्यांनाच टॅब अथवा मोबाइलवर इतिवृत्त व गोषवारा वाचणे शक्य नाही. सगळेच काही टॅक्नोसॅव्ही नसतात. पण, सूचना चांगली आहे. पर्यावरणपूरक आणि पर्यायावर संतुलनासाठी सूचनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मत दामले यांनी मांडले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाnewsबातम्या