शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कर्नाटकच्या ५३० कासवांना वनखात्याचा ठाण्यात आठ दिवस पाहुणचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:28 IST

या कासवांची तस्करीकरूनरेल्वेने कुर्ला येथे आणलेल्या शोपी (३४) या महिलेलादेखील न्यायालयासमोर हजार केले असता तिला पाच दिवसांची वनविभागाची कस्टडी मिळाल्याचे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी लोकमतला सांगितले. कर्नाटक -आंध्र प्रदेशातून कासवांची ही ५३० पिले गुरुवारी रेल्वेद्वारे कुर्ला येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वनअधिकाऱ्यांसह डीआरआय आणि डब्ल्यूसीसीबीच्या अधिका-यांनी सापळा रचून या महिलेला कासवांसह रंगेहाथ पकडले.

ठळक मुद्दे* तस्कर महिलेला पाच दिवसांची कोठडी* न्यायालयीन परवानगीनंतरच कर्नाटकात सोडणार कासवांच्या पिलांची रोज निगा राखून त्यांचे मेडिकलही करावे लागणार

ठाणे : तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेले सुमारे ५३० कासव येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथे हस्तगत केले. शनिवारी ठाणे न्यायालयाने ते सोडण्याची परवानगी दिली. यानुसार, या कासवांचा निवास असलेल्या कर्नाटक न्यायालयाकडून तशी परवानगी घेऊनच त्यांना तेथे सोडावे लागेल. तोपर्यंत या कासवांना येथील वनखात्याचा सुमारे आठ दिवस तरी पाहुणचार घ्यावा लागणार आहे.या कासवांची तस्करीकरूनरेल्वेने कुर्ला येथे आणलेल्या शोपी (३४) या महिलेलादेखील न्यायालयासमोर हजार केले असता तिला पाच दिवसांची वनविभागाची कस्टडी मिळाल्याचे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी लोकमतला सांगितले. कर्नाटक -आंध्र प्रदेशातून कासवांची ही ५३० पिले गुरुवारी रेल्वेद्वारे कुर्ला येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वनअधिकाऱ्यांसह डीआरआय आणि डब्ल्यूसीसीबीच्या अधिका-यांनी सापळा रचून या महिलेला कासवांसह रंगेहाथ पकडल्याचे कंक यांनी स्पष्ट केले.मुंबईतील एका पार्टीने या कासवांची आॅर्डर दिल्याचे पकडलेल्या या शोपीकडून सांगितले जात आहे. त्याच्या सांगण्यानुसार कासवांची ही तस्करी करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांची मागणी करणाºयापर्यंत ही शोपी घेऊन जाईल, अशी वनअधिकाºयांची अपेक्षा आहे. त्यासाठी तिच्याशी सुसंवाद साधून या तस्करीचे राज उलगडण्याचा प्रयत्न वनअधिकाºयांकडून सुरू आहे. वनखात्याच्या कस्टडीतील या महिलेकडून अन्यही काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार, तिला बोलते करण्याचा प्रयत्न सुरू आहे.तस्करीच्या नावाखाली पकडलेल्या या कासवांचे मेडिकल करण्यात येत आहे. त्यांना पोषक खाद्यही दिले जात आहे. या कासवांना येथील हवामान मानवणार नाही. त्यांचा अधिवास कर्नाटक, आंध्रमधील आहे. यामुळे त्यांना तेथील जंगलात सोडावे लागेल. यासाठी आपल्या न्यायालयाने शनिवारी परवानगी दिली. याप्रमाणे आता कर्नाटक न्यायालयाची परवानगी घेऊन कर्नाटक वनअधिका-यांच्या साहाय्याने तेथील जंगलात, तलावांत त्यांना सोडावे लागेल. त्यासाठी आपले खास पथक पाठवावे लागेल. तोपर्यंत या कासवांच्या पिलांची रोज निगा राखून त्यांचे मेडिकलही करावे लागणार असल्याचे कंक यांच्याकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभाग