शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी

By admin | Updated: November 11, 2015 00:01 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते. परिणामी नागरिक अधिक त्रस्त झाले. मतांची कमी टक्केवारी हे त्याचे निदर्शक आहे. आता नागरिकांना केवळ विकास हवा आहे. त्यामुळेच त्यांनी या निवडणुकीत शिवसेना किंवा भाजपाला संपूर्ण बहुमत दिलेले नाही. शिवसेनेच्या तुलनेने भाजपने निदान स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांवरच भर देणार असल्याचे सांगून आतापर्यंत ते झाले नसल्याचे कबूल केले. त्या तुलनेने शिवसेनेने मात्र त्यांनी जे गेल्या १५ वर्षात केलेच नाही ते दाखवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची भावना नागरिकांमध्ये होती. शिवसेनेच्या होर्डीग्जमध्ये देखील एक मत बाळासाहेबांना ही कॅच लाईन टाकली होती. त्यामुळे अजूनही बाळासाहेबांच्या नावानेच मते का मागावी लागतात, भावनेशी खेळून काय मिळणार, असा सवाल डोंबिवलीकरांनी केला. परिणामी डोंबिवलीकरांनी त्यांच्या उमेदवारांना चांगलेच पाणी पाजले. कल्याणमध्येही शिवसेनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यांच्या विद्यमान महापौरांसह सभागृह नेते कैलास शिंदे यांनाही नागरिकांनी घरचा रस्ता दाखवला. निवडणुकीच्या गेल्या पंधरा-वीस दिवसात डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये कल्याणमधील शिवसैनिकांमधील हेवेदावे ज्या पद्धतीने चव्हाट्यावर आले होते, त्याचा समाचार शिवसैनिकांसह प्रसिद्धी माध्यमांनी घेतला होता. एकमेकांना शिवीगाळ करणे, खुर्च्या उचलून फेकण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. तर काहींची हातापायी झाली होती. नागरिकांना अशा पद्धतीचे वातावरण नको आहे. सशक्त लोकशाहीसोबतच खेळीमेळीचे वातावरण अपेक्षित आहे. प्रचार काळात शिवीगाळ, दादागिरी, मारहाण याला ऊत आला. मनसेने नाशिकमध्ये त्यांनी जे दिवे लावले त्याचे गुणगान करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या येथील नगरसेवकांनी स्वत:च्या वॉर्डांसह परिसराची जी दैनावस्था केली होती, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. फेरीवाल्यापासून -(दाबेली वाल्या) व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांना वेठीस धरण्याची किंमत काही लोकप्रतिनिधींना मोजावी लागली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना तर स्वत:ला निवडणुकीत सिद्धही करता आले नाही. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत सातत्याने त्यांची पिछेहाट झाली आहे. विरोधकांची भूमिका करण्याची संधी असतानाही त्यामध्ये दोन्ही काँग्रेसला यश आले नाही. भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदीं बद्दलचा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मतदारांना आपल्या स्वच्छ चारित्र्याची घातलेली आर्त साद हे एकमेव कारण आहे. स्थानिक नेतृत्वामध्ये डोंबिवलीतील आमदार वगळता कल्याणमधील विशेषत: पश्चिमेतील आमदार आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. त्या २७ गावांमध्येही डोंबिवलीचाच ट्रेंड असल्याने तेथेही संघर्ष समितीच्या माध्यमातून भाजपला यश मिळाले. तेथील बहुतांशी नागरिक - चाकरमानी हा जीवनावश्यक वस्तूंसह दळणवळणासाठी डोंबिवलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे या शहरासह येथील रहिवाशांची त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत.