शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

केडीएमसीची भिवंडी-कल्याण बस पुन्हा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:08 IST

गेल्या काही वर्षापासून बंद असलेली केडीएमसीची भिवंडी-कल्याण सिटीबस शिवाजी चौकातून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे.

भिवंडी - गेल्या काही वर्षापासून बंद असलेली केडीएमसीची भिवंडी-कल्याण सिटीबस शिवाजी चौकातून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे. ही बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थी व नोकरदारांची मोठी सोय झाली असून त्यांनी या सेवेचे स्वागत केले आहे.भिवंडीतील नागरिकांच्या मागणीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेने शिवाजी चौक ते कल्याण सिटीबस सुरू केली. या सिटीबसला रिक्षाचालकांनी विरोध केला. काही रिक्षाचालकांनी कल्याणरोड भागात बसच्या काचा फोडल्या.केडीएमसी व्यवस्थापनाने अधिक नुकसान होऊ नये म्हणून शहरात येणाऱ्या सिटीबस बंद केल्या. मनपाचे नगरसेवक, पोलीस उपायुक्त व लोकप्रतिनिधी यांनी रिक्षा चालकांवर कोणतीही ठोस कारवाई न करता दररोज होणारी प्रवाश्यांची लूट उघड्या डोळ्यांनी पाहिली. भिवंडी महापालिकेने गेल्या पंचवीस वर्षापासून आश्वासन देऊनही सिटीबस सुरू केली नाही. त्यामुळे जवळ असलेले कल्याण अथवा ठाणे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी एस.टी. बस शिवाय पर्याय नव्हता.दरम्यान केडीएसीची बस गोपाळनगरपर्यंत येऊ लागली तर ठाणे मनपाची बससेवा नारपोली व शिवाजी चौकापर्यंत यापूर्वी सुरू झाली. १ मे २०१९ रोजी भिवंडी-कल्याण प्रवासी बससेवा दर पंधरा मिनिटांनी सुरू झाली आहे. या मार्गावर भिवंडीतील शिवाजी चौक येथून पहिली बस पहाटे ३.३५ ची असून त्यानंतर ६.५५ वाजता पहिली बस शिवाजी चौकातून कल्याण येथे जाणार आहे तर शेवटची बस रात्री १२.५५ वाजता सुटणार आहे. कल्याणहून येण्यासाठी पहिली बस सकाळी ६ वाजता असून शेवटची बस १२ वाजता आहे. त्यानंतर पहाटे ३ वाजता एक बस येणार आहे. रात्री उशीरा सुटणाºया बसमुळे उत्तर भारतातून येणाºया सर्व कामगार व प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. केडीएमसीच्या वतीने ही बससेवा सुरू करून भिवंडीतील प्रवाशांची चांगलीच सोय केली आहे.बसच्या काचाही फोडल्याभिवंडीतील नागरिकांच्या मागणीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेने शिवाजी चौक ते कल्याण सिटीबस सुरू केली. त्याला रिक्षाचालकांनी विरोध केला. काही चालकांनी कल्याणरोड भागात बसच्या काचा फोडल्या. अधिक नुकसान होऊ नये म्हणून या बंद केल्या.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका