शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राख्या वाढवणार कारगिलमधील जवानांचा ‘विश्वास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:42 IST

रंगीबेरंगी दोन हजार राख्यांचे टार्गेट : मुले झाली तरबेज; विश्वास संस्थेचा उपक्रम

ठाणे : ठाण्याची बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली असताना यात लक्ष वेधून घेत आहेत, त्या विशेष मुलांनी आपल्या हस्तकलेतून तयार केलेल्या राख्या. विश्वास संस्थेच्या २० विशेष मुलांनी तब्बल १७०० राख्या स्वबळावर तयार केल्या असून लवकरच ती दोन हजार राख्यांचे टार्गेट पूर्ण करणार आहेत. यातील १०० राख्या या औरंगाबादला, १५० राख्या या कारगिलमधील जवानांना, ४०० राख्या आदिवासीपाड्यांवर पोहोचल्या आहेत.अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन हा सण येऊन ठेपला आहे. बाजारात विविध प्रकारांच्या राख्या येत असताना दुसरीकडे विशेष मुले विशेष राख्या बनवण्यात गुंतली आहेत. जिद्द, अंगी असलेली कला, आवड या गुणांच्या जोरावर ती आकर्षक राख्या बनवत असून यंदा त्यांच्या राख्यांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. विश्वास संस्थेने यंदा राख्यांच्या पॅटर्नपेक्षा रंगांवर अधिक भर दिला आहे. मणी आणि खड्यांच्या या राख्या बनवण्यास मुलांना मजा वाटत आहे. ती या कलेत इतकी तरबेज झाली आहेत की, त्यांना आता मार्गदर्शनाची फार गरज लागत नसल्याचे संस्थेच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी सांगितले.गुलाबी, लाल, सोनेरी, पिवळा, हिरवा अशा अनेक रंगांत या राख्या तयार केल्या जातात. एक महिना आधीच ही मुले कामाला लागतात.२२ वर्षांपासूनची परंपरा२२ वर्षांपासून आजतागायत राख्या बनवण्याची कला या संस्थेत जोपासली जात आहे. क्षीरसागर या नेहमीच राख्यांमध्ये नवनवीन प्रयोग करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या आकारांच्या, प्रकारांच्या राख्या बनवून घेत असतात. यंदा त्यांनी त्यांच्याकडून कलरफुल राख्या बनवून घेतल्या आहेत.

टॅग्स :Rakhiराखीthaneठाणे