शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

केडीएमसीचे ई प्रभाग कार्यालयच बेकायदा

By admin | Updated: May 3, 2017 05:22 IST

केडीएमसीच्या २७ गावांसाठी सुरू केलेल्या ई-प्रभाग क्षेत्राचे नवे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कार्यालयाची जागा

डोंबिवली : केडीएमसीच्या २७ गावांसाठी सुरू केलेल्या ई-प्रभाग क्षेत्राचे नवे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कार्यालयाची जागा आरक्षित असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेने त्या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याचे स्पष्ट होत आहे. यावर महापालिकेकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने ज्ञानेश्वर सोसायटीतर्फे लवकरच न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. दावडी परिसरातील ‘रिजन्सी गार्डन’मधील प्रशस्त जागेत ई प्रभाग क्षेत्राचे कार्यालय थाटण्यात आले. १२ फेब्रुवारीला या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. परंतु ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची आहे, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केल्याने शुभारंभाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. स्थानिक रहिवासी विश्वनाथ पटवर्धन यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोसायटीतर्फे महापालिका आयुक्त ई रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर, प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनाही कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.महापालिकेच्या नगररचना विभागाने मंजुरी दिल्याप्रमाणे ही जागा दवाखाना व बालवाडी, यासाठी आरक्षित ठेवल्याकडे तक्रारदार विश्वनाथ पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. या आरक्षित जागेवर ई प्रभाग कार्यालय थाटणे म्हणजे एकप्रकारे महापालिकेकडूनच अतिक्रमण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या अतिक्रमण प्रकरणी पटवर्धन यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात आयुक्तांसह अन्य एका खाजगी संस्थेविरोधात तक्रार दिली आहे. तसेच ज्ञानेश्वर सोसायटीने केडीएमसीचे आयुक्त, महापौर, प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनाही कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.दरम्यान, पटवर्धन यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत जेथे हे कार्यालय उभारले आहे, ती जागा अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून दवाखाना आणि बालवाडी, यासाठी आरक्षित असल्याचे समोर आले आहे. या क्षेत्राचा वापर हा स्थानिक तसेच संकुलातील रहिवाशांनी करावयाचा आहे. या क्षेत्राची विक्री करता येणार नाही, असेही दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. या माहितीच्या आधारे महापालिकेने या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे पटवर्धन यांचे म्हणणे आहे. पाण्यासाठी वणवणपिण्याच्या पाण्यासाठी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी तसेच टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. विशेष म्हणजे, पाण्याची नवीन जोडणीही घेतलेली नाही. टाकीचा पंप बिघडल्याने टँकरचे पाणीही आता मिळेनासे झाले आहे. बांधकाम विभागाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खर्च लाखोंचा पण पाण्यासाठी वणवण, असे काहीसे चित्र चार दिवसांपासून या कार्यालयात पहावयास मिळत आहे. पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागाची यात टोलवाटोलवी सुरू असल्याने ही समस्या ‘जैसे थे’ आहे. (प्रतिनिधी)महासंचालकांकडे दाद मागणारई-प्रभाग कार्यालयाच्या झालेल्या अतिक्रमणप्रकरणी महाराष्ट्र रिजनल अ‍ॅण्ड टाउन प्लानिंग अ‍ॅक्टनुसार कारवाई व्हावी, अशी तक्रार विश्वनाथ पटवर्धन यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. महापालिका आणि अन्य एका संस्थेने बेकायदा बांधकाम केले असून सोसायटीचा विश्वासघात, फसवणूक केली आहे. हे कृत्य दखलपात्र गुन्हा असून संबंधितांवर एफआयआर दाखल करून गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे. परंतु, पोलीस गुन्हा दाखल करण्यास जाणुनबुजून टाळाटाळ करतात, असा आरोप त्यांचा आहे.वारंवार निदर्शनास आणूनही दखल घेतली जात नसल्याने पोलीस महासंचालक तसेच ठाणे पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.