शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कपिल पाटील यांच्या मिरवणुकीत सेनेचा टक्का कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 00:18 IST

भिवंडीत भाजपचे शक्तिप्रदर्शन : पक्षाचे झेंडेही शिवसैनिकांनी उचलले नाहीत, श्रमजीवी संघटनेच्या महिलांची लक्षणीय उपस्थिती

भिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना, आरपीआय (आ) व श्रमजीवी संघटनेच्या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सोमवारी भाजप कार्यकर्त्यांची मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज सादर केला. या मिरवणुकीत शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी सहभागी झाले होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या मिरवणुकीस शिवाजी चौक येथून सोमवारी दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. याप्रसंगी काढलेल्या प्रचाररथात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, भाजपा आमदार महेश चौघुले, आ. नरेंद्र पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख सुभाष माने, माजी आमदार विवेक पंडित, दौलत दरोडा यांच्यासह भाजपाचे व सेनेचे मोजके पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी गोकुळनगर भागातील जैन मंदिराचे दर्शन घेऊन पाटील मार्गस्थ झाले.

ही मिरवणूक वंजारपाटीनाकामार्गे प्रांत कार्यालयातील मुख्य निवडणूक कार्यालयात पोहोचली. तिथे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांच्याकडे कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते असे सुमारे १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते.मिरवणुकीत सामील होणाऱ्या शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांसाठी शिवाजी चौकात भाजप व शिवसेनेचे झेंडे ठेवले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्ते लगेचच झेंडे हाती घेऊन मिरवणुकीत सामील झाले; मात्र शिवसेनेचे मोजकेच कार्यकर्ते झेंडे घेण्यासाठी पुढे आले. त्यामुळे मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर शिवसेनेचे बरेच झेंडे तसेच राहिले. विशेष म्हणजे, श्रमजीवी संघटनेच्या महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. त्यांनी श्रमजीवीचे झेंडे हाती घेतले होते.मिरवणुकीत कल्याण, शहापूर व विरार येथील ढोल पथके सामील झाले होते. त्यावर, श्रमजीवीच्या काही महिलांनी ठेका धरला होता. मिरवणूक वाजतगाजत निवडणूक कार्यालयात गेली. मात्र, मिरवणुकीत घोषणांचा दुष्काळ पडला होता. कडक उन्हात मिरवणूक निघाल्याने कार्यकर्ते अक्षरश: भाजून निघाले.ठिकठिकाणी लहान, मोठी वाहने उभी असल्याने काही ठिकाणी मिरवणुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे शालेय बसनादेखील वेळेवर विद्यार्थ्यांना पोहोचवता आले नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी