शहरं
Join us  
Trending Stories
1
मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
2
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
5
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
6
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
7
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
8
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
9
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
10
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
11
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
13
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
14
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
15
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
16
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
17
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
18
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
19
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:45 IST

भिवंडीत नदीची केली पाहणी, नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

भिवंडी : शहराच्या सीमेबाहेरून वाहणारी कामवारी ही नदी नव्हे तर, नाला बनली आहे. ही नदी मृत झाली असून नदीला पुनर्जीवित करण्यासाठी स्थानिक प्रशासन व समाजाने तयारी केली पाहिजे. आई आजारी पडल्यानंतर तीवर इलाज मुलांनीच केला पाहिजे. त्यासाठी शहर व ग्रामिण भागातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी भावनात्मक हाक जलपुरूष डॉ.राजेंद्रसिंग यांनी भिवंडीकरांना दिली आहे. ‘कामवारी नदी बचाव अभियान’ निमीत्ताने ते सोमवारी भिवंडीत आले होते.भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व हालारी विशा ओसवाल कॉलेज आॅफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील नदी स्वच्छता प्रकल्प व जल व्यवस्थापन अंतर्गत कामवारी नदी बचाव अभियानासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग, मनपा आयुक्त मनोहर हिरे, यशदा संस्थेचे संचालक डॉ. सुमंत पांडे, संयोजक प्राचार्या डॉ. स्नेहल एस. दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी गैरहजर राहिल्याने तालुक्यातील महसूल विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यशाळेत कामवारी नदीबाबतची चित्रफित दाखवून नदीचे विद्यमान स्वरूप दाखविण्यात आले. नदीच्या पुनर्जिवीतेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत उहापोह करण्यात आला. सायंकाळी या टीमने कामवारी नदीची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले की, मनपा प्रशासन व जिल्हा महसूल प्रशासन चांगल्या गोष्टी करते, पण काम करण्यावर भर देत नाही. कामवारी नदी पुनर्जीवित करण्यासाठी पाच कामे सुचविली आहेत. त्यानुसार कामवारी नदी जेथून वाहते त्या गावागावांत व शहरातील विद्यार्थ्यांमध्ये, तसेच नागरिकांमध्ये चेतना जागविली पाहिजे. ही त्यांची जबाबदारी असल्याचे पटवून दिले पाहिजे. त्यामध्ये शिक्षकांनादेखील सामावून घेतले पाहिजे.नदीची स्वच्छता करण्याची जबाबदारी शहरी प्रशासन व ग्रामिण प्रशासन एकमेकांवर ढकलत आहे. त्यामुळे कामवारी नदीची संसद बनवून एक आॅथॉरिटी बनली पाहिजे. नदीला कोणते आजार आहेत, हे शोधण्यासाठी व त्याची चिकीत्सा करण्यासाठी वैज्ञानिकांचा समुह कार्यरत केला पाहिजे. शहरी व ग्रामिण लोकप्रतिनीधींना वाटून जबाबदारी दिली पाहिजे. तसेच सर्व लोकांचा समावेश करून त्यांचे सामाजिक संस्थान बनविले पाहिजे. त्याचबरोबर नदीच्या सीमा नियमीत करून सीमांचे संरक्षण केले तर ही नदी पूर्ववत होणार आहे. हे काम आता सुरू झाले आहे,अशी माहिती डॉ. राजेंद्र सिंग यांनी दिली.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण