शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत सामान्य नागरिकांना दुपारी तीननंतरच मिळणार प्रवेश

By admin | Updated: January 7, 2016 00:35 IST

नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आपल्याला भेटा, असा फतवा आयुक्त

कल्याण : नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आपल्याला भेटा, असा फतवा आयुक्त ई. रवींद्रन यांनी नुकताच जारी केला असताना आता यात आणखीन एका फतव्याची भर पडली आहे. यानुसार, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना भेटायचे असल्यास नागरिकांना दुपारी ३ नंतरच मुख्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. एकीकडे समस्यांचे निराकरण वेळेवर होत नसल्याची तक्रार असताना दुसरीकडे अशा प्रकारचे वेळेचे बंधन घातले गेल्याने नागरिकांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे.मुख्यालयात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत असल्याने बऱ्याचदा अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय येतो. त्यामुळे दैनंदिन कामकाज करण्यास त्यांना अडथळा निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालय इमारतीतील प्रवेशाचे ज्या प्रकारे नियमन केले आहे, त्या धर्तीवर केडीएमसी मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश देण्याबाबत नियमन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने वेळेचे हे नियमन केल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेच्या सेवेत असलेले अधिकारी आणि कर्मचारी, सर्व पदाधिकारी, महापालिका सदस्य तसेच अन्य लोकप्रतिनिधी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी येणारे शासकीय, अशासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांना महापालिकेत कधीही येण्याची मुभा असेल. परंतु, वैयक्तिक कामासाठी त्यांना सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना दुपारी ३ वाजल्यानंतरच भेटता येईल, असेही जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. हे आदेश १ जानेवारीपासून लागू केले असले तरी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने मात्र बुधवारी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. (प्रतिनिधी)