शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी

By admin | Updated: November 11, 2015 00:01 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते. परिणामी नागरिक अधिक त्रस्त झाले. मतांची कमी टक्केवारी हे त्याचे निदर्शक आहे. आता नागरिकांना केवळ विकास हवा आहे. त्यामुळेच त्यांनी या निवडणुकीत शिवसेना किंवा भाजपाला संपूर्ण बहुमत दिलेले नाही. शिवसेनेच्या तुलनेने भाजपने निदान स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांवरच भर देणार असल्याचे सांगून आतापर्यंत ते झाले नसल्याचे कबूल केले. त्या तुलनेने शिवसेनेने मात्र त्यांनी जे गेल्या १५ वर्षात केलेच नाही ते दाखवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची भावना नागरिकांमध्ये होती. शिवसेनेच्या होर्डीग्जमध्ये देखील एक मत बाळासाहेबांना ही कॅच लाईन टाकली होती. त्यामुळे अजूनही बाळासाहेबांच्या नावानेच मते का मागावी लागतात, भावनेशी खेळून काय मिळणार, असा सवाल डोंबिवलीकरांनी केला. परिणामी डोंबिवलीकरांनी त्यांच्या उमेदवारांना चांगलेच पाणी पाजले. कल्याणमध्येही शिवसेनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यांच्या विद्यमान महापौरांसह सभागृह नेते कैलास शिंदे यांनाही नागरिकांनी घरचा रस्ता दाखवला. निवडणुकीच्या गेल्या पंधरा-वीस दिवसात डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये कल्याणमधील शिवसैनिकांमधील हेवेदावे ज्या पद्धतीने चव्हाट्यावर आले होते, त्याचा समाचार शिवसैनिकांसह प्रसिद्धी माध्यमांनी घेतला होता. एकमेकांना शिवीगाळ करणे, खुर्च्या उचलून फेकण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. तर काहींची हातापायी झाली होती. नागरिकांना अशा पद्धतीचे वातावरण नको आहे. सशक्त लोकशाहीसोबतच खेळीमेळीचे वातावरण अपेक्षित आहे. प्रचार काळात शिवीगाळ, दादागिरी, मारहाण याला ऊत आला. मनसेने नाशिकमध्ये त्यांनी जे दिवे लावले त्याचे गुणगान करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या येथील नगरसेवकांनी स्वत:च्या वॉर्डांसह परिसराची जी दैनावस्था केली होती, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. फेरीवाल्यापासून -(दाबेली वाल्या) व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांना वेठीस धरण्याची किंमत काही लोकप्रतिनिधींना मोजावी लागली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना तर स्वत:ला निवडणुकीत सिद्धही करता आले नाही. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत सातत्याने त्यांची पिछेहाट झाली आहे. विरोधकांची भूमिका करण्याची संधी असतानाही त्यामध्ये दोन्ही काँग्रेसला यश आले नाही. भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदीं बद्दलचा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मतदारांना आपल्या स्वच्छ चारित्र्याची घातलेली आर्त साद हे एकमेव कारण आहे. स्थानिक नेतृत्वामध्ये डोंबिवलीतील आमदार वगळता कल्याणमधील विशेषत: पश्चिमेतील आमदार आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. त्या २७ गावांमध्येही डोंबिवलीचाच ट्रेंड असल्याने तेथेही संघर्ष समितीच्या माध्यमातून भाजपला यश मिळाले. तेथील बहुतांशी नागरिक - चाकरमानी हा जीवनावश्यक वस्तूंसह दळणवळणासाठी डोंबिवलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे या शहरासह येथील रहिवाशांची त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत.