शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

KDMC: मनसेच्या दणक्यानंतर निघाला कामगारांच्या पगाराचा चेक

By मुरलीधर भवार | Updated: October 12, 2023 17:07 IST

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ््या खाजगी कचरा ठेकेदाराकडून कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही. पगार दिला जात नसल्याने मनसे कामगार संघटनेच्या वतीने काल कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते.

- मुरलीधर भवार

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ््या खाजगी कचरा ठेकेदाराकडून कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही. पगार दिला जात नसल्याने मनसे कामगार संघटनेच्या वतीने काल कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराचे बील काढण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांना एक महिन्याचा पगार दिला जाणार आहे.

महापालिकेने सेक्यूअर आणि आरएमडी या दोन खाजगी ठेकेदार कंपन्याना कचरा उचलण्याचा ठेका दिला आहे. या दोन्ही ठेकेदारांकडे जवळपास १ हजार इतके कंत्राटी कामगार आहे. या कामगाराना वेळेत पगार दिला जात नाही. १० तारखेला पगार द्यावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी केली होती. १० तारीख उलटून गेल्यावरही पगार जमा न झाल्याने मनसेच्या वतीने कामगारांनी काल काम बंद आंदोलन केले होते. काम बंद आंदोलन केल्यास शहरातील ठिकठिकाणचा कचरा उचलला गेला नाही. कामगारांच्या आंदोलनाच दखल घेत आज महापालिका प्रशासनाकडून दोन्ही ठेकेदाराचा २ कोटीचा चेक काढण्यात आला आहे असे वित्त आणि लेखा विभागाकडून सांगण्यात आले आहे. या दोन कोटीच्या चेकमधून ठेकेदार केवळ एक महिन्याचा पगार कामगाराना देऊ शकणार आहे. मनसेच्या मते गेल्या तीन महिन्याचा पगार थकला आहे. एक महिन्याचा पगार दिला जाणार असला तरी थकीत दोन महिन्याचा पगारही दिला जावा. येत्या महिन्यात दिवाळीचा सण आहे. कामगारांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी त्यांचे थकीत वेतनासह चालू महिन्याचे वेतनही दिले जावे. हा विषय महापालिकेशी निगडीत नाही. मात्र महापालिकेकडून ठेकेदाराची बिले वेळेत दिली गेली तर कामगारांना पगार वेळेत मिळू शकतो. महापालिकेच्या लेखा आणि वित्त विभागाकडे विचारणा केली असता आमच्याकडून बिले थकीत ठेवली जात नाही. ठेकेदाराकडून बिल सादर होताच त्यानुसार बिल काढले जाते.

ठेकेदाराकडून पिळवणूकमहापालिकेने कचरा उचलण्यासाठी दोन ठेकेदार कंपन्याना ठेका दिला आहे. मात्र ठेकेदार कामगारांना १२ हजार रुपयांचे वेतन देतो. हे वेतन कंपनी अ’क्ट प्रमाणे दिले जात आहे. मात्र सरकारने प्रत्येक कामगाराला किमान वेतन देण्याचा कायदा केला आहे. हा कायदा केवळ कागदावरच आहे. कंत्राटी कामगारांना सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार २४ हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे. प्रत्येक कामगारामागे १२ हजार रुपये कोण गायब करीत आहे असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष भोईर यांनी उपस्थित केला आहे. कामगारांचे पैसे मध्यल्या मध्ये ठेकेदार खात आहे की, महापालिकेतील अधिकारी खात आहेत. याची चौकशी कोण करणार ? जोपर्यंत याचा छडा लागत नाही. तोपर्यंत कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबणार नाही. या प्रकरणात मनसेचे कामगार संघटनेचे पदाधिकारी राजेश उज्जेनकर यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रार अर्जाचा पोलिसांकडून तपास केला जात नाही. पोलिस कामगारांच्या वेतनाची मलई खाणाऱ््यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप उज्जेनकर यांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे