शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:45 IST

भिवंडीत नदीची केली पाहणी, नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

भिवंडी : शहराच्या सीमेबाहेरून वाहणारी कामवारी ही नदी नव्हे तर, नाला बनली आहे. ही नदी मृत झाली असून नदीला पुनर्जीवित करण्यासाठी स्थानिक प्रशासन व समाजाने तयारी केली पाहिजे. आई आजारी पडल्यानंतर तीवर इलाज मुलांनीच केला पाहिजे. त्यासाठी शहर व ग्रामिण भागातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी भावनात्मक हाक जलपुरूष डॉ.राजेंद्रसिंग यांनी भिवंडीकरांना दिली आहे. ‘कामवारी नदी बचाव अभियान’ निमीत्ताने ते सोमवारी भिवंडीत आले होते.भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व हालारी विशा ओसवाल कॉलेज आॅफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील नदी स्वच्छता प्रकल्प व जल व्यवस्थापन अंतर्गत कामवारी नदी बचाव अभियानासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग, मनपा आयुक्त मनोहर हिरे, यशदा संस्थेचे संचालक डॉ. सुमंत पांडे, संयोजक प्राचार्या डॉ. स्नेहल एस. दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी गैरहजर राहिल्याने तालुक्यातील महसूल विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यशाळेत कामवारी नदीबाबतची चित्रफित दाखवून नदीचे विद्यमान स्वरूप दाखविण्यात आले. नदीच्या पुनर्जिवीतेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत उहापोह करण्यात आला. सायंकाळी या टीमने कामवारी नदीची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले की, मनपा प्रशासन व जिल्हा महसूल प्रशासन चांगल्या गोष्टी करते, पण काम करण्यावर भर देत नाही. कामवारी नदी पुनर्जीवित करण्यासाठी पाच कामे सुचविली आहेत. त्यानुसार कामवारी नदी जेथून वाहते त्या गावागावांत व शहरातील विद्यार्थ्यांमध्ये, तसेच नागरिकांमध्ये चेतना जागविली पाहिजे. ही त्यांची जबाबदारी असल्याचे पटवून दिले पाहिजे. त्यामध्ये शिक्षकांनादेखील सामावून घेतले पाहिजे.नदीची स्वच्छता करण्याची जबाबदारी शहरी प्रशासन व ग्रामिण प्रशासन एकमेकांवर ढकलत आहे. त्यामुळे कामवारी नदीची संसद बनवून एक आॅथॉरिटी बनली पाहिजे. नदीला कोणते आजार आहेत, हे शोधण्यासाठी व त्याची चिकीत्सा करण्यासाठी वैज्ञानिकांचा समुह कार्यरत केला पाहिजे. शहरी व ग्रामिण लोकप्रतिनीधींना वाटून जबाबदारी दिली पाहिजे. तसेच सर्व लोकांचा समावेश करून त्यांचे सामाजिक संस्थान बनविले पाहिजे. त्याचबरोबर नदीच्या सीमा नियमीत करून सीमांचे संरक्षण केले तर ही नदी पूर्ववत होणार आहे. हे काम आता सुरू झाले आहे,अशी माहिती डॉ. राजेंद्र सिंग यांनी दिली.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण