शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

स्वस्त धान्य दुकानांवर कर्नाटकचा तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:27 IST

शहापुरात रॅकेट उघड : श्रमजीवीची धाड, ५00 गोण्यांचा साठा दिला पकडून

ठाणे : रायगड जिल्ह्यातील तळेगाव येथील धनंजय राईस मिलच्या नावाने शहापूर येथील शासकीय गोदामात कर्नाटकातून आलेला तब्बल ५०० गोण्या तांदूळ श्रमजिवीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पकडून तहसीलदारांच्या हवाली केला आहे. कर्नाटकच्या ट्रकमधून तो शहापुरात आणल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा पंचनामा करून श्रमजिवीने आदिवासी विकास महामंडाळाचे पितळ उघड केल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची भात भरडाई प्रक्रिया कशी भ्रष्टाचाराने बरबटली आहे, या शहापुरात पकडलेल्या तांदळावरून दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भात ज्या मिलर्सला भरडाईसाठी शासन देते आणि त्याबदल्यात तांदूळ घेते, यानुसार रायगडच्या तळेगाव धनंजय राईसच्या मिलकडून शहापूरला तांदूळ आला आहे. पण तो ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नसून कर्नाटक राज्यातील शेतकºयांचा आहे. यामुळे कर्नाटक राज्याची पासिंग असलेल्या असलेल्या ट्रक व्दारे कर्नाटकच्या या तांदळाची वाहतूक थेट शहापूरच्या शासकीय गोडाऊनमध्ये होत असल्याची गंभीरबाब जिल्हा पुरवठा अधिकारी वळवी, शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्या निदर्शनात आणून दिल्याचे श्रमजीवी संघटनेचे युवा जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनी सांगितले.

शासकीय गोडाऊनमध्ये रायगडच्या तळेगाव येथील धनंजय राईसच्या मिल येथून हा ५०० गोण्या तांदूळ आला आहे. तो नियमानुसार आम्ही उतरवून घेतला आहे. ज्या ट्रकमधून हा तांदूळ आलेला आहे. त्या ट्रकची पासिंग कर्नाटकची असल्यामुळे तो कर्नाटक राज्यातून आल्याचा संशय आहे. पण तांदूळपुरवठा करणाºया एजन्सीची निवड शासन पातळीवरून केली जाते. त्यानुसार रायगड येथील मिलमधून तांदूळ आल्यामुळे आम्ही तो उतवून घेतल्याचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी लोकमतला सांगितले.

परजिल्ह्यातील मिल्सचा सहभाग असल्याचा संशयया तांदळामुळे ज्या मिलर्सचा घोटाळा बाहेर आला, त्या मिलने राज्य आदिवासी विकास महामंडळाचे २० लॉट पूर्ण केले आणि आता अजून ५४ लॉट काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे तब्बल २९ हजार ६०० क्विंटल भात केवळ महामंडळाचा त्यानी घेतला असून या व्यतिरिक्त दि. महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा कार्यालय ठाणे यांच्याकडून यावर्षी १५ हजार १५६ क्विंटल भात उचल केल्याचे समजते. मुरबाड येथील जवळच्या मिलर्स मिलिंग करण्यास तयार असताना त्याला डावलून धनंजय मिलला काम देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या रायगडच्या मिलर्सने भरडईच्या अनुदानासह तांदूळ वाहतूक अनुदान, बारदान खरेदीचे अनुदान शासनाकडून प्राप्त करून एक कोटी ३४ लाख ७७ हजार रु पयांचा घोटाळा केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. याप्रमाणेच इतर परजिल्ह्यातील मिलर्स हाच प्रकार करीत असावेत, असा संशय आहे.

बारदान कलर कोडिंगला हरताळशासन निर्णयानुसार तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बारदान कलर कोडिंगबाबत नियमावली आहे. मात्र, त्याचा भंग करून प्लॅस्टिक बॅगचा सर्रास वापर करून हा तांदूळ काळ्या बाजारात जाण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप पवार यानी केला.याशिवाय या भरडाई प्रक्रि येत ४०० क्विंटल भाताच्या एका लॉटला ४० रूपये प्रतिक्विंटल दराने १६ हजार रुपये शासनाकडून मिळतात, तसेच हा भात गोदाम ते मिल नेण्यासाठी शासन किलोमीटरप्रमाणे शासन दरात वाहतूक भाडे दिले जाते.

या भाताच्या मोबदल्यात हाच भात मिलिंग करून, अथवा मिलर्सकडे असलेला तयार तांदूळ ४०० क्विंटल भाताच्या बदल्यात २७० क्विंटल म्हणजे ६७ टक्के तांदूळ देण्याचे बंधनकारक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या हेतूला मूठमाती देऊन महाराष्ट्राच्या रेशनवर चक्क कर्नाटकचा तांदूळ देण्याचे काम केले जात असल्याची गंभीर निदर्शनात आली आहे.