शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

केडीएमसीत सामान्य नागरिकांना दुपारी तीननंतरच मिळणार प्रवेश

By admin | Updated: January 7, 2016 00:35 IST

नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आपल्याला भेटा, असा फतवा आयुक्त

कल्याण : नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आपल्याला भेटा, असा फतवा आयुक्त ई. रवींद्रन यांनी नुकताच जारी केला असताना आता यात आणखीन एका फतव्याची भर पडली आहे. यानुसार, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना भेटायचे असल्यास नागरिकांना दुपारी ३ नंतरच मुख्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. एकीकडे समस्यांचे निराकरण वेळेवर होत नसल्याची तक्रार असताना दुसरीकडे अशा प्रकारचे वेळेचे बंधन घातले गेल्याने नागरिकांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे.मुख्यालयात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत असल्याने बऱ्याचदा अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय येतो. त्यामुळे दैनंदिन कामकाज करण्यास त्यांना अडथळा निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालय इमारतीतील प्रवेशाचे ज्या प्रकारे नियमन केले आहे, त्या धर्तीवर केडीएमसी मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश देण्याबाबत नियमन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने वेळेचे हे नियमन केल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेच्या सेवेत असलेले अधिकारी आणि कर्मचारी, सर्व पदाधिकारी, महापालिका सदस्य तसेच अन्य लोकप्रतिनिधी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी येणारे शासकीय, अशासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांना महापालिकेत कधीही येण्याची मुभा असेल. परंतु, वैयक्तिक कामासाठी त्यांना सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना दुपारी ३ वाजल्यानंतरच भेटता येईल, असेही जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. हे आदेश १ जानेवारीपासून लागू केले असले तरी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने मात्र बुधवारी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. (प्रतिनिधी)