शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:19 IST

तापमानात दिवसागणिक वाढ झाल्याने पाण्याची पातळी खालावली असून उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भिवंडी तालुक्यातील टंचाई अधिक तीव्र होते आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव : तापमानात दिवसागणिक वाढ झाल्याने पाण्याची पातळी खालावली असून उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भिवंडी तालुक्यातील टंचाई अधिक तीव्र होते आहे. तालुक्यातील आदिवासीपाडे, वस्तीवाड्यांमध्ये नागरिकांना टंचाई भेडसावत असल्याचे चित्र असतानाच पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी कामवरी नदी कोरडी पडली आहे.या नदीला अनेक छोटेमोठे ओहोळ जोडलेले आहेत. पिळझे गावच्या डोंगरपायथ्यापासून उगम पावलेल्या या नदीच्या तीरावर सुपेगाव, लामज, करंजवाडी, चावे, पंडास, निवली, रोहिने, सोनटक्के, खाडपे, कशेळी, विश्वभारती, कासपाडा, गोरसई, सैनिक वसाहत, कवाड, मडक्याचापाडा, बोरपाडा, शेलार, वाघिवली, आदी गावपाडे वसलेले आहेत. ही नदी येथील शेतकऱ्यांची जीवनरेखा आहे. उन्हाळ्यात या नदीच्या पाण्यावर येथील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. येथील शेतकऱ्यांची ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. पावसाळ्यानंतर नदीतील पाणी कमी होते. नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकºयांच्या जनावरांना पाणी मिळत नाही.या नदीतील पाण्याने शेलार येथील डाइंगला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नदी कोरडी पडते. मात्र, भिवंडी तहसील, भिवंडी पंचायत समिती आणि शेलार ग्रामपंचायत विभागाकडे यासंबंधी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यामागील कारण काय आहे, हे उमजलेले नाही.भिवंडी पंचायत समिती लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून सिमेंट-काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. ठिकठिकाणी बंधाºयांचे काम केले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयांची दुरवस्था झाली आहे. बंधारे वाहून गेल्याने पाणी अडत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील काय, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. याबाबत शेतकºयांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी शेतकºयांनी केली आहे.नदीपात्राची खोदाई करून त्यातून माती काढून खोली वाढवली, तर पाणीसाठा वाढेल आणि येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. तरच शेतकºयांना दरवर्षी होणारा पाणीटंचाईचा त्रास वाचेल.>नदीतील पाणी कमी झाल्याने नदी कोरडी पडली आहे. नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. नदीपात्राची खोदाई करून खोली वाढवल्यास पाणीसाठा वाढेल, याकडे शासनाने लक्ष द्यावे.- प्रकाश पाटील, शेतकरी>यासंबंधी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडून माहिती घेणार आहे.- अशोक सोनटक्के, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी