शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे ई प्रभाग कार्यालयच बेकायदा

By admin | Updated: May 3, 2017 05:22 IST

केडीएमसीच्या २७ गावांसाठी सुरू केलेल्या ई-प्रभाग क्षेत्राचे नवे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कार्यालयाची जागा

डोंबिवली : केडीएमसीच्या २७ गावांसाठी सुरू केलेल्या ई-प्रभाग क्षेत्राचे नवे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कार्यालयाची जागा आरक्षित असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेने त्या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याचे स्पष्ट होत आहे. यावर महापालिकेकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने ज्ञानेश्वर सोसायटीतर्फे लवकरच न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. दावडी परिसरातील ‘रिजन्सी गार्डन’मधील प्रशस्त जागेत ई प्रभाग क्षेत्राचे कार्यालय थाटण्यात आले. १२ फेब्रुवारीला या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. परंतु ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची आहे, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केल्याने शुभारंभाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. स्थानिक रहिवासी विश्वनाथ पटवर्धन यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोसायटीतर्फे महापालिका आयुक्त ई रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर, प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनाही कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.महापालिकेच्या नगररचना विभागाने मंजुरी दिल्याप्रमाणे ही जागा दवाखाना व बालवाडी, यासाठी आरक्षित ठेवल्याकडे तक्रारदार विश्वनाथ पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. या आरक्षित जागेवर ई प्रभाग कार्यालय थाटणे म्हणजे एकप्रकारे महापालिकेकडूनच अतिक्रमण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या अतिक्रमण प्रकरणी पटवर्धन यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात आयुक्तांसह अन्य एका खाजगी संस्थेविरोधात तक्रार दिली आहे. तसेच ज्ञानेश्वर सोसायटीने केडीएमसीचे आयुक्त, महापौर, प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनाही कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.दरम्यान, पटवर्धन यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत जेथे हे कार्यालय उभारले आहे, ती जागा अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून दवाखाना आणि बालवाडी, यासाठी आरक्षित असल्याचे समोर आले आहे. या क्षेत्राचा वापर हा स्थानिक तसेच संकुलातील रहिवाशांनी करावयाचा आहे. या क्षेत्राची विक्री करता येणार नाही, असेही दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. या माहितीच्या आधारे महापालिकेने या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे पटवर्धन यांचे म्हणणे आहे. पाण्यासाठी वणवणपिण्याच्या पाण्यासाठी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी तसेच टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. विशेष म्हणजे, पाण्याची नवीन जोडणीही घेतलेली नाही. टाकीचा पंप बिघडल्याने टँकरचे पाणीही आता मिळेनासे झाले आहे. बांधकाम विभागाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खर्च लाखोंचा पण पाण्यासाठी वणवण, असे काहीसे चित्र चार दिवसांपासून या कार्यालयात पहावयास मिळत आहे. पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागाची यात टोलवाटोलवी सुरू असल्याने ही समस्या ‘जैसे थे’ आहे. (प्रतिनिधी)महासंचालकांकडे दाद मागणारई-प्रभाग कार्यालयाच्या झालेल्या अतिक्रमणप्रकरणी महाराष्ट्र रिजनल अ‍ॅण्ड टाउन प्लानिंग अ‍ॅक्टनुसार कारवाई व्हावी, अशी तक्रार विश्वनाथ पटवर्धन यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. महापालिका आणि अन्य एका संस्थेने बेकायदा बांधकाम केले असून सोसायटीचा विश्वासघात, फसवणूक केली आहे. हे कृत्य दखलपात्र गुन्हा असून संबंधितांवर एफआयआर दाखल करून गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे. परंतु, पोलीस गुन्हा दाखल करण्यास जाणुनबुजून टाळाटाळ करतात, असा आरोप त्यांचा आहे.वारंवार निदर्शनास आणूनही दखल घेतली जात नसल्याने पोलीस महासंचालक तसेच ठाणे पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.