शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:19 IST

तापमानात दिवसागणिक वाढ झाल्याने पाण्याची पातळी खालावली असून उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भिवंडी तालुक्यातील टंचाई अधिक तीव्र होते आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव : तापमानात दिवसागणिक वाढ झाल्याने पाण्याची पातळी खालावली असून उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भिवंडी तालुक्यातील टंचाई अधिक तीव्र होते आहे. तालुक्यातील आदिवासीपाडे, वस्तीवाड्यांमध्ये नागरिकांना टंचाई भेडसावत असल्याचे चित्र असतानाच पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी कामवरी नदी कोरडी पडली आहे.या नदीला अनेक छोटेमोठे ओहोळ जोडलेले आहेत. पिळझे गावच्या डोंगरपायथ्यापासून उगम पावलेल्या या नदीच्या तीरावर सुपेगाव, लामज, करंजवाडी, चावे, पंडास, निवली, रोहिने, सोनटक्के, खाडपे, कशेळी, विश्वभारती, कासपाडा, गोरसई, सैनिक वसाहत, कवाड, मडक्याचापाडा, बोरपाडा, शेलार, वाघिवली, आदी गावपाडे वसलेले आहेत. ही नदी येथील शेतकऱ्यांची जीवनरेखा आहे. उन्हाळ्यात या नदीच्या पाण्यावर येथील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. येथील शेतकऱ्यांची ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. पावसाळ्यानंतर नदीतील पाणी कमी होते. नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकºयांच्या जनावरांना पाणी मिळत नाही.या नदीतील पाण्याने शेलार येथील डाइंगला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नदी कोरडी पडते. मात्र, भिवंडी तहसील, भिवंडी पंचायत समिती आणि शेलार ग्रामपंचायत विभागाकडे यासंबंधी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यामागील कारण काय आहे, हे उमजलेले नाही.भिवंडी पंचायत समिती लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून सिमेंट-काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. ठिकठिकाणी बंधाºयांचे काम केले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयांची दुरवस्था झाली आहे. बंधारे वाहून गेल्याने पाणी अडत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील काय, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. याबाबत शेतकºयांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी शेतकºयांनी केली आहे.नदीपात्राची खोदाई करून त्यातून माती काढून खोली वाढवली, तर पाणीसाठा वाढेल आणि येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. तरच शेतकºयांना दरवर्षी होणारा पाणीटंचाईचा त्रास वाचेल.>नदीतील पाणी कमी झाल्याने नदी कोरडी पडली आहे. नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. नदीपात्राची खोदाई करून खोली वाढवल्यास पाणीसाठा वाढेल, याकडे शासनाने लक्ष द्यावे.- प्रकाश पाटील, शेतकरी>यासंबंधी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडून माहिती घेणार आहे.- अशोक सोनटक्के, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी