शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानांवर कर्नाटकचा तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:27 IST

शहापुरात रॅकेट उघड : श्रमजीवीची धाड, ५00 गोण्यांचा साठा दिला पकडून

ठाणे : रायगड जिल्ह्यातील तळेगाव येथील धनंजय राईस मिलच्या नावाने शहापूर येथील शासकीय गोदामात कर्नाटकातून आलेला तब्बल ५०० गोण्या तांदूळ श्रमजिवीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पकडून तहसीलदारांच्या हवाली केला आहे. कर्नाटकच्या ट्रकमधून तो शहापुरात आणल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा पंचनामा करून श्रमजिवीने आदिवासी विकास महामंडाळाचे पितळ उघड केल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची भात भरडाई प्रक्रिया कशी भ्रष्टाचाराने बरबटली आहे, या शहापुरात पकडलेल्या तांदळावरून दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भात ज्या मिलर्सला भरडाईसाठी शासन देते आणि त्याबदल्यात तांदूळ घेते, यानुसार रायगडच्या तळेगाव धनंजय राईसच्या मिलकडून शहापूरला तांदूळ आला आहे. पण तो ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नसून कर्नाटक राज्यातील शेतकºयांचा आहे. यामुळे कर्नाटक राज्याची पासिंग असलेल्या असलेल्या ट्रक व्दारे कर्नाटकच्या या तांदळाची वाहतूक थेट शहापूरच्या शासकीय गोडाऊनमध्ये होत असल्याची गंभीरबाब जिल्हा पुरवठा अधिकारी वळवी, शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्या निदर्शनात आणून दिल्याचे श्रमजीवी संघटनेचे युवा जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनी सांगितले.

शासकीय गोडाऊनमध्ये रायगडच्या तळेगाव येथील धनंजय राईसच्या मिल येथून हा ५०० गोण्या तांदूळ आला आहे. तो नियमानुसार आम्ही उतरवून घेतला आहे. ज्या ट्रकमधून हा तांदूळ आलेला आहे. त्या ट्रकची पासिंग कर्नाटकची असल्यामुळे तो कर्नाटक राज्यातून आल्याचा संशय आहे. पण तांदूळपुरवठा करणाºया एजन्सीची निवड शासन पातळीवरून केली जाते. त्यानुसार रायगड येथील मिलमधून तांदूळ आल्यामुळे आम्ही तो उतवून घेतल्याचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी लोकमतला सांगितले.

परजिल्ह्यातील मिल्सचा सहभाग असल्याचा संशयया तांदळामुळे ज्या मिलर्सचा घोटाळा बाहेर आला, त्या मिलने राज्य आदिवासी विकास महामंडळाचे २० लॉट पूर्ण केले आणि आता अजून ५४ लॉट काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे तब्बल २९ हजार ६०० क्विंटल भात केवळ महामंडळाचा त्यानी घेतला असून या व्यतिरिक्त दि. महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा कार्यालय ठाणे यांच्याकडून यावर्षी १५ हजार १५६ क्विंटल भात उचल केल्याचे समजते. मुरबाड येथील जवळच्या मिलर्स मिलिंग करण्यास तयार असताना त्याला डावलून धनंजय मिलला काम देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या रायगडच्या मिलर्सने भरडईच्या अनुदानासह तांदूळ वाहतूक अनुदान, बारदान खरेदीचे अनुदान शासनाकडून प्राप्त करून एक कोटी ३४ लाख ७७ हजार रु पयांचा घोटाळा केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. याप्रमाणेच इतर परजिल्ह्यातील मिलर्स हाच प्रकार करीत असावेत, असा संशय आहे.

बारदान कलर कोडिंगला हरताळशासन निर्णयानुसार तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बारदान कलर कोडिंगबाबत नियमावली आहे. मात्र, त्याचा भंग करून प्लॅस्टिक बॅगचा सर्रास वापर करून हा तांदूळ काळ्या बाजारात जाण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप पवार यानी केला.याशिवाय या भरडाई प्रक्रि येत ४०० क्विंटल भाताच्या एका लॉटला ४० रूपये प्रतिक्विंटल दराने १६ हजार रुपये शासनाकडून मिळतात, तसेच हा भात गोदाम ते मिल नेण्यासाठी शासन किलोमीटरप्रमाणे शासन दरात वाहतूक भाडे दिले जाते.

या भाताच्या मोबदल्यात हाच भात मिलिंग करून, अथवा मिलर्सकडे असलेला तयार तांदूळ ४०० क्विंटल भाताच्या बदल्यात २७० क्विंटल म्हणजे ६७ टक्के तांदूळ देण्याचे बंधनकारक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या हेतूला मूठमाती देऊन महाराष्ट्राच्या रेशनवर चक्क कर्नाटकचा तांदूळ देण्याचे काम केले जात असल्याची गंभीर निदर्शनात आली आहे.