शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी

By admin | Updated: November 11, 2015 00:01 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते. परिणामी नागरिक अधिक त्रस्त झाले. मतांची कमी टक्केवारी हे त्याचे निदर्शक आहे. आता नागरिकांना केवळ विकास हवा आहे. त्यामुळेच त्यांनी या निवडणुकीत शिवसेना किंवा भाजपाला संपूर्ण बहुमत दिलेले नाही. शिवसेनेच्या तुलनेने भाजपने निदान स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांवरच भर देणार असल्याचे सांगून आतापर्यंत ते झाले नसल्याचे कबूल केले. त्या तुलनेने शिवसेनेने मात्र त्यांनी जे गेल्या १५ वर्षात केलेच नाही ते दाखवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची भावना नागरिकांमध्ये होती. शिवसेनेच्या होर्डीग्जमध्ये देखील एक मत बाळासाहेबांना ही कॅच लाईन टाकली होती. त्यामुळे अजूनही बाळासाहेबांच्या नावानेच मते का मागावी लागतात, भावनेशी खेळून काय मिळणार, असा सवाल डोंबिवलीकरांनी केला. परिणामी डोंबिवलीकरांनी त्यांच्या उमेदवारांना चांगलेच पाणी पाजले. कल्याणमध्येही शिवसेनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यांच्या विद्यमान महापौरांसह सभागृह नेते कैलास शिंदे यांनाही नागरिकांनी घरचा रस्ता दाखवला. निवडणुकीच्या गेल्या पंधरा-वीस दिवसात डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये कल्याणमधील शिवसैनिकांमधील हेवेदावे ज्या पद्धतीने चव्हाट्यावर आले होते, त्याचा समाचार शिवसैनिकांसह प्रसिद्धी माध्यमांनी घेतला होता. एकमेकांना शिवीगाळ करणे, खुर्च्या उचलून फेकण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. तर काहींची हातापायी झाली होती. नागरिकांना अशा पद्धतीचे वातावरण नको आहे. सशक्त लोकशाहीसोबतच खेळीमेळीचे वातावरण अपेक्षित आहे. प्रचार काळात शिवीगाळ, दादागिरी, मारहाण याला ऊत आला. मनसेने नाशिकमध्ये त्यांनी जे दिवे लावले त्याचे गुणगान करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या येथील नगरसेवकांनी स्वत:च्या वॉर्डांसह परिसराची जी दैनावस्था केली होती, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. फेरीवाल्यापासून -(दाबेली वाल्या) व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांना वेठीस धरण्याची किंमत काही लोकप्रतिनिधींना मोजावी लागली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना तर स्वत:ला निवडणुकीत सिद्धही करता आले नाही. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत सातत्याने त्यांची पिछेहाट झाली आहे. विरोधकांची भूमिका करण्याची संधी असतानाही त्यामध्ये दोन्ही काँग्रेसला यश आले नाही. भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदीं बद्दलचा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मतदारांना आपल्या स्वच्छ चारित्र्याची घातलेली आर्त साद हे एकमेव कारण आहे. स्थानिक नेतृत्वामध्ये डोंबिवलीतील आमदार वगळता कल्याणमधील विशेषत: पश्चिमेतील आमदार आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. त्या २७ गावांमध्येही डोंबिवलीचाच ट्रेंड असल्याने तेथेही संघर्ष समितीच्या माध्यमातून भाजपला यश मिळाले. तेथील बहुतांशी नागरिक - चाकरमानी हा जीवनावश्यक वस्तूंसह दळणवळणासाठी डोंबिवलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे या शहरासह येथील रहिवाशांची त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत.