शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कपिल पाटील यांच्या मिरवणुकीत सेनेचा टक्का कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 00:18 IST

भिवंडीत भाजपचे शक्तिप्रदर्शन : पक्षाचे झेंडेही शिवसैनिकांनी उचलले नाहीत, श्रमजीवी संघटनेच्या महिलांची लक्षणीय उपस्थिती

भिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना, आरपीआय (आ) व श्रमजीवी संघटनेच्या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सोमवारी भाजप कार्यकर्त्यांची मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज सादर केला. या मिरवणुकीत शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी सहभागी झाले होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या मिरवणुकीस शिवाजी चौक येथून सोमवारी दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. याप्रसंगी काढलेल्या प्रचाररथात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, भाजपा आमदार महेश चौघुले, आ. नरेंद्र पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख सुभाष माने, माजी आमदार विवेक पंडित, दौलत दरोडा यांच्यासह भाजपाचे व सेनेचे मोजके पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी गोकुळनगर भागातील जैन मंदिराचे दर्शन घेऊन पाटील मार्गस्थ झाले.

ही मिरवणूक वंजारपाटीनाकामार्गे प्रांत कार्यालयातील मुख्य निवडणूक कार्यालयात पोहोचली. तिथे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांच्याकडे कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते असे सुमारे १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते.मिरवणुकीत सामील होणाऱ्या शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांसाठी शिवाजी चौकात भाजप व शिवसेनेचे झेंडे ठेवले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्ते लगेचच झेंडे हाती घेऊन मिरवणुकीत सामील झाले; मात्र शिवसेनेचे मोजकेच कार्यकर्ते झेंडे घेण्यासाठी पुढे आले. त्यामुळे मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर शिवसेनेचे बरेच झेंडे तसेच राहिले. विशेष म्हणजे, श्रमजीवी संघटनेच्या महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. त्यांनी श्रमजीवीचे झेंडे हाती घेतले होते.मिरवणुकीत कल्याण, शहापूर व विरार येथील ढोल पथके सामील झाले होते. त्यावर, श्रमजीवीच्या काही महिलांनी ठेका धरला होता. मिरवणूक वाजतगाजत निवडणूक कार्यालयात गेली. मात्र, मिरवणुकीत घोषणांचा दुष्काळ पडला होता. कडक उन्हात मिरवणूक निघाल्याने कार्यकर्ते अक्षरश: भाजून निघाले.ठिकठिकाणी लहान, मोठी वाहने उभी असल्याने काही ठिकाणी मिरवणुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे शालेय बसनादेखील वेळेवर विद्यार्थ्यांना पोहोचवता आले नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी