शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

केडीएमसीत ५३५ कोटींचा घोटाळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 01:21 IST

केडीएमसी हद्दीतील बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्स वसूल न करता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला गेला आहे,

कल्याण : केडीएमसी हद्दीतील बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्स वसूल न करता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला गेला आहे, ही गंभीर बाब माहितीच्या अधिकारात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उघडकीस आणली आहे. बिल्डर, वास्तुविशारद, नगररचना विभाग, कर विभागाच्या संगनमताने हा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे ५३५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार म्हात्रे यांनी लोकायुक्तांकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. महापालिकेतील या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून दोषींविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.एखाद्या इमारतीकडून अथवा बिल्डरकडून कराची रक्कम भरली गेली नसेल, तर त्याला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जात नाही. बिल्डरांनी ओपन लॅण्ड टॅक्स भरलेला नाही. असे असतानाही त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. हा दाखला देण्यापूर्वी करवसुली करणे अपेक्षित आहे. महापालिका हद्दीतील बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्सप्रकरणी ४१९ कोटी रुपये थकबाकी स्वरूपात येणे बाकी होते. त्यापैकी ५० टक्के रक्कम अर्थात २०८ कोटी रुपये जमा झाल्याशिवाय कर दर कमी करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठविला होता. या अटीशर्तींपोटी बिल्डरांना करदरात सूट मिळत नव्हती. त्यामुळे नव्याने ठराव करण्यात आला. त्यात करदर कमी करण्यात आले.प्रत्यक्षात या ठरावाच्या वेळी नागरिकांना आकारण्यात येणारा मालमत्ताकर ७१ टक्के असून, तो कमी करावा, तसा प्रस्ताव आणला जावा, अशी मागणी केली होती. याविषयी म्हात्रे यांनी महासभेत आवाज उठवला होता.मात्र, नागरिकांचा कर कमी करण्याचा प्रस्ताव अजूनही मंजूर केलेला नाही. मालमत्ताकर लागू केल्यावर तो कमी करता येत नाही, असे कारण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले. मग ओपन लॅण्ड टॅक्स कशाच्या आधारे कमी केला, असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे.

>एक हजार कोटी वसुलीचा दावाही फोलओपन लॅण्ड टॅक्स कमी करूनही महापालिकेच्या तिजोरीत या करापोटी अपेक्षित रक्कम बिल्डरांकडून जमा झालेली नाही. बिल्डर व नागरिकांना मालमत्ताकराची थकबाकी भरण्यासाठी तीन टप्प्यांत अभय योजना जाहीर केली गेली. त्यातून एक हजार कोटी वसूल होतील, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, तो दावाही फोल ठरला, असा मुद्दा म्हात्रे यांनी मांडला आहे. या सगळ्यांत जवळपास ५३५ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. या सगळ्यांचे विशेष लेखापरीक्षण केल्यास घोटाळ्याचे गौडबंगाल उघड होणार आहे. म्हात्रे यांनी केलेला आरोप हा गंभीर असल्याने त्यांनी स्वत: प्रतिज्ञापत्रही लिहून दिले आहे.